शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
3
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
4
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
5
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
6
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
7
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
8
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
9
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
10
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
11
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
12
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
13
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
14
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
15
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
16
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
17
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
18
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
19
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
20
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"

जैवविविधता जोपासणे काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 10:10 PM

पर्यावरण संतुलीत राहिले नाही, असे प्रत्येकजण बोलतो पण ते कशामुळे असंतुलीत झाले याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी जैवविविधता जोपासणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन कोल्हापूर येथील पर्यावरण व जैवविविधता अभ्यासक सुहास वायंगनकर यांनी केले.

ठळक मुद्देसुहास वायंगनकर : पवनी येथे ‘निसर्गावर बोलू काही’ कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : पर्यावरण संतुलीत राहिले नाही, असे प्रत्येकजण बोलतो पण ते कशामुळे असंतुलीत झाले याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी जैवविविधता जोपासणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन कोल्हापूर येथील पर्यावरण व जैवविविधता अभ्यासक सुहास वायंगनकर यांनी केले.वनपरिक्षेत्र अधिकारी वनविभाग प्रादेशिक, फ्लायकॅचर्स वाईल्ड फेंडस, अभियान फाऊंडेशन व आझाद शेतकरी संघटना यांचेवतीने शिवाजी विज्ञान महाविद्यालयात आयोजित निसर्गावर बोलू काही या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून सुहास वायंगनकर बोलत होते. ते पुढे म्हणाले पर्यावरणाचा तोल सांभाळत असलेल्या पश्चिम घाटात विकासाचे नावावर होत असलेल्या रस्ते, लोहमार्ग व कारखान्यामुळे पश्चिम घाटाची जैवविविधता धोक्यात आलेली आहे. अख्ख्या महाराष्ट्रात हे चित्र फारसे वेगळे नाही. चाळीस कोटी लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत असलेल्या पश्चिम घाटातील ३३ टक्के वनस्पती नामशेष झालेल्या आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी जंगल आवश्यक आहे. परंतू केवळ १४ टक्के जंगल उपलब्ध आहे. एक जंगल तयार व्हायला झाडे चारशे ते एक हजार वर्षाचा कालावधी लागतो. मात्र आपण त्याला नष्ठ करण्याचा घाट घातलेला आहे. पशु, पक्षी, प्राणी व किटक यांचे अधिवास प्रचंड वेगाने नष्ट केल्या जात आहेत. नखशिखात फुले येणाऱ्या बहावा वनस्पतीसह कित्येक औषधी वनस्पती नामशेष होवू नये यासाठी लोकसहभागाची गरज आहे. मोठी उर्जा असणारा युवावर्ग या परिसरात असल्याने वनविभागाने त्यांचे सहकार्य घेवून जैवविविधता जोपासण्यासाठी प्रयत्न करावा, असे विचार त्यांनी व्यक्त केले.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य विजय लेपसे, कार्यक्रमाच्या प्रमुख आयोजक वनपरिक्षेत्राधिकारी कोमल जाधव, सहायक वन संरक्षक शंकर धोटे, आझाद शेतकरी संघटनेचे अध्यक्ष किशोर पंचभाई, भाजपा किसान सेलचे अध्यक्ष राजेंद्र फुलबांधे, प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिक लेपसे, संचालक वर्षा भोयर, कल्पना कटरे, अतिथी पश्चिम प्रशांत रायपुरकर यांनी तर आभार आशिष उरकुडे यांनी मानले. फ्लायकॅचर्स वॉईल्ड फ्रेंडस पवनीचे प्रवर्तक पंकज देशमुख व मित्रपरिवार यांनी फुलपाखरू उद्यान निर्मितीचा संकल्प यावेळी व्यक्त केला.