शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

पाणी बचतीसाठी लोकसहभागाची गरज

By admin | Updated: May 25, 2016 01:20 IST

तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या भंडारा जिल्ह्यात कधी नव्हे एवढी यावर्षी पाण्याची टंचाई निर्माण झाली.

लोकमत जलमित्र अभियान : लोकसहभागातून सांगणार पाणी बचतीचे महत्त्वभंडारा : तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या भंडारा जिल्ह्यात कधी नव्हे एवढी यावर्षी पाण्याची टंचाई निर्माण झाली. मोठ्या आणि मध्यम जलाशयांमधील पाणीसाठा जवळजवळ संपुष्टात आला आहे. अशीच स्थिती राज्याच्या बहुतांश भागात आहे. त्यामुळे पाण्याचे महत्त्व लोकांना कळावे आणि त्यातून पाणी बचतीची सवय लागावी, यासाठी ‘लोकमत’ने राज्यभरात ‘लोकमत जलमित्र अभियान’ सुरू केले आहे. यात पाणी बचतीसाठी उपक्रम राबविले जाणार असून पाणी बचतीसाठी प्रयत्न करणाऱ्या संस्था, प्रतिष्ठाने, वसाहतींना प्रसिद्धी देऊन त्यांचे प्रेरणादायी कार्य समाजासमोर मांडण्यात येणाार आहे. ‘जल-सेल्फी’ला मिळणार प्रसिद्धी‘‘लोकमत’च्या या उपक्रमांतर्गत पाणी बचतीचे छोटे-मोठे प्रयोग करणाऱ्यांनी आपण केलेल्या प्रयोगासह किंवा पाणी बचतीसाठी राबविलेले कोणतेही उपक्रम दिसतील अशा पद्धतीने आपल्या मोबाईलमधून ‘सेल्फी’ (स्वत:चे छायाचित्र) काढून ते ‘लोकमत’कडे पाठवायचे आहे. योग्य सेल्फींना ‘लोकमत’मधून प्रसिद्धी दिली जाईल. आपले सेल्फी (९४२२९०८६११) या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सअ‍ॅपने पाठवू शकता. सोबत आपले नाव, गावाचे नाव आणि पाणी बचतीसाठी केलेल्या कामाची थोडक्यात माहितीसुद्धा पाठवावी. थेंब थेंब वाचवू या...राज्यातील अनेक भागात दुष्काळी स्थिती आहे. भंडारा जिल्ह्यात आजघडीला पाणीटंचाई दिसून येत नसली, तरी ग्रामीण भागात पाण्यासाठी पायपीट सुरू आहे. हा भंडारा जिल्ह्यातील छुपा दुष्काळच म्हणावा लागेल. शासन व प्रशासन या दुष्काळाचे निसर्गाच्या डोक्यावर खापर फोडत आहे. मात्र जलतज्ज्ञांच्या मते, हा निसर्गाचा नव्हे, तर मानवनिर्मित प्रकोप आहे. त्यामुळे आजचे जलसंकट ‘अस्मानी’ नव्हे ‘सुलतानी’ आहे. विदर्भ हा दुष्काळग्रस्त होऊच शकत नाही, येथे दरवर्षी मुबलक पाऊस होतो. मात्र त्या पाण्याचे योग्य पुनर्भरण होत नाही. ते सर्व पाणी नदी-नाल्यांमधून वाहून जाते. दुसरीकडे दिवसेंदिवस लोकसंख्या व शहरीकरण वाढत आहे. दैनंदिन सवयी बदलाव्या लागतीलपाणीबचतीसाठी प्रत्येक घरातील दैनंदिन सवयी बदलाव्या लागणार आहेत, शिवाय मुलांवर जलसंस्कार करावे लागतील. आजपर्यंत पाणीबचतीकडे कधी गांभीर्याने लक्षच दिले नाही, त्यामुळे ही वेळ आली आहे. प्रत्येक व्यक्ती रोज कळत-नकळत पाण्याची नासाडी करतो. शिवाय दुसरीकडे पावसाच्या पाण्याचे संवर्धन करण्याकडे दुर्लक्ष करतो. यामुळे जमिनीच्या पोटातील पाणीसुद्धा संपत चालले आहे. विहिरी व बोअरवेल कोरडे पडत आहेत. या सर्व गोष्टींसाठी आमच्या दैनंदिन सवयी कारणीभूत ठरत असून, त्यांना बदलण्याची गरज असल्याचे चर्चेतून समोर आले.पाण्याचा काटकसरीने वापर कराआम्ही पाणी या समस्येचा कधीच गांभीर्याने विचार केला नाही. आज पाणी आहे म्हणून त्याची नासाडी सुरू आहे. मराठवाड्यात पाण्याची जी टंचाई आहे ती उद्भवू नये यासाठी सर्वांनी सजग राहण्याची गरज आहे. मागील ५० वर्षांतील पावसाची आकडेवारी पाहता, पाऊस कधीच कमी पडलेला नाही. चक्र बदलल्यामुळे वेळापत्रकात गडबड झाली आहे. त्यामुळे तो कधी एकाच दिवशी धो-धो पडतो आणि संपूर्ण महिना कोरडा जातो. त्यासाठी पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरविण्याची गरज आहे. ‘लोकमत’ने सुरू केलेले जलमित्र अभियान स्वागतार्ह असून भंडारा नगरपालिका यात सहभागी होईल. -बाबूराव बागडे, नगराध्यक्ष, भंडारा.