शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
5
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
6
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
7
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
8
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
9
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
10
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
11
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
12
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
13
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
14
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
15
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
16
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
17
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  
18
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
19
सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
20
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

पाणी बचतीसाठी लोकसहभागाची गरज

By admin | Updated: May 25, 2016 01:20 IST

तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या भंडारा जिल्ह्यात कधी नव्हे एवढी यावर्षी पाण्याची टंचाई निर्माण झाली.

लोकमत जलमित्र अभियान : लोकसहभागातून सांगणार पाणी बचतीचे महत्त्वभंडारा : तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या भंडारा जिल्ह्यात कधी नव्हे एवढी यावर्षी पाण्याची टंचाई निर्माण झाली. मोठ्या आणि मध्यम जलाशयांमधील पाणीसाठा जवळजवळ संपुष्टात आला आहे. अशीच स्थिती राज्याच्या बहुतांश भागात आहे. त्यामुळे पाण्याचे महत्त्व लोकांना कळावे आणि त्यातून पाणी बचतीची सवय लागावी, यासाठी ‘लोकमत’ने राज्यभरात ‘लोकमत जलमित्र अभियान’ सुरू केले आहे. यात पाणी बचतीसाठी उपक्रम राबविले जाणार असून पाणी बचतीसाठी प्रयत्न करणाऱ्या संस्था, प्रतिष्ठाने, वसाहतींना प्रसिद्धी देऊन त्यांचे प्रेरणादायी कार्य समाजासमोर मांडण्यात येणाार आहे. ‘जल-सेल्फी’ला मिळणार प्रसिद्धी‘‘लोकमत’च्या या उपक्रमांतर्गत पाणी बचतीचे छोटे-मोठे प्रयोग करणाऱ्यांनी आपण केलेल्या प्रयोगासह किंवा पाणी बचतीसाठी राबविलेले कोणतेही उपक्रम दिसतील अशा पद्धतीने आपल्या मोबाईलमधून ‘सेल्फी’ (स्वत:चे छायाचित्र) काढून ते ‘लोकमत’कडे पाठवायचे आहे. योग्य सेल्फींना ‘लोकमत’मधून प्रसिद्धी दिली जाईल. आपले सेल्फी (९४२२९०८६११) या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सअ‍ॅपने पाठवू शकता. सोबत आपले नाव, गावाचे नाव आणि पाणी बचतीसाठी केलेल्या कामाची थोडक्यात माहितीसुद्धा पाठवावी. थेंब थेंब वाचवू या...राज्यातील अनेक भागात दुष्काळी स्थिती आहे. भंडारा जिल्ह्यात आजघडीला पाणीटंचाई दिसून येत नसली, तरी ग्रामीण भागात पाण्यासाठी पायपीट सुरू आहे. हा भंडारा जिल्ह्यातील छुपा दुष्काळच म्हणावा लागेल. शासन व प्रशासन या दुष्काळाचे निसर्गाच्या डोक्यावर खापर फोडत आहे. मात्र जलतज्ज्ञांच्या मते, हा निसर्गाचा नव्हे, तर मानवनिर्मित प्रकोप आहे. त्यामुळे आजचे जलसंकट ‘अस्मानी’ नव्हे ‘सुलतानी’ आहे. विदर्भ हा दुष्काळग्रस्त होऊच शकत नाही, येथे दरवर्षी मुबलक पाऊस होतो. मात्र त्या पाण्याचे योग्य पुनर्भरण होत नाही. ते सर्व पाणी नदी-नाल्यांमधून वाहून जाते. दुसरीकडे दिवसेंदिवस लोकसंख्या व शहरीकरण वाढत आहे. दैनंदिन सवयी बदलाव्या लागतीलपाणीबचतीसाठी प्रत्येक घरातील दैनंदिन सवयी बदलाव्या लागणार आहेत, शिवाय मुलांवर जलसंस्कार करावे लागतील. आजपर्यंत पाणीबचतीकडे कधी गांभीर्याने लक्षच दिले नाही, त्यामुळे ही वेळ आली आहे. प्रत्येक व्यक्ती रोज कळत-नकळत पाण्याची नासाडी करतो. शिवाय दुसरीकडे पावसाच्या पाण्याचे संवर्धन करण्याकडे दुर्लक्ष करतो. यामुळे जमिनीच्या पोटातील पाणीसुद्धा संपत चालले आहे. विहिरी व बोअरवेल कोरडे पडत आहेत. या सर्व गोष्टींसाठी आमच्या दैनंदिन सवयी कारणीभूत ठरत असून, त्यांना बदलण्याची गरज असल्याचे चर्चेतून समोर आले.पाण्याचा काटकसरीने वापर कराआम्ही पाणी या समस्येचा कधीच गांभीर्याने विचार केला नाही. आज पाणी आहे म्हणून त्याची नासाडी सुरू आहे. मराठवाड्यात पाण्याची जी टंचाई आहे ती उद्भवू नये यासाठी सर्वांनी सजग राहण्याची गरज आहे. मागील ५० वर्षांतील पावसाची आकडेवारी पाहता, पाऊस कधीच कमी पडलेला नाही. चक्र बदलल्यामुळे वेळापत्रकात गडबड झाली आहे. त्यामुळे तो कधी एकाच दिवशी धो-धो पडतो आणि संपूर्ण महिना कोरडा जातो. त्यासाठी पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरविण्याची गरज आहे. ‘लोकमत’ने सुरू केलेले जलमित्र अभियान स्वागतार्ह असून भंडारा नगरपालिका यात सहभागी होईल. -बाबूराव बागडे, नगराध्यक्ष, भंडारा.