शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

बहुजनांनी एकत्र येणे काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 22:38 IST

बहुजनांचे राज्य निर्माण करायचे असेल तर ओबीसी, अनुसूचित जनजाती, भटके आदी नागरीकांनी आता एकत्रित आल्याशिवाय बहुजनांचे राज्य निर्माण होणे शक्य नाही.

ठळक मुद्देनाना पटोले यांचे प्रतिपादन : लाखनीत संविधान दिवस, बिरसा मुंडा जयंती व भीम मेळावा उत्साहात, कार्यक्रमाला हजारो बहुजनांची हजेरी

आॅनलाईन लोकमतलाखनी : बहुजनांचे राज्य निर्माण करायचे असेल तर ओबीसी, अनुसूचित जनजाती, भटके आदी नागरीकांनी आता एकत्रित आल्याशिवाय बहुजनांचे राज्य निर्माण होणे शक्य नाही. बहुजनांची सत्ता आली पाहिजे. त्यासाठी तन, मन, धनाने शेवटपर्यंत लढणार आहे, असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले.एक आशा फाऊंडेशन व नॅशनल आदिवासी पिपल्स फेडरेशन मुरमाडी, सावरी, लाखनी यांच्या संयुक्त विद्यमाने समर्थ विद्यालयाच्या पटांगणावर संविधान दिन, बिरसा मुंडा जयंती आणि भीम मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मुख्य उद्घाटन सोहळ्याप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती रजनी आत्राम होत्या. प्रमुख अतिथी म्हणून माजी शिक्षणाणिकारी सी.एम. बागडे, हरीदास बोरकर, सुरेंद्र बन्सोड, अमोल कांबळे, मुकेश धुर्वे, शालिकराम बागडे, सरपंच सुनीता भालेराव, रजनी पडोळे, अमित भंडारे आदी उपस्थित होते. खासदार पटोले म्हणाले, यावेळी आयोजकांनी केलेल्या कार्यक्रमांची प्रशंसा करुन असे आयोजन होणे आवश्यक आहे. यातून बहुजन बांधवांना इतीहासाचे स्मरण होऊन त्यातून प्रेरणा मिळते. सी.एम. बागडे म्हणाले, संविधान भारत देशाचा श्वास आहे. आभार प्रदर्शन अश्विनी भिवगडे यांनी केले.तत्पुर्वी बिरसा मुंडा जयंती आणि संविधान दिवसाच्या पर्वावर भीम मेळाव्याच्या पृष्ठभूमिवर सकाळी पंचशील तसेच आदिवासी लोकांच्या सप्तरंगी ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. पंचशीलध्वजाचे ध्वजारोहण सी.एम. बागडे तर, आदिवासी बांधवांच्या सप्तरंगी ध्वजाचे ध्वजारोहण पंचायत समिती सभापती रजनी आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आदिवासी बांधवांची त्यांच्या परंपरेनुसार ध्वजाची पूजा संस्थेद्वारे करण्यात आली.त्रिशरण व पंचशील आणि बुद्ध, धम्म संघ वंदना भदंत आनंद यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. सकाळ सत्रातील कार्यक्रमाचा शेवट 'हे मानव तू मुखसे बोल, बुद्धम सरणमं गच्छामी' ने करण्यात आली. आदिवासी पध्दतीनुसार पूजा भुमक सुभाष धुर्वे आणि कैलास उईके यांनी पार पाडली. त्यावेळी रजनी आत्राम या प्रामुख्याने उपस्थित होत्या. यावेळी सुरज बागडे, हरीदास बोरकर, इंदू बागडे, सी.एम. बागडे, मुकेश धुर्वे, आशिष गणवीर, अमित भंडारे, शंकर उईके, कैलास परतेकी आदी उपस्थित होते.मुख्य उद्घाटन कार्यक्रमानंतर रात्री आदिवासी विद्यालय माडगी येथील मुलींनी सांस्कृतीक कार्यक्रम सादर झाले. आदिवासी नृत्य आकषर्णाचे केंद्र ठरले. यावेळी राज्यात आणि राष्ट्रीय पातळीवर स्पर्धेत भाग घेणाºया मुलींना स्मृती चिन्ह देवून गौरविण्यात आले.संगीतकार भुमेश गवई यांच्या गीतांचा बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आला. कार्यक्रमाला हजारो नागरीकांनी हजेरी लावली होती कार्यक्रमासाठी डॉ. गुणवंत इलमकार, धीरज बागडे, जयंत जांभुळकर, विनय रामटेके, मायकल वैद्य, नवनित बागडे, संजय पेंदाम, अजीत भंडारी, सुनिल रामटेके, मेघराज धुर्वे, रजत भालाधरे, भूषण गजभिये, मंगेश गेडाम आदींनी सहकार्य केले.युवकांची कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात हजेरी असल्यामुळे युवावर्ग बहुजनांच्या एकत्रिकरणासाठी एकत्रीत आल्याचे दिसून आले. या युवकांमध्ये नाना पटोले यांनी जोश भरला. अनुसूचित जाती, जमाती यांच्यासह ओबीसी बांधवांनीही एकत्रित आल्यास त्यांच्या विकासासाठी मोठा हातभार लागू शकतो. आशा फाऊंडेशन व नॅशनल आदिवासी पिपल्स फेडरेशन मुरमाडी, सावरी, लाखनीच्या वतीने घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे परिसरातील नागरिकांनी कौतुक केले असून असे कार्यक्रम गावोगावी व्हावे, अशी आशा व्यक्त केली जात आहे.