शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

बहुजनांनी एकत्र येणे काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 22:38 IST

बहुजनांचे राज्य निर्माण करायचे असेल तर ओबीसी, अनुसूचित जनजाती, भटके आदी नागरीकांनी आता एकत्रित आल्याशिवाय बहुजनांचे राज्य निर्माण होणे शक्य नाही.

ठळक मुद्देनाना पटोले यांचे प्रतिपादन : लाखनीत संविधान दिवस, बिरसा मुंडा जयंती व भीम मेळावा उत्साहात, कार्यक्रमाला हजारो बहुजनांची हजेरी

आॅनलाईन लोकमतलाखनी : बहुजनांचे राज्य निर्माण करायचे असेल तर ओबीसी, अनुसूचित जनजाती, भटके आदी नागरीकांनी आता एकत्रित आल्याशिवाय बहुजनांचे राज्य निर्माण होणे शक्य नाही. बहुजनांची सत्ता आली पाहिजे. त्यासाठी तन, मन, धनाने शेवटपर्यंत लढणार आहे, असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले.एक आशा फाऊंडेशन व नॅशनल आदिवासी पिपल्स फेडरेशन मुरमाडी, सावरी, लाखनी यांच्या संयुक्त विद्यमाने समर्थ विद्यालयाच्या पटांगणावर संविधान दिन, बिरसा मुंडा जयंती आणि भीम मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मुख्य उद्घाटन सोहळ्याप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती रजनी आत्राम होत्या. प्रमुख अतिथी म्हणून माजी शिक्षणाणिकारी सी.एम. बागडे, हरीदास बोरकर, सुरेंद्र बन्सोड, अमोल कांबळे, मुकेश धुर्वे, शालिकराम बागडे, सरपंच सुनीता भालेराव, रजनी पडोळे, अमित भंडारे आदी उपस्थित होते. खासदार पटोले म्हणाले, यावेळी आयोजकांनी केलेल्या कार्यक्रमांची प्रशंसा करुन असे आयोजन होणे आवश्यक आहे. यातून बहुजन बांधवांना इतीहासाचे स्मरण होऊन त्यातून प्रेरणा मिळते. सी.एम. बागडे म्हणाले, संविधान भारत देशाचा श्वास आहे. आभार प्रदर्शन अश्विनी भिवगडे यांनी केले.तत्पुर्वी बिरसा मुंडा जयंती आणि संविधान दिवसाच्या पर्वावर भीम मेळाव्याच्या पृष्ठभूमिवर सकाळी पंचशील तसेच आदिवासी लोकांच्या सप्तरंगी ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. पंचशीलध्वजाचे ध्वजारोहण सी.एम. बागडे तर, आदिवासी बांधवांच्या सप्तरंगी ध्वजाचे ध्वजारोहण पंचायत समिती सभापती रजनी आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आदिवासी बांधवांची त्यांच्या परंपरेनुसार ध्वजाची पूजा संस्थेद्वारे करण्यात आली.त्रिशरण व पंचशील आणि बुद्ध, धम्म संघ वंदना भदंत आनंद यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. सकाळ सत्रातील कार्यक्रमाचा शेवट 'हे मानव तू मुखसे बोल, बुद्धम सरणमं गच्छामी' ने करण्यात आली. आदिवासी पध्दतीनुसार पूजा भुमक सुभाष धुर्वे आणि कैलास उईके यांनी पार पाडली. त्यावेळी रजनी आत्राम या प्रामुख्याने उपस्थित होत्या. यावेळी सुरज बागडे, हरीदास बोरकर, इंदू बागडे, सी.एम. बागडे, मुकेश धुर्वे, आशिष गणवीर, अमित भंडारे, शंकर उईके, कैलास परतेकी आदी उपस्थित होते.मुख्य उद्घाटन कार्यक्रमानंतर रात्री आदिवासी विद्यालय माडगी येथील मुलींनी सांस्कृतीक कार्यक्रम सादर झाले. आदिवासी नृत्य आकषर्णाचे केंद्र ठरले. यावेळी राज्यात आणि राष्ट्रीय पातळीवर स्पर्धेत भाग घेणाºया मुलींना स्मृती चिन्ह देवून गौरविण्यात आले.संगीतकार भुमेश गवई यांच्या गीतांचा बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आला. कार्यक्रमाला हजारो नागरीकांनी हजेरी लावली होती कार्यक्रमासाठी डॉ. गुणवंत इलमकार, धीरज बागडे, जयंत जांभुळकर, विनय रामटेके, मायकल वैद्य, नवनित बागडे, संजय पेंदाम, अजीत भंडारी, सुनिल रामटेके, मेघराज धुर्वे, रजत भालाधरे, भूषण गजभिये, मंगेश गेडाम आदींनी सहकार्य केले.युवकांची कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात हजेरी असल्यामुळे युवावर्ग बहुजनांच्या एकत्रिकरणासाठी एकत्रीत आल्याचे दिसून आले. या युवकांमध्ये नाना पटोले यांनी जोश भरला. अनुसूचित जाती, जमाती यांच्यासह ओबीसी बांधवांनीही एकत्रित आल्यास त्यांच्या विकासासाठी मोठा हातभार लागू शकतो. आशा फाऊंडेशन व नॅशनल आदिवासी पिपल्स फेडरेशन मुरमाडी, सावरी, लाखनीच्या वतीने घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे परिसरातील नागरिकांनी कौतुक केले असून असे कार्यक्रम गावोगावी व्हावे, अशी आशा व्यक्त केली जात आहे.