स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी राजकारणात उतरणे गरजेचे
By Admin | Updated: September 1, 2016 00:46 IST2016-09-01T00:46:39+5:302016-09-01T00:46:39+5:30
विदर्भ हे काँग्रेसच्या राजकारणाचे केंद्र राहिले होते व त्यांचा प्रभाव काही प्रमाणात दिसतो आहे. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी आता राजकारणात उतरण्याची आवश्यकता आहे,

स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी राजकारणात उतरणे गरजेचे
श्रीहरी अणे : भंडारा येथे जाहीर सभेत आवाहन
भंडारा : विदर्भ हे काँग्रेसच्या राजकारणाचे केंद्र राहिले होते व त्यांचा प्रभाव काही प्रमाणात दिसतो आहे. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी आता राजकारणात उतरण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन माजी महाधिवक्ता अॅड.श्रीहरी अणे यांनी केले.
विदर्भ राज्य आघाडीतर्फे विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये राजकीय जनजागृती अभियान सुरू असून सार्वजनिक वाचनालयात आयोजित सभेत ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अॅड.पद्माकर टेंभुर्णीकर होते. यावेळी अनिल जवादे, अॅड.निरज खांदेवाले, अॅड.सुरेन पारधी, जिल्हा संघटक रमाकांत पशिने, अविनाश पनके, प्रा.सुधाकर वडेटवार, केशव हुड, अरविंद ढोमणे, मार्कंड नंदेश्वर, अॅड.जयेश बोरकर, रामदास महाकाळकर, देवदास गभणे, माधव तिरपुडे, प्रणाली कटकवार, मधुबाला पशिने, अॅड.प्रमोद काटेखाये, अॅड.सतीश ठवकर, डॉ.गोविंद कोडवानी, छैलबिहारी अग्रवाल, गुरमित सिंग चावला, राहुल बडोले, संजय निनावे, मोरेश्वर कारेमोरे, अॅड.एम.एल. भुरे उपस्थित होते.
यावेळी ते म्हणाले, काँग्रेस, भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसचे विदर्भाला सहकार्य मिळत नाही. शिवसेनेचा विदर्भासाठी कायम विरोध असला तरी त्याला फारसे महत्व नाही. शिवसेनेचे प्रस्थ मुंबईपुरते सिमीत आहे आणि विदर्भात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दुसरा पर्याय नसल्याने नाईलाजास्तव काँग्रेस, भाजप व राष्ट्रवादीला निवडून देण्याविषयी वैदर्भीय जनतेला पर्याय नसतो. जेव्हा जनतेसमोर या पक्षांना विदर्भवादी वेगळा पर्याय देतील तेव्हा निश्चितच विदर्भातील जनता, काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी व शिवसेना यांना बाहेरचा रस्ता दाखविल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास आहे.
यावेळी अॅड.पद्माकर टेंभुर्णीकर म्हणाले, आता अंताची लढाई आहे हे सरकारने तसेच विरोधकांनी समजून घ्यावे. वातावरण तापले आहे. केवळ ठिणगी पडणे बाकी आहे. आम्ही सनदशीर मार्गाने विदर्भाचा लढा चालवित आहेत. परंतु त्यालाही काही मर्यादा व सीमा आहे. ज्यावेळेस या सीमा तुटून पडतील तेव्हा होणाऱ्या परिणामास विरोधक व सरकार स्वत:च जबाबदार राहतील हे सत्ताधाऱ्यांनी समजून घ्यावे, असे आव्हान अॅड.टेंभुर्णीकर यांनी केले. संचालन जिल्हा सचिव केशव हुड यांनी तर आभारप्रदर्शन प्रा.सुधाकर वडेटवार यांनी केले. (नगर प्रतिनिधी)