देशाला छत्रपतींच्या चरित्राची गरज
By Admin | Updated: June 14, 2014 01:37 IST2014-06-14T01:37:14+5:302014-06-14T01:37:14+5:30
ज्या वयात आपण कुठलेही निर्णय घेऊ शकत नाही, त्या वयात शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.

देशाला छत्रपतींच्या चरित्राची गरज
भंडारा : ज्या वयात आपण कुठलेही निर्णय घेऊ शकत नाही, त्या वयात शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. संघटन कौशल्य, निर्णय क्षमता, जिगरबाज नेतृत्व, कुशल प्रशासन, शत्रुला अचुकपणे ओळखण्याची शक्ती, विविध जात पंथाच्या माणसांचा गोतावळा यामुळे शिवाजी राजे हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यात यशस्वी ठरले. या देशावर होत असलेल्या आक्रमणांना तोंड देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे प्रांत संघटनमंत्री अरुण नेटके यांनी केले.
हिंदू रक्षा मंचच्या वतीने हिंदू साम्राज्य दिनाचे औचित्य साधुन शिवराज्यभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अतिथी म्हणून जिल्हा महामंत्री सुभाष आजबले, हिंदू रक्षा मंचाचे बंडू बारापात्रे, विहिंपचे जिल्हाध्यक्ष डॉ.संजय एकापुरे, भगीरथ धोटे मंचावर होते. प्रास्ताविकात डॉ. एकापुरे यांनी हिंदू रक्षा मंचची भूमिका मांडली.
सुभाष आजबले यांनी शिवाजी महाराजांच्या कार्याची पुनरावृत्ती करण्यासाठी त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालण्याचे आवाहन केले.
यावेळी नेटके म्हणाले, शिवाजी महाराजांचे अल्पावधीतील आयुष्य या मातृभूमिला अनेक गोष्टी देऊन गेले. महाराजांनी चार गोष्टींच्या माध्यमातून स्वत:ला सिद्ध केले आणि
हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. संघटनकौशल्य, निर्णयक्षमता, शत्रुला ओळखण्याची शक्ती आणि दुरदृष्टी ही त्यांची खरी ताकद होती. संघटन कौशल्याच्या जोरावर त्यांनी
कर्मठ मावळ्यांची ताकद उभी केली. त्यातूनच तानाजी माालुसुरे, बाजीप्रभु देशपांडे यांसारखे असंख्य सैनिक त्यांना शोधता आले. शत्रुला ज्या भाषेत समजेल त्या भाषेत उत्तर देण्याच्या नितीमुळे त्यांनी अशक्य गोष्टी शक्य करुन दाखविल्या. या देशातील धर्मांतरण, आतंकवाद, गोहत्या अशा अनेक समस्यांना जर संपवायचे असेल तर या देशातील
शिव चरित्रातून प्रेरणा घेऊन पुढे येण्याची गरज आहे.
यावेळी शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित गीते गोल्डी हुमणे या गायकाने गायली. याप्रसंगी आमदार निधीतून मंजूर झालेल्या हायमास्ट लाईटच्या बांधकामाचे भूमिपूजन
भगीरथ धोटे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी हिंदू रक्षा मंचचे बंडू बारापात्रे, सुधीर धकाते, अजय भोंगाडे, आशिष मोहबे, मंगेश राऊत, दीपक पराते, शशांक सोनेकर, गणेश निनावे, अमित गिऱ्हेपुंजे,
सारंग जोशी, राजन त्रिवेदी, बजरंग दलाचे चेतन भंडारी, युथ फॉर नॅॅशनचे उमेश निपाने, आदित्य मोटघरे, समीर मानापुरे, मोहित वडतकर व हिंदू रक्षा मंचचे कार्यकर्ते उपस्थित होते. आभारप्रदर्शन अतुल मानकर यांनी केले. (शहर प्रतिनिधी)