शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

दीक्षांत समारंभाच्या नावावर सावाळागोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 10:41 PM

दीक्षांत समारोहाच्या आयोजनाचे कारण पुढे करून एक अधिसूचना काढून २४ मार्चला होणाऱ्या ११८ परीक्षा पुढे ढकलण्याचे काम नागपूर विद्यापिठाने केले आहे. विद्यापिठाच्या या कारभाराचा फटका ६७० महाविद्यालयातील चार लाख ५० हजार विद्यार्थ्यांना बसणार आहे.

ठळक मुद्देसिनेट सदस्य उदापुरेंचा आरोप : राज्यपालांकडे तक्रार दाखल करण्याचा इशारा

आॅनलाईन लोकमतभंडारा : दीक्षांत समारोहाच्या आयोजनाचे कारण पुढे करून एक अधिसूचना काढून २४ मार्चला होणाऱ्या ११८ परीक्षा पुढे ढकलण्याचे काम नागपूर विद्यापिठाने केले आहे. विद्यापिठाच्या या कारभाराचा फटका ६७० महाविद्यालयातील चार लाख ५० हजार विद्यार्थ्यांना बसणार आहे. हे प्रकरण गंभीर असून विद्यार्थ्यांच्या हिताविरूद्ध आहे. यासंदर्भात विद्यापीठ प्रशासनाची तक्रार विद्यापिठाचे कुलपती तथा राज्यपाल यांच्याकडे करणार असल्याचे सिनेट सदस्य प्रविण उदापुरे यांनी पत्रपरिषदेत सांगितले.यावेळी उदापुरे म्हणाले, विद्यापीठ परीक्षेचे वेळापत्रक हे दोन महिन्यापूर्वीच ठरविले जाते. दिक्षांत समारंभ २४ मार्च रोजी आयोजित करण्यात आल्यामुळे ११८ परीक्षा ८ एप्रिल रोजी घेण्याची अधिसूचना २० मार्च रोजी काढण्यात आली.ही अधिसूचना नागपूर शहरातील वृत्तपत्रात आहे. सध्या विद्यार्थी परीक्षेत व्यस्त असल्यामुळे त्यांना ही अधिसुचना माहित नाही. त्यामुळे परीक्षेच्या दिवशी संपूर्ण परीक्षा केंद्रावर गोंधळाची परिस्थिती निर्माण होणार आहे. विद्यापिठाने पुढे ढकललेल्या परीक्षा ८ एप्रिल रोजी होणार असून ज्यांनी त्यादिवशी इतर ठिकाणी जाण्याचा किंवा परीक्षेचा कार्यक्रम ठरविला असल्यास किंवा एखाद्या विद्यार्थ्याने न्यायालयात दाद मागितल्यास संपूर्ण विद्यापीठ प्रशासन अडचणीत येण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.एकीकडे सेमेस्टर पॅटर्न हे विद्यार्थ्यांसाठी अडचणीचे शैक्षणिक धोरण राबविले जात असून त्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेवर प्रशासनावर ताण पडत आहे. एखादी राष्ट्रीय आपत्ती आल्यावर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास गृह विभागाच्या सल्ल्यानुसार किंवा विशेष आणिबाणीची परिस्थिती उद्भवली तेव्हाच परीक्षा पुढे ढकलल्या जातात. परंतुविद्यापिठाने या परीक्षा पुढे ढकलून काय साध्य केले आहे हा संशोधनाचा विषय आहे.दिक्षांत समारंभ महत्वाचा की, परीक्षा हा प्रश्न निर्माण झाला. विद्यापिठावर निवडून आलेला लोकप्रतिनिधी या नात्याने विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करता २४ मार्च रोजी दिक्षांत समारंभावर बहिष्कार टाकणार असल्याचा ईशाराही उदापुरे यांनी दिला आहे.