शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

चार वर्षानंतरही ‘जय’चे बेपत्ता होण्याचे गूढ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 5:00 AM

पवनी-कऱ्हांडला अभयारण्याचे आकर्षण ठरलेला जय वाघ १८ एप्रिल २०१६ रोजी अखेरचे दर्शन देवून बेपत्ता झाला. तो कधीच दिसला नाही. जय वाघ गोंदिया जिल्ह्यातील नागझिरा अभयारण्यातून पवनी तालुक्यातील डोंगर महादेव, खापरी, पाऊनगावच्या जंगलात जून २०१३ मध्ये दाखल झाला होता. त्यावेळी तो केवळ अडीच ते तीन वर्षाचा होता. येथील घनदाट विस्तीर्ण जंगलात तो रमला.

ठळक मुद्देपवनी-कºहांडला अभयारण्य : आशियाचा आयकॉन ठरलेल्या वाघ १८ एप्रिल २०१६ पासून झाला बेपत्ता

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : महाराष्ट्रातील सर्वात मोठा भारतातील क्रमांक दोनचा वाघ आणि आशियाचा आयकॉन ठरलेला जय नामक वाघ बेपत्ता होवून आता चार वर्ष झाली आहेत. परंतु वन्यप्रेमी, पर्यटक आणि सामान्य जनतेला जयचा विसर पडला नाही. रूबाबदार आणि देखणा जय वाघ बेपत्ता होण्याचे गुढ अद्याप कायम असून वनविभाग, गुप्तचर विभाग आणि राज्य सरकारलाही त्याचा शोध घेता आला नाही. आता उरल्या केवळ जय वाघाच्या आठवणी आणि सुरस कथा.पवनी-कऱ्हांडला अभयारण्याचे आकर्षण ठरलेला जय वाघ १८ एप्रिल २०१६ रोजी अखेरचे दर्शन देवून बेपत्ता झाला. तो कधीच दिसला नाही. जय वाघ गोंदिया जिल्ह्यातील नागझिरा अभयारण्यातून पवनी तालुक्यातील डोंगर महादेव, खापरी, पाऊनगावच्या जंगलात जून २०१३ मध्ये दाखल झाला होता. त्यावेळी तो केवळ अडीच ते तीन वर्षाचा होता. येथील घनदाट विस्तीर्ण जंगलात तो रमला. त्यानंतर या जंगलाचा समावेश उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यात करण्यात आला. काही दिवसातच जय या अभयारण्याचा हीरो ठरला. शेकडो पर्यटक जयची एक झलक पाहण्यासाठी येथे येत होते. आॅनलाईन बुकींगही मिळत नव्हते. अनेक जणांना येथे प्रतीक्षेत राहत होते. भारदस्त शरीरयस्टी, देखणेपणा, चेहऱ्याची सुंदरता व विलक्षण चपळाईमुळे त्याने पर्यटकांना भुरळ घातली. या जंगलावर त्याने आपले अधीराज्य निर्माण केले. अनेक वाघांना येथून पळवून लावले. एवढा दरारा जयचा होता. त्याच्यापासून जवळपास २४ छाव्यांना वाघीनींनी जन्म दिला. जय कुणाला घाबरत नव्हता. परंतु त्याने माणसावर कधी हल्ला केला नाही.जून २०१६ मध्ये जय अचानक बेपत्ता झाल्याची माहिती बाहेर येवू लागली. सुरूवातीला वनविभागाने कानावर हात ठेवले. पण थोड्याच दिवसात जय बेपत्ता झाल्याची माहिती वनविभागाला द्यावी लागली. अचानक बेपत्ता झालेला जय शेवटच्या कालावधीत पवनीजवळील बेरावा शिवारात आढळला होता. जयला लावलेल्या आयडीकॉलरची ही अखेरची नोंद ठरली. परंतु नंतर तो कुठे गेला, काय गेला याचा थांगपत्ता लागला नाही.मिशन जय सर्च मोहीम अपयशीवनविभागाने मिशन जय सर्च मोहिमेवर आपले सर्व लक्ष केंद्रीत केले होते. जयचे १८ एप्रिल २०१६ रोजी शेवटचे लोकेशन आढळून आले. विशेष म्हणजे जय आपला नेहमीचा मार्ग सोडून निघाला होता. ज्या शेतात जयच्या पायाचे ठसे आढळून आले, तेथून केवळ २०० फुटावर पवनी-नागपूर हा डांबरी रस्ता आहे. याच दिवशी म्हणजे १८ एप्रिलला अभयारण्याच्या पवनी वन्यजीव क्षेत्रातून डोंगरमहादेव परिसरातील जंगलात शेंड्यापिपरी नावाच्या बोडीत डुंबताना पर्यटकांना दिसला होता. त्यानंतर जय कधीच कुणाला आढळला नाही. आता केवळ जयच्या आठवणी उरल्या आहेत. जयची शोध मोहीम वनविभागाने का थांबविली, याचा विचार करण्याचीही गरज आहे.

टॅग्स :Tigerवाघ