शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
3
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
4
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
5
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
6
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
7
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
8
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
9
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
10
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
11
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
12
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
13
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
14
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
15
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
16
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
17
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
18
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
19
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
20
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्षानंतरही ‘जय’चे बेपत्ता होण्याचे गूढ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 05:00 IST

पवनी-कऱ्हांडला अभयारण्याचे आकर्षण ठरलेला जय वाघ १८ एप्रिल २०१६ रोजी अखेरचे दर्शन देवून बेपत्ता झाला. तो कधीच दिसला नाही. जय वाघ गोंदिया जिल्ह्यातील नागझिरा अभयारण्यातून पवनी तालुक्यातील डोंगर महादेव, खापरी, पाऊनगावच्या जंगलात जून २०१३ मध्ये दाखल झाला होता. त्यावेळी तो केवळ अडीच ते तीन वर्षाचा होता. येथील घनदाट विस्तीर्ण जंगलात तो रमला.

ठळक मुद्देपवनी-कºहांडला अभयारण्य : आशियाचा आयकॉन ठरलेल्या वाघ १८ एप्रिल २०१६ पासून झाला बेपत्ता

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : महाराष्ट्रातील सर्वात मोठा भारतातील क्रमांक दोनचा वाघ आणि आशियाचा आयकॉन ठरलेला जय नामक वाघ बेपत्ता होवून आता चार वर्ष झाली आहेत. परंतु वन्यप्रेमी, पर्यटक आणि सामान्य जनतेला जयचा विसर पडला नाही. रूबाबदार आणि देखणा जय वाघ बेपत्ता होण्याचे गुढ अद्याप कायम असून वनविभाग, गुप्तचर विभाग आणि राज्य सरकारलाही त्याचा शोध घेता आला नाही. आता उरल्या केवळ जय वाघाच्या आठवणी आणि सुरस कथा.पवनी-कऱ्हांडला अभयारण्याचे आकर्षण ठरलेला जय वाघ १८ एप्रिल २०१६ रोजी अखेरचे दर्शन देवून बेपत्ता झाला. तो कधीच दिसला नाही. जय वाघ गोंदिया जिल्ह्यातील नागझिरा अभयारण्यातून पवनी तालुक्यातील डोंगर महादेव, खापरी, पाऊनगावच्या जंगलात जून २०१३ मध्ये दाखल झाला होता. त्यावेळी तो केवळ अडीच ते तीन वर्षाचा होता. येथील घनदाट विस्तीर्ण जंगलात तो रमला. त्यानंतर या जंगलाचा समावेश उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यात करण्यात आला. काही दिवसातच जय या अभयारण्याचा हीरो ठरला. शेकडो पर्यटक जयची एक झलक पाहण्यासाठी येथे येत होते. आॅनलाईन बुकींगही मिळत नव्हते. अनेक जणांना येथे प्रतीक्षेत राहत होते. भारदस्त शरीरयस्टी, देखणेपणा, चेहऱ्याची सुंदरता व विलक्षण चपळाईमुळे त्याने पर्यटकांना भुरळ घातली. या जंगलावर त्याने आपले अधीराज्य निर्माण केले. अनेक वाघांना येथून पळवून लावले. एवढा दरारा जयचा होता. त्याच्यापासून जवळपास २४ छाव्यांना वाघीनींनी जन्म दिला. जय कुणाला घाबरत नव्हता. परंतु त्याने माणसावर कधी हल्ला केला नाही.जून २०१६ मध्ये जय अचानक बेपत्ता झाल्याची माहिती बाहेर येवू लागली. सुरूवातीला वनविभागाने कानावर हात ठेवले. पण थोड्याच दिवसात जय बेपत्ता झाल्याची माहिती वनविभागाला द्यावी लागली. अचानक बेपत्ता झालेला जय शेवटच्या कालावधीत पवनीजवळील बेरावा शिवारात आढळला होता. जयला लावलेल्या आयडीकॉलरची ही अखेरची नोंद ठरली. परंतु नंतर तो कुठे गेला, काय गेला याचा थांगपत्ता लागला नाही.मिशन जय सर्च मोहीम अपयशीवनविभागाने मिशन जय सर्च मोहिमेवर आपले सर्व लक्ष केंद्रीत केले होते. जयचे १८ एप्रिल २०१६ रोजी शेवटचे लोकेशन आढळून आले. विशेष म्हणजे जय आपला नेहमीचा मार्ग सोडून निघाला होता. ज्या शेतात जयच्या पायाचे ठसे आढळून आले, तेथून केवळ २०० फुटावर पवनी-नागपूर हा डांबरी रस्ता आहे. याच दिवशी म्हणजे १८ एप्रिलला अभयारण्याच्या पवनी वन्यजीव क्षेत्रातून डोंगरमहादेव परिसरातील जंगलात शेंड्यापिपरी नावाच्या बोडीत डुंबताना पर्यटकांना दिसला होता. त्यानंतर जय कधीच कुणाला आढळला नाही. आता केवळ जयच्या आठवणी उरल्या आहेत. जयची शोध मोहीम वनविभागाने का थांबविली, याचा विचार करण्याचीही गरज आहे.

टॅग्स :Tigerवाघ