शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: 'किंगमेकर' झाला 'किंग' ! नितीश कुमारांच्या JDU ची जोरदार मुसंडी, भाजपचीही उत्तम साथ
2
Bihar Election Result 2025: शिंदेसेनेच्या नेत्याचा जावई बिहार निवडणुकीत पिछाडीवर; JDU ची आघाडी
3
Bihar Election 2025 Result: प्रशांत किशोर यांचे ३ उमेदवार आघाडीवर; एक्झिट पोल खरे ठरणार?
4
'निगेटिव्ह' झाली इलॉन मस्क यांची नेटवर्थ; एका झटक्यात ₹१८,२०,२५,८५,५०,००० चा फटका
5
Stock Market Today: सुरुवातीच्या व्यवहारात १०० अंकांपेक्षा अधिक घसरला बाजार, २५,८०० च्या खाली निफ्टी
6
IND vs SA 1st Test : गिल पुन्हा अनलकी; अखेर बावुमानं संपवली दक्षिण आफ्रिकेची 'साडेसाती'
7
Bihar Election 2025 Result: सुरुवातीचे कल हाती; BJP-RJD मध्ये काँटे की टक्कर, NDA आघाडीवर
8
Bihar Election: सरकार स्थापन करण्यासाठी किती जागा आवश्यक? समजून घ्या बहुमताचं गणित!
9
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावं आल्यानं खळबळ
10
ICUमध्ये धर्मेंद्र आणि देओल कुटुंबाचा गुपचूप व्हिडीओ बनवणं पडलं महागात, हॉस्पिटलचा कर्मचारी अटकेत
11
माझे काही फोटो अश्लील पद्धतीने...; अचानक व्हायरल झाल्यावर गिरीजा ओकने व्यक्त केली चिंता
12
बंडखोरीवर उपाय: अर्ज भरल्यावर भाजप जाहीर करणार उमेदवारांची यादी; ८०% नावे निश्चित
13
जबरदस्त रिटर्न देईल 'ही' स्कीम, केवळ ₹५,००० ची गुंतवणूक देईल ₹२६ लाखांपेक्षा जास्त फंड; पाहा कॅलक्युलेशन
14
दिल्लीत स्फोट घडवणाऱ्यांना कडक इशारा; मास्टरमाईंड डॉ. उमरचे पुलवामातील घर IED स्फोटकांनी उडवले!
15
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
16
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
17
“अजित पवार सत्तेसाठी लाचार असल्याने ते सत्तेतून बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही”; काँग्रेसची टीका
18
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
19
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
20
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
Daily Top 2Weekly Top 5

चिखला, नाकाडोंगरीतील शेकडो झाडे मृत्यूच्या दाढेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 21:59 IST

एकच लक्ष्य ३३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प वनखात्याने उचलला आहे. परंतु सामाजिक वनीकरण विभागात वृक्ष लागवडीनंतर वृक्षांचे संवर्धन, संगोपन, व देखभालीकरीता पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करुन न दिल्याने शेकडो झाडे मरणासन्न स्थितीत आली आहेत. हा सर्व प्रकार तुमसर तालुक्यातील चिखला-सितासावंगी व नाकाडोंगरी- कवलेवाडा रस्त्याशेजारी दिसत आहे.

ठळक मुद्देमनुष्यबळाचा अभाव : सामाजिक वनीकरण विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : एकच लक्ष्य ३३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प वनखात्याने उचलला आहे. परंतु सामाजिक वनीकरण विभागात वृक्ष लागवडीनंतर वृक्षांचे संवर्धन, संगोपन, व देखभालीकरीता पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करुन न दिल्याने शेकडो झाडे मरणासन्न स्थितीत आली आहेत. हा सर्व प्रकार तुमसर तालुक्यातील चिखला-सितासावंगी व नाकाडोंगरी- कवलेवाडा रस्त्याशेजारी दिसत आहे.सामाजिक वनीकरण, वनविभाग तथा ग्रामपंचायतीतर्फे रिकाम्या, पडीक जागेवर वृक्ष लागवड मोहीम संपूर्ण राज्यात राबविली जात आहे. ३३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प वनविभागाने केला आहे. राज्याच्या वनमंत्र्यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. सामाजिक वनिकरण खात्यातर्फे तुमसर तालुक्यातील चिखला-सितासावंगी व नाकाडोंगरी-कवलेवाडा रस्त्याशेजारी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली. तीन ते पाच किमीच्या हा संपूर्ण परिसर आहे. वृक्ष लागवड करतांनी दोन ते तीन फुट अशी मोठी वृक्ष लावण्यात आली. वृक्ष लगावड केल्यानंतर शेकडो झाडे शेवटची घटना मोजत आहेत. वृक्ष लागवडीनंतर या झाडाकडे कुणी ढूंकून पाहिले नाही असे दिसून येते. माकडांनी या वृक्षांच्या अक्षरश: फडशा पाडल्या आहेत. संपूर्ण परिसर जंगलव्याप्त आहे. वृक्षांना नविन पालवी आल्यानंतर माकडांनी ती फस्त केली. वरची पालवी माकडांनी खाल्ल्याने केवळ मध्यभागी काडीवजा झाड तेवढे उभे आहे. जंगलव्याप्त परिसरात नविन झाडे माकडांचे खाद्य येथे ठरले आहे. वृक्ष लागवडीनंतर झाडांचे संरक्षणाकरिता येथे मनुष्यबळ उपलब्ध नाही.२०० झाडांकरीता एक चौकीदार असा नियम आहे, परंतु सामाजिक वनीकरणात सध्या मनुष्यबळाचा अभाव आहे. या संदर्भात सामाजिक वनीकरण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिल्यावर मनुष्यबळ वरिष्ठ स्तरावरुन उपलब्ध करुन देण्यात आले नाही. मनुष्यबळाकरिता स्वतंत्र निधी सामाजिक वनीकरणाने उपलब्ध करुन देण्याची गरज आहे.शासनाने वनविभाग ग्रामपंचायत व सामाजिक वनीकरणाने स्थानिक लोकसहभागातून झाडे संवर्धन करावी असे सांगण्यात येते, परंतु लोकसहभाग स्थानिक पातळीवर नगण्य आहे. ज्या विभागाने वृक्ष लागवड केली त्यांची जबाबदारी येथे ठरविण्यात आली आहे. मनुष्यबळ कमी असल्याने संबंधित खात्याचा त्यात नाईलाज आहे.केवळ वृक्ष लागवड करुन आकडे फुगवून सांगण्यात अर्थ नाही, तर शेकडो झाडे जीवंत ठेवून ती वाढली पाहिजे. तेव्हाच प्रत्यक्षात जंगल तयार होऊन पर्यावरणाचे रक्षण होईल. याकरिता शासनाने प्रत्यक्षात प्रभावी यंत्रणा उभी करण्याची गरज आहे.- डॉ. पंकज कारेमोरे, युवा काँग्रेस नेते, तुमसर