शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

चिखला, नाकाडोंगरीतील शेकडो झाडे मृत्यूच्या दाढेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 21:59 IST

एकच लक्ष्य ३३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प वनखात्याने उचलला आहे. परंतु सामाजिक वनीकरण विभागात वृक्ष लागवडीनंतर वृक्षांचे संवर्धन, संगोपन, व देखभालीकरीता पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करुन न दिल्याने शेकडो झाडे मरणासन्न स्थितीत आली आहेत. हा सर्व प्रकार तुमसर तालुक्यातील चिखला-सितासावंगी व नाकाडोंगरी- कवलेवाडा रस्त्याशेजारी दिसत आहे.

ठळक मुद्देमनुष्यबळाचा अभाव : सामाजिक वनीकरण विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : एकच लक्ष्य ३३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प वनखात्याने उचलला आहे. परंतु सामाजिक वनीकरण विभागात वृक्ष लागवडीनंतर वृक्षांचे संवर्धन, संगोपन, व देखभालीकरीता पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करुन न दिल्याने शेकडो झाडे मरणासन्न स्थितीत आली आहेत. हा सर्व प्रकार तुमसर तालुक्यातील चिखला-सितासावंगी व नाकाडोंगरी- कवलेवाडा रस्त्याशेजारी दिसत आहे.सामाजिक वनीकरण, वनविभाग तथा ग्रामपंचायतीतर्फे रिकाम्या, पडीक जागेवर वृक्ष लागवड मोहीम संपूर्ण राज्यात राबविली जात आहे. ३३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प वनविभागाने केला आहे. राज्याच्या वनमंत्र्यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. सामाजिक वनिकरण खात्यातर्फे तुमसर तालुक्यातील चिखला-सितासावंगी व नाकाडोंगरी-कवलेवाडा रस्त्याशेजारी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली. तीन ते पाच किमीच्या हा संपूर्ण परिसर आहे. वृक्ष लागवड करतांनी दोन ते तीन फुट अशी मोठी वृक्ष लावण्यात आली. वृक्ष लगावड केल्यानंतर शेकडो झाडे शेवटची घटना मोजत आहेत. वृक्ष लागवडीनंतर या झाडाकडे कुणी ढूंकून पाहिले नाही असे दिसून येते. माकडांनी या वृक्षांच्या अक्षरश: फडशा पाडल्या आहेत. संपूर्ण परिसर जंगलव्याप्त आहे. वृक्षांना नविन पालवी आल्यानंतर माकडांनी ती फस्त केली. वरची पालवी माकडांनी खाल्ल्याने केवळ मध्यभागी काडीवजा झाड तेवढे उभे आहे. जंगलव्याप्त परिसरात नविन झाडे माकडांचे खाद्य येथे ठरले आहे. वृक्ष लागवडीनंतर झाडांचे संरक्षणाकरिता येथे मनुष्यबळ उपलब्ध नाही.२०० झाडांकरीता एक चौकीदार असा नियम आहे, परंतु सामाजिक वनीकरणात सध्या मनुष्यबळाचा अभाव आहे. या संदर्भात सामाजिक वनीकरण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिल्यावर मनुष्यबळ वरिष्ठ स्तरावरुन उपलब्ध करुन देण्यात आले नाही. मनुष्यबळाकरिता स्वतंत्र निधी सामाजिक वनीकरणाने उपलब्ध करुन देण्याची गरज आहे.शासनाने वनविभाग ग्रामपंचायत व सामाजिक वनीकरणाने स्थानिक लोकसहभागातून झाडे संवर्धन करावी असे सांगण्यात येते, परंतु लोकसहभाग स्थानिक पातळीवर नगण्य आहे. ज्या विभागाने वृक्ष लागवड केली त्यांची जबाबदारी येथे ठरविण्यात आली आहे. मनुष्यबळ कमी असल्याने संबंधित खात्याचा त्यात नाईलाज आहे.केवळ वृक्ष लागवड करुन आकडे फुगवून सांगण्यात अर्थ नाही, तर शेकडो झाडे जीवंत ठेवून ती वाढली पाहिजे. तेव्हाच प्रत्यक्षात जंगल तयार होऊन पर्यावरणाचे रक्षण होईल. याकरिता शासनाने प्रत्यक्षात प्रभावी यंत्रणा उभी करण्याची गरज आहे.- डॉ. पंकज कारेमोरे, युवा काँग्रेस नेते, तुमसर