शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राणी संरक्षणासाठी जंगलालगतच्या विहिरींना जाळीचे आच्छादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 21:42 IST

Bhandara news बिबट्याच्या बछड्याच्या मृत्यूनंतर वनविभाग सतर्क झाला. मुख्य वनसंरक्षक कल्याणकुमार यांनी गराडा गावाला भेट देऊन परिसरातील सर्व विहिरींना जाळी लावण्याचे निर्देश दिले.त्यानुसार गराडाच्या साडेपाच किमी परिसरातील ३५ विहिरींना जाळी लावण्याचे काम करण्यात आले.

ठळक मुद्देभंडारा वनविभागाचा पुढाकारवाघांच्या दाेन बछड्यांच्या मृत्यूनंतर कामाला गती

लोकमत न्यूज नेटवर्क 

भंडारा : आजपर्यंत जंगलालगतच्या विहिरींमध्ये पडून अनेक वन्यप्राण्यांचा मृत्यू झाला आहे. पाण्याच्या शाेधात आलेल्या या वन्यजीवांचा नाहक बळी जाताे. महिनाभरापूर्वी सायफन विहिरीत पडून वाघाच्या दाेन बछड्यांचा मृत्यू झाला हाेता. यापूर्वीही असे अनेक प्रकार घडले आहेत. त्यामुळे वन्यजीवांच्या संरक्षणासाठी आता जंगलालगतच्या विहिरींना जाळीचे आच्छादन लावले जात आहे. भंडारा वनविभागाने यासाठी पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यात माेठ्या प्रमाणात जंगल असून, काेका, नवेगाव, नागझिरा आणि पवनी कऱ्हांडला अभयारण्य आहे. माेठ्या प्रमाणात वन्यजीवांचा मुक्त संचार आहे. अनेकदा वन्यजीव जंगलालगतच्या शेतशिवारातही येतात. यात हिंस्त्र आणि तृणभक्षी प्राण्यांचा समावेश असताे. अनेकदा पाण्याच्या शाेधात हे प्राणी विहिरीत पडून मृत्युमुखी पडतात. १२ मे राेजी भंडारा तालुक्यातील गराडा येथील उपसा सिंचन प्रकल्पाच्या कालव्याच्या सायफन विहिरीत पडून वाघाच्या दाेन नवजात मादी बछड्यांचा मृत्यू झाला हाेता. तसेच वर्षभरापूर्वी अड्याळ परिसरात बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू झाला हाेता. असे अनेक प्रकार घडत आहेत. बिबट्याच्या बछड्याच्या मृत्यूनंतर वनविभाग सतर्क झाला. मुख्य वनसंरक्षक कल्याणकुमार यांनी गराडा गावाला भेट देऊन परिसरातील सर्व विहिरींना जाळी लावण्याचे निर्देश दिले.त्यानुसार गराडाच्या साडेपाच किमी परिसरातील ३५ विहिरींना जाळी लावण्याचे काम करण्यात आले. ज्या सायफन टाकीत दाेन बछडे मृत्यूमुखी पडले हाेते, तेथे लाेखंडी जाळीचे आच्छादन लावण्यात आले आहे. निधी उपलब्धतेनुसार सर्व विहिरींना लाेखंडी जाळ्या लावल्या जाणार आहेत. शामाप्रसाद मुखर्जी ग्रामविकास समितीच्या माध्यमातून व्याघ्र प्रकल्पालगतच्या गावांमध्येही विहिरींवर जाळी लावली जात आहे. काेका अभयारण्यालगतच्या ४० ते ५० गावांत लाेखंडी जाळी लावण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यासाेबतच तुमसर तालुक्यातील नाकाडाेंगरी वनपरिक्षेत्रातही विहिरींना आच्छादन घालण्यात आले आहे. नवजात वन्यप्राणी विहिरीत पडून मृत्यूमुखी पडणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे.

वन्यजीवांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य

वाघाचा संचार असलेल्या परिसरात वनविभागाने गस्त वाढविली आहे. परिसरातील नागरिकांनाही वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वन्यजीवांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य देण्यात येत आहे. वन्यप्राणी दिसल्यास तत्काळ वनविभागाला माहिती देण्याचे आवाहन भंडाराचे उपवनसंरक्षक शिवराम भलावी यांनी केले आहे.

पाण्यात बुडून वन्यजीवांचा मृत्यू हाेऊ नये म्हणून वनविभागाने पुढाकार घेतला आहे. भंडारा तालुक्यातील गराडा परिसरातील ३२ विहिरांना सुरक्षा कठडे लावण्यात आले आहेत. निधी उपलब्ध हाेताच भंडारा वनपरिक्षेत्रातील जंगलालगतच्या सर्व विहिरींना लाेखंडी जाळ्या लावण्यात येतील.

- विवेक राजूरकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, भंडारा

टॅग्स :forest departmentवनविभाग