शहरं
Join us  
Trending Stories
1
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
2
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
3
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
4
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
5
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
7
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
8
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
9
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
10
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
11
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
12
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
13
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
14
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
15
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
16
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
17
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
18
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
19
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
20
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च

वन्यप्राणी संरक्षणासाठी जंगलालगतच्या विहिरींना जाळीचे आच्छादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 21:42 IST

Bhandara news बिबट्याच्या बछड्याच्या मृत्यूनंतर वनविभाग सतर्क झाला. मुख्य वनसंरक्षक कल्याणकुमार यांनी गराडा गावाला भेट देऊन परिसरातील सर्व विहिरींना जाळी लावण्याचे निर्देश दिले.त्यानुसार गराडाच्या साडेपाच किमी परिसरातील ३५ विहिरींना जाळी लावण्याचे काम करण्यात आले.

ठळक मुद्देभंडारा वनविभागाचा पुढाकारवाघांच्या दाेन बछड्यांच्या मृत्यूनंतर कामाला गती

लोकमत न्यूज नेटवर्क 

भंडारा : आजपर्यंत जंगलालगतच्या विहिरींमध्ये पडून अनेक वन्यप्राण्यांचा मृत्यू झाला आहे. पाण्याच्या शाेधात आलेल्या या वन्यजीवांचा नाहक बळी जाताे. महिनाभरापूर्वी सायफन विहिरीत पडून वाघाच्या दाेन बछड्यांचा मृत्यू झाला हाेता. यापूर्वीही असे अनेक प्रकार घडले आहेत. त्यामुळे वन्यजीवांच्या संरक्षणासाठी आता जंगलालगतच्या विहिरींना जाळीचे आच्छादन लावले जात आहे. भंडारा वनविभागाने यासाठी पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यात माेठ्या प्रमाणात जंगल असून, काेका, नवेगाव, नागझिरा आणि पवनी कऱ्हांडला अभयारण्य आहे. माेठ्या प्रमाणात वन्यजीवांचा मुक्त संचार आहे. अनेकदा वन्यजीव जंगलालगतच्या शेतशिवारातही येतात. यात हिंस्त्र आणि तृणभक्षी प्राण्यांचा समावेश असताे. अनेकदा पाण्याच्या शाेधात हे प्राणी विहिरीत पडून मृत्युमुखी पडतात. १२ मे राेजी भंडारा तालुक्यातील गराडा येथील उपसा सिंचन प्रकल्पाच्या कालव्याच्या सायफन विहिरीत पडून वाघाच्या दाेन नवजात मादी बछड्यांचा मृत्यू झाला हाेता. तसेच वर्षभरापूर्वी अड्याळ परिसरात बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू झाला हाेता. असे अनेक प्रकार घडत आहेत. बिबट्याच्या बछड्याच्या मृत्यूनंतर वनविभाग सतर्क झाला. मुख्य वनसंरक्षक कल्याणकुमार यांनी गराडा गावाला भेट देऊन परिसरातील सर्व विहिरींना जाळी लावण्याचे निर्देश दिले.त्यानुसार गराडाच्या साडेपाच किमी परिसरातील ३५ विहिरींना जाळी लावण्याचे काम करण्यात आले. ज्या सायफन टाकीत दाेन बछडे मृत्यूमुखी पडले हाेते, तेथे लाेखंडी जाळीचे आच्छादन लावण्यात आले आहे. निधी उपलब्धतेनुसार सर्व विहिरींना लाेखंडी जाळ्या लावल्या जाणार आहेत. शामाप्रसाद मुखर्जी ग्रामविकास समितीच्या माध्यमातून व्याघ्र प्रकल्पालगतच्या गावांमध्येही विहिरींवर जाळी लावली जात आहे. काेका अभयारण्यालगतच्या ४० ते ५० गावांत लाेखंडी जाळी लावण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यासाेबतच तुमसर तालुक्यातील नाकाडाेंगरी वनपरिक्षेत्रातही विहिरींना आच्छादन घालण्यात आले आहे. नवजात वन्यप्राणी विहिरीत पडून मृत्यूमुखी पडणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे.

वन्यजीवांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य

वाघाचा संचार असलेल्या परिसरात वनविभागाने गस्त वाढविली आहे. परिसरातील नागरिकांनाही वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वन्यजीवांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य देण्यात येत आहे. वन्यप्राणी दिसल्यास तत्काळ वनविभागाला माहिती देण्याचे आवाहन भंडाराचे उपवनसंरक्षक शिवराम भलावी यांनी केले आहे.

पाण्यात बुडून वन्यजीवांचा मृत्यू हाेऊ नये म्हणून वनविभागाने पुढाकार घेतला आहे. भंडारा तालुक्यातील गराडा परिसरातील ३२ विहिरांना सुरक्षा कठडे लावण्यात आले आहेत. निधी उपलब्ध हाेताच भंडारा वनपरिक्षेत्रातील जंगलालगतच्या सर्व विहिरींना लाेखंडी जाळ्या लावण्यात येतील.

- विवेक राजूरकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, भंडारा

टॅग्स :forest departmentवनविभाग