शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

पारा १२ अंशावर ; बोचऱ्या थंडीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 00:26 IST

जिल्ह्यात गार वारे वाहत असल्यामुळे जिल्हावासियांना बोचºया थंडीचा सामना करावा लागत आहे. २० डिसेबर रोजी पारा १२ अंश सेल्सियस नोंदविण्यात आला. थंडीमुळे अनेक नागरीकांच्या आरोग्यावर परीणाम झाला आहे.

ठळक मुद्देसर्दी - पडसे बळावले : आजारांपासून बचाव करण्याचा डॉक्टरांचा सल्ला, उबदार कपड्यांना मागणी वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात गार वारे वाहत असल्यामुळे जिल्हावासियांना बोचºया थंडीचा सामना करावा लागत आहे. २० डिसेबर रोजी पारा १२ अंश सेल्सियस नोंदविण्यात आला. थंडीमुळे अनेक नागरीकांच्या आरोग्यावर परीणाम झाला आहे.जिल्ह्यात सकाळपासूनच थंड वारे वाहत आहेत. या हवामानामुळे पहाटे दरम्यान कडाक्याची थंडी पडत असून दवबिंदू जमा होत आहेत. ग्रामीण भागासह आता शहरातही सायंकाळी शेकोट्या पेटविणे सुरू झाले आहे. रात्रीला शहरात थंडीमुळे वाहतुकीवर परिणाम जाणवत आहे. रस्ते निमर्नुष्य असतात. रात्री, पहाटेदरम्यान वाहनांची संख्या मार्गावर रोडावलेली दिसून येते. या थंडीमुळे नागरीकांची दिनचर्या सकाळी उशिरा सुरू होत आहे. शहरात ऊनी कापड घेण्यासाठी दुकानांमध्ये नागरीकांची झुंबळ होत आहे. थंडीमुळे नागरीकांच्या आरोग्यावर परीणाम झाला आहे. आज दिवसभर नागरिकांनी थंडीच्या बचवासाठी घोंगडे, स्वेटर, मफलर, कानटोपी शाल आदी उनी कापडांचा वापर केल्याचे दिसून आले़कारधा स्थित हवामान खात्याच्या नोंदीनुसार गुरुवारला सकाळी कमाल तापमान २१ तर किमान तापमान १२ आणि सायंकाळी कमाल तापमान २५ तर किमान तापमान १४ अंश सेल्सियस नोंदविण्यात आले. येत्या काही दिवसात पाºयामध्ये कमालिची घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.थंडीच्या दिवसांमध्ये शरीराच्या तापमानात घट होते. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे सर्दी, खोकला, ताप, अस्थमा, कफसारखे आजार बळावतात. आजारापासून बचाव करण्यासाठी गरम पाण्याचा वापर करावा. गरम कपडे वापरावेत. कोल्ड्रींक्स, डेअरी प्रॉडक्ट खाणे टाळावे. गरज भासल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.-डॉ. यशवंत लांजेवार,बालरोगतज्ज्ञ, भंडारा.वातावरणात बदलाने आजार बळावलेमागील चार, पाच दिवसांपासून थंडीचा जोर वाढू लागल्याने वातावरणात बदल झाला आहे. त्यामुळे तापासह सर्दी, खोकला, अस्थमाने डोके वर काढले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयासह खासगी दवाखान्यांमध्ये रुग्णांची गर्दी वाढली आहे. यात मुलांची संख्या अधिक आहे. जिल्ह्यात थंडी वाढू लागल्याने वातावरणात बदल होत आहे. सायंकाळपासून वातावरण गारठा जाणवत आहे. वातावरणातील बदलामुळे शहरावर व्हायरल फिव्हरचे सावट पसरले आहे.गुरुवारी जिल्हा सामान्य रुग्णालयातील वॉर्डांचा फेरफटका मारला असता, रुग्णांची मोठी गर्दी दिसून आली. सध्या शहरामध्ये विविध आजारांच्या साथीसह सर्दी, खोकला, अस्थमा, दमा आणि तापाचे आजार बळावले आहेत. लहान मुलांमध्ये आजारी पडण्याचे प्रमाण अधिक दिसून आले आहे. अचानक झालेल्या बदलामुळे आणि थंडीच्या दिवसांमध्ये बहुधा वृद्ध महिला, गर्भवती महिला, लहान मुलांमधील रोगप्रतिकारक शक्ती कमी होतात. त्यामुळे त्यांना विविध प्रकारच्या आजारांचा सामना करावा लागतो. एवढेच नाही तर शरीराच्या तापमानात कमालिची घट होते. शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. या दिवसांमध्ये धूम्रपान करणाºयांना दम्याचा त्रास जाणवतो. वृद्धांमध्ये ब्रोन्कील अस्थमा, अ‍ॅलर्जिक कफाचे प्रमाण वाढते. मधुमेहींना थंडीच्या दिवसांत प्रकृतीची काळजी घ्यावी लागते. थंडीचा परिणाम जाणवू लागल्यामुळे गत चार ते पाच दिवसांपासून जिल्हा सामान्य रुग्णालयासह खासगी दवाखान्यांमध्ये रुग्णांची गर्दी वाढत आहे. यामध्ये महिला व मुलांची संख्या अधिक आहे.

टॅग्स :weatherहवामान