शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
3
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
5
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
6
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
7
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
8
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
9
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
10
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
11
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
12
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
13
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
14
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
15
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
16
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
17
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
18
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले
19
मुंबईची राज्यात तिसऱ्या स्थानी झेप, गतवर्षीच्या तुलनेत एक टक्का वाढ
20
भाजप जिल्ह्याध्यक्षांची संभाव्य नावे प्रदेशाकडे ; नावांबाबत उत्सुकता; आठवडाभरात निर्णय

गावामध्ये कुपोषण, शहरात अतिपोषण; कोरोनाकाळात मुलांचे वजन वाढले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:39 IST

भंडारा : ग्रामीण भागात गरीब सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना पुरेसा सकस, पौष्टिक आहार मिळत नाही. यामुळे दिवसेंदिवस कुपोषणाचे प्रमाण वाढत ...

भंडारा : ग्रामीण भागात गरीब सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना पुरेसा सकस, पौष्टिक आहार मिळत नाही. यामुळे दिवसेंदिवस कुपोषणाचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. मात्र शहरात याउलट स्थिती आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लाॅकडाऊनमुळे गत दीड वर्षांपासून मुले घरातच आहेत. टीव्ही पाहणे आणि मोबाइलवर गेम खेळण्यातच मुले कित्येक तास घालवत आहेत. या काळात मैदानी खेळाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे मुलांचे वजन वाढले असून त्यांचे अतिपोषण होत असल्याचे दिसून येत आहे. कोरोना संसर्गामुळे गत दीड वर्षांपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे मुले घरातच आहेत. घरात राहून मुले कंटाळत असल्याने मोबाइल, टीव्ही पाहण्यात वेळ घालवतात. खाणे व टीव्ही मोबाइल असा दिनक्रम राहत आहे. अभ्यासक्रमही ऑनलाइन असल्याने घराबाहेर पडावे लागत नाही. त्यामुळे स्थूलता वाढत आहे. शिवाय इतर गंभीर आजारांना निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे. मुलांना जंक फुड खाण्याची सवय लावू नये. त्यांना सकस आहार देण्याकडे लक्ष द्यावे. प्रथिनेयुक्त आहार द्यावा तरच रोग प्रतिकारकशक्ती टिकून राहील, असे आवाहन बालरोग तज्ज्ञांनी केले आहे. जिल्ह्यातील कुपोषित बालकांची आकडेवारी लक्षात घेता दहा वर्षापूर्वीच्या आकडेवारीपेक्षा अत्यल्प असल्याचे दिसून येते.

पालकांची चिंता वाढली

मुले मोबाइल-टीव्ही समोरच बसून विविध प्रकारचे खाद्यपदार्थ खातात. टीव्ही पाहतानाच जेवण करतात. यात सगळे लक्ष टीव्हीकडे असते. मात्र त्यांना आपण किती खात आहोत याचे भान नसते. यातूनच कंबरेभोवती अनावश्यक चरबी वाढत आहे.

-वच्छला साखरे, पालक

कारणे काय?

शाळा बंद असल्याने मुले घरातच कोंडली गेली आहेत. टीव्ही-मोबाइलचा वापर वाढल्याने शारीरिक हालचाली कमी झाल्या आहेत.

मैदानी खेळाकडे दुर्लक्ष, शारीरिक शिक्षणाचे तास बंद आहेत. मैदा, तेलकट पदार्थ, जंकफुड खाणे वाढले आहे.

पोषण आहाराचा दुरुपयोग

कुपोषणमुक्तीसाठी शासन जनजागृती करून पोषण आहारावर कोट्यवधी रुपये खर्च करीत आहेत. मात्र हे आहार लाभार्थी सेवन न करता जनावरांना देत असल्याचे काही परिसरात दिसून आले.

शहरात स्थूलता ही नवी समस्या

पालक लहान मुलांच्या आरोग्याकडे लक्ष देत असतात. अनेक पालक मुलांना मैदानी खेळ, कराटे, डान्स क्लास लावत असतात. त्यामुळे मुलांचे वजनही नियंत्रणात राहत असते. मात्र सध्या मुले घरात टीव्ही मोबाइलमध्ये व्यस्त असल्याने स्थूलता ही नवीन समस्या निर्माण झाली आहे.

कोरोना संकटकाळामुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे मुले घरातच आहेत. मनोरंजनाची साधने म्हणून टीव्ही मोबाइलचा वापर वाढला आहे. पालकांनी मुलांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

तज्ज्ञ काय म्हणतात

मुले मोबाइल-टीव्हीसमोरच बसून विविध प्रकारचे खाद्यपदार्थ खातात. शरीराची हालचाल कमी होत आहे. त्यामुळे वजन वाढण्याचे प्रमाण वाढले आहे. पौष्टिक आहार व व्यायाम गरजेचे आहे.

-यशवंत लांजेवार, बालरोगतज्ज्ञ भंडारा

मैद्याचे पदार्थ, जंकफुड खाण्याचे पदार्थ वाढले. व्यायामाकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे स्थूलता वाढत आहे. भविष्यात आजारांचा धोका वाढण्याची शक्यता आहे. स्थूलतेमुळे चयापचय विकृती, थाॅयराईड, मधुमेह असे आजारही लहान मुलांमध्ये आढळून येत आहेत. योगा, व्यायाम गरजेचे आहे.

-डाॅ.देवेंद्र धांडे, लाखनी