मध्य प्रदेश सीमा प्रवेश बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 05:01 IST2020-03-24T05:00:00+5:302020-03-24T05:01:09+5:30
राज्यात कोरोना संसर्गाचा वाढता धोका थांबविण्यासाठी जिल्हा सीमेलगत असणाऱ्या बपेरा गावाशेजारील मोवाड आंतरराज्यीय सीमा बालाघाट जिल्हा प्रशासनाने बंद केली आहे. येथून जाणाऱ्या विविध चारचाकी व दुचाकी वाहनांची पोलीस कसून तपासणी करीत आहेत. मध्यप्रदेश राज्यातील अनेक मजूर रोजगाराच्या निमीत्ताने महाराष्ट्र राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद येथे येतात. मात्र सध्या कारोना संसर्गाच्या भितीने सर्व मजूर आपल्या मूळ गावी परतत असल्याने या मजुरांना आरोग्य तपासणीला सामोरे जावे लागत आहे.

मध्य प्रदेश सीमा प्रवेश बंदी
लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : राज्यात कोरोना संसर्गाचा वाढता धोका थांबविण्यासाठी जिल्हा सीमेलगत असणाऱ्या बपेरा गावाशेजारील मोवाड आंतरराज्यीय सीमा बालाघाट जिल्हा प्रशासनाने बंद केली आहे. येथून जाणाऱ्या विविध चारचाकी व दुचाकी वाहनांची पोलीस कसून तपासणी करीत आहेत.
मध्यप्रदेश राज्यातील अनेक मजूर रोजगाराच्या निमीत्ताने महाराष्ट्र राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद येथे येतात. मात्र सध्या कारोना संसर्गाच्या भितीने सर्व मजूर आपल्या मूळ गावी परतत असल्याने या मजुरांना आरोग्य तपासणीला सामोरे जावे लागत आहे. मध्यप्रदेशातील मजूर मिळेल त्या वाहनाने नागपूर, भंडारा, तुमसर येथून मध्यप्रदेशकडे रवाना होताना दिसून येत आहेत. काही जण वाहने मिळत नसल्याने तुमसर बपेरा राज्यमार्गावरुन १८ किमी अंतर पायी जाताना दिसून आले. कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे सिहोरा येथील गावकरी जिल्ह्याबाहेरून आलेल्या मजुरांना पाहून भीती व्यक्त करीत आहेत. गावातील सरपंचांना याबाबत तात्काळ माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलीस प्रशासनाच्या वतीने या मजुरांची चौकशी करून त्यांना पुढील प्रवासासाठी सहकार्य करण्यात आले. मात्र यातील अनेक नागरिकांची माहिती होत नसल्याने प्रशासन देखील अनभिज्ञ राहत आहेत.
बाहेरील नागरिकांची प्रशासनाला नोंद ठेवण्यामध्ये अडचणी येत आहेत. मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्हा प्रशासनाने मोवाड आंतरराज्य सीमेवर नागरिकांना सीमाबंदी केली आहे.
सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प धरणमार्ग सील करण्याचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती आहे. मध्यप्रदेश सरकारने आंतरराज्य सीमाबंदी केली मात्र भंडारा जिल्ह्यातील बपेरा आंतरराज्यीय सीमेवर पोलीसांकडून कोणतीही चौकशी करण्यात येत नाही.
पोलीस प्रशासनाकडून कोणतीही चौकशी होत नसल्याने बपेरा सीमा मोकाटच दिसून येत आहे. त्यामुळे येथून कोरोना संसर्ग झालेल्या आंतरराज्यीय रुग्ण येण्याची शक्यता नाकारता येत नाही. सिहोरा परिसरातील नागरिकांकडून बपेरा सीमेवरून येणाºया नागरिकांची तपासणी करण्याची मागणी होत आहे. आठवडी बाजार बंद करण्यात आल्यानंतर भाजीपाल्याची टंचाई जाणवत असल्याने परिसरात भाजीपाला खरेदी करिता अनेकजण शेतकऱ्यांच्या थेट शेतावर पोहचत आहेत.
कामे थांबल्याने मजूरवर्ग त्रस्त
तालुक्यात रोजगाराच्या संधी नसल्याने अनेकांचे उत्पन्न खालावले आहे. त्यातच कोरोना विषाणूचा संसर्गाने अनेकांना गत काही दिवसांपासून काम मिळालेले नाही. त्यामुळे परिसरातील शेतकºयांपासून ते व्यापाऱ्यांपर्यंत अनेकांनी कामे थांबविली आहेत. याचा फटका परिसरातील मजूर वर्गाला बसत असल्याचे काही मजुरांनी सांगितले.