यंत्राने हिरावली मजुरांची कामे
By Admin | Updated: July 16, 2014 00:01 IST2014-07-16T00:01:35+5:302014-07-16T00:01:35+5:30
आजचे युग हे यांत्रिक युग आहे. बरीच कामे ही यंत्राने केली जातात. त्यामुळे वेळेची व पैशाचीसुद्धा बचत होते व कामेही वेळेतच पार पडतात. त्यात हायटेक शेतीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावले असले

यंत्राने हिरावली मजुरांची कामे
पहेला : आजचे युग हे यांत्रिक युग आहे. बरीच कामे ही यंत्राने केली जातात. त्यामुळे वेळेची व पैशाचीसुद्धा बचत होते व कामेही वेळेतच पार पडतात. त्यात हायटेक शेतीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावले असले तरी इतर अनेक समस्यांमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
कोरडवाहू शेतीचे प्रमाण जास्त असल्याने या शेतीतून उत्पन्न घेण्यासाठी निसर्गावर अवलंबून राहावे लागते. त्यात दरवर्षी नैसर्गिक संकटे येत असल्याने शेतीचे गणित वजाबाकीचे झाले आहे. कोरडवाहू शेतीत पाहिजे तसे उत्पादन होत नाही. त्यात मजुरीचे वाढलेले दर, पाण्याची कमतरता, वेळेवर मजूर मिळत नाही, आदी कारणामुळे उत्पादन कमी व खर्च जास्त होत असतो.
तेव्हा यंत्राने रोवणी केली असता उत्पादन खर्च कमी येतो. त्यातच लागवड खर्चसुद्धा कमी, रोपांची नियंत्रित लागवड, आंतर मशागत सोयीचे, बियाणे कमी व मजुरीचा खर्चसुद्धा कमी येतो. तसेच प्रकल्प संचालक आत्मा भंडाराच्या प्रज्ञा गोडघाटे, उपविभागीय कृषी अधिकारी सिद्धार्थ लोखंडे, तालुका कृषी अधिकारी सुनील सावजी, मंडळ कृषी अधिकारी पहेलाचे सुरेश गणवीर, सरपंच गायत्री बारस्कर, साई हळद उत्पादक शेतकरी बचत गटाचे अध्यक्ष भदू कायते व गटातील इतर शेतकरी, कृषी सहायक प्रकाश निंबार्ते, कृषी सहायक कैलास भोंडे इत्यादी उपस्थित होते.
विशेष म्हणजे पहेला येथील या शेतकरी बचत गटाला यंत्राणे रोवणी करण्याकरिता विशेष मार्गदर्शन कृषी सहायक निंबार्ते व भोंडे यांनी केले. (वार्ताहर)