बंदीच्या नावावर ग्राहकांची लूट
By Admin | Updated: September 6, 2015 00:30 IST2015-09-06T00:30:00+5:302015-09-06T00:30:00+5:30
राज्यात विविध पेय व खाद्य पदाथार्चे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. त्यात देश-विदेशातील विविध कंपन्या आपल्या मालाची जास्त विक्री व्हावी, ...

बंदीच्या नावावर ग्राहकांची लूट
प्रशासनाचे दुर्लक्ष :खाद्य पदार्थ व गुटख्याची विक्री
लाखनी : राज्यात विविध पेय व खाद्य पदाथार्चे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. त्यात देश-विदेशातील विविध कंपन्या आपल्या मालाची जास्त विक्री व्हावी, यासाठी विविध माध्यमांद्वारे वस्तू व पेयजलाची जाहिरात करुन आकर्षित करतात. गुटखा विक्रीवर शासनाने बंदी घातली आहे. तरीसुध्दा गुटखाची सर्रास विक्री केली जात आहे.
नामांकित कंपनीद्वारे निर्मित वस्तू गाव खेड्यात पोहचल्या असून काही महिने अल्पदरात नफा-तोटा सहन करत मालाची विक्री केली जात आहे. त्यानंतर खाद्य पदार्थ वा पेयजल विक्री बंदीच्या नावावर जादा दर आकारून ग्राहकांची लूटमार केली जात आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. जिल्ह्यात मागील कित्येक वर्षांपासून सुगंधित तंबाखूची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे. मात्र संबंधित अधिकाऱ्यांच्या थातुरमातूर कामामुळे परिस्थिती जैसे थे दिसून येत आहे. त्यात बंदीच्या निर्णयामुळे ग्राहकांना एकप्रकारचे वेठीस धरल्याचे दिसून येत आहे. चिल्लर व थोक व्यापाऱ्यांद्वारे भाववाढ होत असून श्रीमंत बनण्याच्या लालसेपोटी मालाची दुप्पटीने विक्री केली जात आहे. यात ग्राहकांना आर्थिक कोंडीत पकडण्यात येत आहे. सुगंधित तंबाखूवर बंदी असली याची सर्रास विक्री सुरू आहे. यात सुगंधित तंबाखुचा खर्रा २० रूपयाला विकला जात आहे. त्यामुळे सामान्य ग्राहकांची लूट होत आहे. त्यामुळे शासनाच्या बंदीचा काय फायदा असा सवाल नागरिकांनी केला आहे. (तालुका प्रतिनिधी)