ग्रामपंचायतला ठोकले कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 05:00 IST2019-12-31T05:00:00+5:302019-12-31T05:00:30+5:30
गावकऱ्यांच्या चर्चेनुसार ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात तसेच अंतर्गत नाराजीतून त्यांनी ग्रामपंचायत फाटकाला कुलूप लावल्याची बोलले जात आहे. गावात अनेकदा ग्रामपंचायत बंदच राहते. त्याचा नाहक त्रास गावातील नागरिकांना होत असतो. शासकीय योजनांसाठी सरपंच तसेच ग्रामपंचायत प्रशासनाकडून ग्रामपंचायत हॉल उपलब्ध करुन दिला जात नाही.

ग्रामपंचायतला ठोकले कुलूप
लोकमत न्यूज नेटवर्क
खरबी (नाका) : भंडारा तालुक्यातील खरबी नाका येथे ग्रामपंचायत सदस्य सुधीरकुमार मस्के यांनी कोणतीही पूर्वकल्पना न देता ग्रामपंचायतच्या फाटकाला कुलूप ठोकले. ही घटना सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली.
गावकऱ्यांच्या चर्चेनुसार ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात तसेच अंतर्गत नाराजीतून त्यांनी ग्रामपंचायत फाटकाला कुलूप लावल्याची बोलले जात आहे. गावात अनेकदा ग्रामपंचायत बंदच राहते. त्याचा नाहक त्रास गावातील नागरिकांना होत असतो. शासकीय योजनांसाठी सरपंच तसेच ग्रामपंचायत प्रशासनाकडून ग्रामपंचायत हॉल उपलब्ध करुन दिला जात नाही. राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानातून गावकऱ्यांचा तसेच महिलांचा विकास करण्यासाठी पंचायत समितीमार्फत अभियान राबविले जात आहे. मात्र यासाठीही ग्रामपचांयतकडून हॉल मिळत नसल्याची ओरड होत आहे. ग्रामपंचायत गावकºयांच्या विकासासाठी का? पदाधिकाऱ्यांच्या हितासाठी अशा चर्चेला गावात उत आला आहे. ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात गावात नाराजीचा सुर उमटत आहे. यातूनच फाटकाला कुलूप ठोकले असल्याची चर्चा गावात रंगत आहे. याबाबत मस्के यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होवू शकला नाही. गावातील महिला सरपंच रत्नमाला वाडीभस्मे यांनी सुधीरकुमार मस्के यांच्याशी संपर्क साधून भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अन्य कोणत्याही सदस्यांच्यादेखील ते संपर्कात नसल्याने अधिक माहिती मिळू शकली नाही.
नागरिक संतप्त
सरकारने ग्रामपंचायत मार्फत गावाचा विकास करण्याचे ठरविले असले तरीही ग्रामपंचायतमार्फत अनेक कामासाठी अडथळा निर्माण होत असल्याने गावकºयांमधून संतप्त वातावरण निर्माण झाले आहे.