नागरिकांना भारनियमनाचा शॉक

By Admin | Updated: June 9, 2014 23:29 IST2014-06-09T23:29:20+5:302014-06-09T23:29:20+5:30

सिहोरा परिसरातील नागरिकांना भारनियमनातून मुक्तता करण्यासाठी सिंगल फेज योजना देण्यात आली. मनात नसतानाही वीज ग्राहकांनी या योजनेला साथ दिली. परंतु आता याच परिसरात दिवस

Load Shock of Citizens | नागरिकांना भारनियमनाचा शॉक

नागरिकांना भारनियमनाचा शॉक

चुल्हाड (सिहोरा) : सिहोरा परिसरातील नागरिकांना भारनियमनातून मुक्तता करण्यासाठी सिंगल फेज योजना देण्यात आली. मनात नसतानाही वीज ग्राहकांनी या योजनेला साथ दिली. परंतु आता याच परिसरात दिवस रात्र नागरिकांना भारनियमनाचा शॉक दिला जात असल्याने असंतोष खदखदत आहे.
सिहोरा परिसरात नागरिकांना वीज पुरवठा करण्यासाठी ३३/११ केव्हीचे विद्युत उपकेंद्र आहे. या उपकेंद्र अंतर्गत ४७ गावात वीजपुरवठा होत आहे. घरगुती वीज ग्राहक आणि शेतकरी यांना वीज पुरवठा करण्यासाठी स्वतंत्र विद्युत ट्रान्सफार्मरची उभारणी करण्यात आली आहे. नियोजनबद्ध कृती आराखडा वीज वितरण कंपनीने तयार केला आहे. स्वतंत्र विद्युत पुरवठा करण्यासाठी कंपनीने कोट्यवधीचे खर्चांंना मंजुरी दिली आहे. गावागावात नवे खांब आणि नवीन विद्युत ट्रान्सफार्मर लावण्यात येत आहेत. असे असतानाही विजेचा लपंडाव सुरू आहे. गोंडीटोला आणि देवरी(देव) गावात अघोषित भारनियमन सुरू आहे. रोज सायंकाळी विद्युत ट्रान्सफार्मर मध्ये बिघाड होत आहे. रात्र-रात्र वीज पुरवठा गावकर्‍यांना प्राप्त होत नाही. हा कृत्रिम प्रकार गावात सुरू आहे. खर्‍या कारणांचा शोध वीज वितरण कंपनीचे शाखा अभियंते घेत नाहीत, असा आरोप आता गावकरी करीत आहेत.
या परिसरात  सिंगल फेज योजना सुरू करण्यात आली आहे.  गावांना भारनियमनातून मुक्त करण्यासाठी ही योजना क्रियान्वित करण्यात आली आहे. या योजनेत वीजपुरवठा सुरू असताना बल्ब हे टीमटीम प्रकाश देत असतात. पंखे आजारी असल्यासारखे फिरत आहेत.  कुलरची अवस्था सांगता येत नाही.  अशी नाकी नऊ आणणारी योजना अली तरी नागरिकांनी या योजनेला प्रतिसाद दिला आहे. एक तास सुरळीत नागरिकांना वीज पुरवठा प्राप्त होत असल्याने तक्रारी तथा बोंबाबोंब नाही.
सिंगलफेज योजना भारनियमनातून मुक्ती देणारी असल्याने नागरिकांनी साथ दिली आहे. सध्या स्थित भारनियमनात या योजनेला समाविष्ट करण्यात आले आहे. वीज वितरण कंपनीने भारनियमनाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यात ४ तासाचे भारनियमन आहे. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार या दिवशी सकाळी ८ ते १0  आणि दुपारी २ ते ४ असा कालावधी आहे. याशिवाय गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार सकाळी १0 ते १२ व दुपारी ४ ते ६ अशी समयसारणी आहे. सिंगल फेज योजनेला वीज वितरण कंपनी हरताळ फासत असल्याचा प्रकार निदर्शनास आलेला आहे. नियम, निकष बाजूला ठेवून हा भारनियमन केला जात आहे. यामुळे परिसरवासी भारनियमन विरोधात मोठय़ा आंदोलनाच्या तयारीत आहेत.
सिंगल फेज योजनेत घरगुती वीज ग्राहकांचे  भारनियमन लचके तोडत आहे. या कालावधीत नागरिक  हाय-हाय करीत आहेत. तर थ्री फेज वीज पुरवठा होणार्‍या शेतकर्‍यांची काय अवस्था असेल याची कल्पना करता येत नाही. वीज पुरवठ्याने सिंचीत पंप कधी सुरु आणि कधी बंद होतात हे कळायला मार्ग नाही. (वार्ताहर)

Web Title: Load Shock of Citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.