शहरं
Join us  
Trending Stories
1
आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...'
2
१० टोलनाक्यांवर नवीन टोल प्रणाली सुरु; चाचणीनंतर वर्षभरात देशभर...; गडकरींची लोकसभेला माहिती
3
आता 'या' राज्यात महिलांच्या खात्यात 2100 नाही, थेट 6300 रुपये जमा होणार! सरकारचा मोठा निर्णय, खुद्द मुख्यमंत्र्यांनीच सांगितला नवा 'प्लॅन'
4
Travel : पुतिन यांच्या रशियात फिरायला जायचा विचार करताय? किती खर्च येईल आणि कुठे कुठे फिराल? जाणून घ्या..
5
“महायुती सरकार बौद्धिक, आर्थिक दिवाळखोरीत; शेतकरी, लाडक्या बहिणींना फसवले”: हर्षवर्धन सपकाळ
6
30 दिवस, 14000 उड्डाणे रद्द, Indigo अडचणीत येण्याचे काय कारण? परिस्थिती कधी सुधारेल?
7
भाईंदरमध्ये मराठी माणसाला फ्लॅट नाकारला? जैन, मारवाडी, ब्राह्मण असाल तरच घर; बिल्डर लॉबीचा मनमानी कारभार
8
मोबाईलच्या चार्जरमुळे मुलाला लागला शॉक; तुमच्यासोबतही घडू शकते दुर्घटना! 'या' चुका आधीच टाळा
9
FD पेक्षा जास्त परतावा देणाऱ्या 'या' ३ सरकारी योजना: तुमचे भविष्य होईल सुरक्षित, टॅक्समध्येही मोठी सूट!
10
वैभव सूर्यवंशीने केली अर्जुन तेंडुलकरची जोरदार धुलाई, ४ चौकार-४ षटकारांंसह ठोकले ४६ धावा
11
Video - "राहुल गांधींनी भाजपामध्ये सामील व्हावं, देवाने तुम्हाला..."; कंगना राणौतचा खोचक सल्ला
12
पंतप्रधान मोदींसोबत कारमध्ये काय चर्चा झाली? पुतिन यांनी सांगितला चीनमधील 'तो' किस्सा...
13
"आम्ही कठीण प्रसंगातून जात आहोत...", भावाचं लग्न पुढे ढकलल्यानंतर पलक मुच्छलची प्रतिक्रिया
14
२००० मंत्र, २०० वर्ष असाध्य; १९ वर्षीय देवव्रतने ५० दिवसात केलेले दंडक्रम पारायण नेमके काय?
15
गुगल सर्चवर काय काय शोधत होते भारतीय? आत्ताची धर्मेंद्र यांच्या मृत्यूची अफवा ते जानेवारीपर्यंत...
16
तुमचा खिसा हलका होणार! मोबाईल, टीव्ही, एसी आणि गाड्यांच्या दरात ३ ते १० टक्क्यांची वाढ अटळ
17
वक्री गुरूचा गजकेसरी राजयोग: १० राशींना सुख-सुबत्ता, धनलक्ष्मी भरघोस देईल; ५४ तास वरदान काळ!
18
AUS vs ENG : ऑस्ट्रेलियन सुंदरीचा 'तो' मेसेज अन् अखेर इंग्लंडच्या जो रुटचा शतकी दुष्काळ संपला!
19
पुतिन फक्त लँडलाइन का वापरतात? स्मार्टफोन टाळण्यामागे आहे भीती; हातही लावत नाहीत
20
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक! IT शेअर्सच्या बळावर सेन्सेक्स-निफ्टी हिरव्या रंगात बंद; टॉप गेनर्स-लूजर्स
Daily Top 2Weekly Top 5

जीवनदायिनी चुलबंद नदीचे पात्र पडले कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 00:52 IST

तालुक्यातील चुलबंद ही प्रमुख नदी आहे . लाखांदूर तालुक्याची जीवनदायिनी म्हणून ही चुलबंदला ओळखले जाते. कारण पाण्यासाठी जास्तीत जास्त गावे या नदीवरच अवलंबून आहेत. पावसाळ्यात या नदीला भरपूर पूर असतो मात्र आजघडीला ती स्वत: तहानलेली आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष । वीटभट्टी, टरबुज लागवड व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : तालुक्यातील चुलबंद ही प्रमुख नदी आहे . लाखांदूर तालुक्याची जीवनदायिनी म्हणून ही चुलबंदला ओळखले जाते. कारण पाण्यासाठी जास्तीत जास्त गावे या नदीवरच अवलंबून आहेत. पावसाळ्यात या नदीला भरपूर पूर असतो मात्र आजघडीला ती स्वत: तहानलेली आहे.या नदीच्या काठावर तालुक्यातील चप्राड, असोला, भागडी, चिचोली, मांढळ, दांडेगाव, धमार्पुरी, कुंभली यांसारखी अनेक गावे आहेत. ही गावे नदीतील पाण्यावरच पिण्याच्या पाण्यासाठी, वापरासाठी, जनावरांसाठी तसेच सिंचनासाठी अवलंबून आहेत.या वर्षी पडलेला अपुरा पाऊस व प्रशासनामार्फत पाण्याचे नियोजन न केल्यामुळे ही नदी स्वत: तहानलेली आहे. नदी काठावरील मासेमारी बांधवांच्या व्यवसायावर कुºहाड चालली आहे. उन्हाळ्यात नदी पात्रात तरबूज यांची लागवड पाण्याअभावी कोलमडून पडली आहे तर विटा व्यवसाय थंड बस्त्यात आहे.या गावाच्या जवळील छोटी-मोठी खेडे सुद्धा पिण्याच्या पाण्यासाठी नदीकाठावरील गावावरच अवलंबून आहेत. मात्र नदीच तहानलेली असल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे.तालुक्यातील मडेघाट या गावात पिण्याचे पाणी लाखांदूर वरून येते मात्र लाखांदूरातच पाण्याची समस्या निर्माण झाल्याने मडेघाटचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे मडेघाटातील लोक पाण्यासाठी भटकंती करताना दिसत आहेत. अशीच समस्या तालुक्यातील अनेक गावांत दिसून येत आहे मात्र प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष आहे.नदीपात्रातील पाणी कमी असल्यामुळे जमिनीखालील पाण्याची पातळी खोलवर गेली आहे .त्यामुळे हातपंप , विहिरी यांना पाणी दिसेनासा झालाय. मात्र चुलबंद नदी पात्राच्या जवळच भंडारा जिल्ह्यात इंदिरासागर प्रकल्प तर गोंदिया जिल्ह्यात ईटीयाडोह या प्रकल्पांत भरपूर जलसाठा आहे. दोन्ही प्रकल्पांपासून लाखांदूर तालुक्यात कालवे काढले आहेत. मात्र अद्यापही तिथून पाणीपुरवठा सुरू केलेला नाही. जर या कालव्यांद्वारे चुलबंद नदीपात्रात पाणी आणले तर वाटेतील गावांची पाण्याची समस्या सुटू शकेल व चुलबंद नदीची सुद्धा तहान भागू शकेल अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.टँकरमुक्त जिल्हाभंडारा जिल्हा टँकरमुक्त जिल्हा म्हणून नोंद आहे. मात्र आजही जिल्ह्यातील काही गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जातो. मग टँकरमुक्त जिल्हा म्हणावे तरी कशाला, असा सवाल आपसुकच निर्माण होतो. सिंचन व्यवस्था नसल्याने शेतकऱ्यांना त्रास तर होतोच शिवाय शुद्ध पाण्यासाठीही नागरिकांना भटकावे लागत आहे.पाण्याचे नियोजन करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची आहे. जिल्ह्यातील चुलबंद, सुर नदीचे पात्र दरवर्षी कोरडे पडले. तीन ते चार महिने पाण्यासाठी नागरिकांची पायपीट होते. या दोन्ही उपनद्यांवर यथोचित ठिकाणी बंधारे बांधणे गरजचे आहे.-मो.सईद शेख, पर्यावरण तज्ज्ञ, भंडारा

टॅग्स :water shortageपाणीटंचाईriverनदी