शहरं
Join us  
Trending Stories
1
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
2
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
3
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
4
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
5
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
6
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
7
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
8
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
9
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
10
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
11
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
12
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
13
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
14
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
15
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
16
'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी
17
प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली! कार्बन उत्सर्जनात चीन नंबर १, भारत कितव्या क्रमांकावर? आकडेवारी पाहून बसेल धक्का
18
पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?
19
Budh Gochar 2025: दसऱ्याला बाराही राशी सौभाग्याचे सोने लुटणार, बुध गोचर भाग्य पालटणार
20
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश

जीवनदायिनी चुलबंद नदीचे पात्र पडले कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 00:52 IST

तालुक्यातील चुलबंद ही प्रमुख नदी आहे . लाखांदूर तालुक्याची जीवनदायिनी म्हणून ही चुलबंदला ओळखले जाते. कारण पाण्यासाठी जास्तीत जास्त गावे या नदीवरच अवलंबून आहेत. पावसाळ्यात या नदीला भरपूर पूर असतो मात्र आजघडीला ती स्वत: तहानलेली आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष । वीटभट्टी, टरबुज लागवड व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : तालुक्यातील चुलबंद ही प्रमुख नदी आहे . लाखांदूर तालुक्याची जीवनदायिनी म्हणून ही चुलबंदला ओळखले जाते. कारण पाण्यासाठी जास्तीत जास्त गावे या नदीवरच अवलंबून आहेत. पावसाळ्यात या नदीला भरपूर पूर असतो मात्र आजघडीला ती स्वत: तहानलेली आहे.या नदीच्या काठावर तालुक्यातील चप्राड, असोला, भागडी, चिचोली, मांढळ, दांडेगाव, धमार्पुरी, कुंभली यांसारखी अनेक गावे आहेत. ही गावे नदीतील पाण्यावरच पिण्याच्या पाण्यासाठी, वापरासाठी, जनावरांसाठी तसेच सिंचनासाठी अवलंबून आहेत.या वर्षी पडलेला अपुरा पाऊस व प्रशासनामार्फत पाण्याचे नियोजन न केल्यामुळे ही नदी स्वत: तहानलेली आहे. नदी काठावरील मासेमारी बांधवांच्या व्यवसायावर कुºहाड चालली आहे. उन्हाळ्यात नदी पात्रात तरबूज यांची लागवड पाण्याअभावी कोलमडून पडली आहे तर विटा व्यवसाय थंड बस्त्यात आहे.या गावाच्या जवळील छोटी-मोठी खेडे सुद्धा पिण्याच्या पाण्यासाठी नदीकाठावरील गावावरच अवलंबून आहेत. मात्र नदीच तहानलेली असल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे.तालुक्यातील मडेघाट या गावात पिण्याचे पाणी लाखांदूर वरून येते मात्र लाखांदूरातच पाण्याची समस्या निर्माण झाल्याने मडेघाटचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे मडेघाटातील लोक पाण्यासाठी भटकंती करताना दिसत आहेत. अशीच समस्या तालुक्यातील अनेक गावांत दिसून येत आहे मात्र प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष आहे.नदीपात्रातील पाणी कमी असल्यामुळे जमिनीखालील पाण्याची पातळी खोलवर गेली आहे .त्यामुळे हातपंप , विहिरी यांना पाणी दिसेनासा झालाय. मात्र चुलबंद नदी पात्राच्या जवळच भंडारा जिल्ह्यात इंदिरासागर प्रकल्प तर गोंदिया जिल्ह्यात ईटीयाडोह या प्रकल्पांत भरपूर जलसाठा आहे. दोन्ही प्रकल्पांपासून लाखांदूर तालुक्यात कालवे काढले आहेत. मात्र अद्यापही तिथून पाणीपुरवठा सुरू केलेला नाही. जर या कालव्यांद्वारे चुलबंद नदीपात्रात पाणी आणले तर वाटेतील गावांची पाण्याची समस्या सुटू शकेल व चुलबंद नदीची सुद्धा तहान भागू शकेल अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.टँकरमुक्त जिल्हाभंडारा जिल्हा टँकरमुक्त जिल्हा म्हणून नोंद आहे. मात्र आजही जिल्ह्यातील काही गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जातो. मग टँकरमुक्त जिल्हा म्हणावे तरी कशाला, असा सवाल आपसुकच निर्माण होतो. सिंचन व्यवस्था नसल्याने शेतकऱ्यांना त्रास तर होतोच शिवाय शुद्ध पाण्यासाठीही नागरिकांना भटकावे लागत आहे.पाण्याचे नियोजन करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची आहे. जिल्ह्यातील चुलबंद, सुर नदीचे पात्र दरवर्षी कोरडे पडले. तीन ते चार महिने पाण्यासाठी नागरिकांची पायपीट होते. या दोन्ही उपनद्यांवर यथोचित ठिकाणी बंधारे बांधणे गरजचे आहे.-मो.सईद शेख, पर्यावरण तज्ज्ञ, भंडारा

टॅग्स :water shortageपाणीटंचाईriverनदी