शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांची नगदी पिकांकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 00:24 IST

जिल्ह्यात धान पिकांचे पारंपरिक उत्पादन मोठ्या घेतले जाते. परंतू वाढत्या उत्पादन खर्चामुळे धान उत्पादक शेतकरी ऊस पिकासह कापूस, सोयाबीन यासारख्या नगदी पिकांकडे वळला आहे.

ठळक मुद्देवनविभागाकडून जनजागृतीचा अभाव : विविध कारणांमुळे पारंपरिक शेतीकडे कल वाढला

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात धान पिकांचे पारंपरिक उत्पादन मोठ्या घेतले जाते. परंतू वाढत्या उत्पादन खर्चामुळे धान उत्पादक शेतकरी ऊस पिकासह कापूस, सोयाबीन यासारख्या नगदी पिकांकडे वळला आहे. जिल्ह्यात वन्यप्राणी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत असल्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा नगदी पिकांकडे पाठ फिरवु लागला आहे. वारंवार वाढणाऱ्या वन्यप्राण्यांच्या घटनांमुळे शासनाकडून कोणतीच ठोस उपाययोजना होताना दिसत नाही. वनविभागाचे वारंवार उंबरठे झिजवूनही शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळत नाही. परिणामी अनेक शेतकरी पुन्हा एकदा पारंपारिक पध्दतीच्या धान पिकाकडे वळत आहे.भंडारा जिल्ह्यात धान उत्पादक शेतकऱ्यांनी नगदी पिकाकडे वळून आपला उत्कर्ष साधावा असा सल्ला प्रशासकीय अधिकारी, कृषी शास्त्रज्ञ कार्यक्रमादरम्यान देत असतात. परंतू वन्यप्राण्यांच्या वाढत्या समस्या,खताचे वाढते भाव यावर कोणत्याच उपाययोजना होत नसल्यामुळे शेतकºयांना नाईलाजास्तव पुन्हा एकदा पारंपारिक धान शेतीचा पर्याय निवडावा लागत आहे.जिल्ह्यातील साकोली, करडी, पवनी, देव्हाडा, मोहाडी येथे अनेक शेतकºयांनी नगदीपिकाचे चांगले उत्पन्न मिळवून देणारे ऊस पिक म्हणून मोठ्या प्रमाणात लागवड सुरु केली होती. परंतू कारखाण्याकडून शेतकऱ्यांची ऊस बिले सहा महिने लोटले तरी न मिळाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोडमडले. तसेच अन्य कोणत्याच सबसिडी स्वरुपात अनुदान नसल्याने शेतकरी ऊस,कपाशी पिकाची टाळाटाळ करीत आहे. तसेच खमारी, जवाहरनगर,मोहदुरा याठिकाणच्या शेतकऱ्यांनी कापुस पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली होती. अपेक्षीत नफाही मिळाला. परंतू कापसाच्या शेतात वाढत्या रानडुकरांच्या संख्येमुळे शेतकऱ्यांवर हल्ले होण्याच्या घटनां मध्ये वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना शेतशिवारात दहशतीच्या छायेखाली वावरावे लागत आहे. जिल्ह्यात २० हजार हेक्टर ऊसपिकाची लागवड केली गेली. जिल्ह्यात असणाऱ्या कारखान्याकडून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे असतांना, प्रोत्साहन तर नाहीच पण शेतकऱ्यांची वेळेत बिले न काढल्यामुळेच शेतकऱ्यांचा नगदी पिकाकडचा कल कमी होत आहे. शेतकºयांचे जीवनमान उंचावण्यासाठी उपाययोजनेची गरज आहे.वन्यप्राण्यांचा वाढता अधिवास धोक्याचाकापूस, ऊस सोयाबीन यासारख्या पिकांमुळे वन्यप्राण्यांचा शेतातील वावर वाढतो. परिणामी हरिण, रानडुकर, निलगाय, माकडांचे कळप हिरवा चारा व पाण्यासाठी सुरक्षीत जागा यामुळे अशा पिकांकडे ंआपला मोर्चा वळवितात. तसेच रात्रीच्या वेळी अस्वल, ससे, रानडुकर तसेच त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या शिकारीसाठी बिबट, लांडगे यांचाही वावर वाढतो. त्यामुळेच जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांवर व शेतमजुरांवर वन्यप्राण्यांच्या हल्ला झाल्याच्या घटना वाढल्या आहेत.तुटपुंजी मदतगेल्या दोन वर्षातील पावसाची सततची अनियमितता असल्यामुळ शेतकºयांच्या उत्पन्नात घट झाली आहे. तसेच भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कपासीसह मिरची, फळबागा, ऊस पिकांच्या लागवड क्षेत्रात घट झाली आहे. शासनाकडून हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना दिवसेंदिवस वाढता उत्पादन खर्चामुळे शेती करणे कठिण होत आहे. शासनाकडून तुटपुंजी मदत दिली जाते.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती