शहरं
Join us  
Trending Stories
1
विकणाऱ्याला अटक, मग विकत घेणाऱ्याला का नाही?, अंबादास दानवेंचा पार्थ पवारांना अडचणीत आणणारा सवाल
2
मदीनाहून १८० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या इंडिगो विमानाला बॉम्बची धमकी, अहमदाबादमध्ये आपत्कालीन लँडिंग
3
रशियातील सर्वात श्रीमंत महिला! मातृत्व रजेवर असताना सुचली कल्पना, आज अब्जावधींचं साम्राज्य
4
UPI कॅशबॅक : रोजच्या पेमेंटमधून पैसे वाचवण्याची 'स्मार्ट' ट्रिक! 'या' मार्गांनी करा अधिक कमाई
5
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 2477 तर सोने 459 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या लेटेस्ट रेट
6
सरवणकरांची सून झाली तेजस्विनी लोणारी! शिवसेना युवा नेते समाधान सरवणकर यांच्यासोबत बांधली लग्नगाठ
7
Rinku Singh : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेआधी विघ्न की, लग्न? रिंकू टीम इंडियातून आउट होण्यामागचं कारण काय?
8
Vladimir Putin India Visit : उशिरापर्यंत जागरण, दोन तास स्वीमिंग, दारूला स्पर्शही नाही; ७३ वर्षीय पुतिन यांची लाईफस्टाईल! लाल डायरीला खास महत्त्व
9
Mumbai: "हे आपलं घर..." मुलाचं आई- वडिलांना 'बिग सरप्राईज'; दारावर नावाची पाटी पाहून भावूक
10
'आम्हीदेखील देशाचे प्रतिनिधित्व करतो, पण..', पुतिन यांची भेट नाकारल्याने राहुल गांधी संतापले
11
"लोकशाहीचे वस्त्रहरण, १७ ईव्हीएम मशिनचे सील तोडून पुन्हा मतदान पण अद्याप गुन्हा दाखल नाही"
12
पाकिस्तानसाठी हेरगिरीचा आरोप, ब्रह्मोस माजी इंजिनियरची तब्बल सात वर्षानंतर निर्दोष मुक्तता
13
डिजिटल बँकिंगचे नवे नियम १ तारखेपासून लागू होणार; तुमच्यासाठी काय बदलणार, जाणून घ्या महत्त्वाची माहिती
14
पश्चिम बंगालमध्ये बाबरी बांधण्याची घोषणा केलेली; ममता बॅनर्जींनी आमदाराला पक्षातून निलंबित केले
15
थायलंड फिरायला गेले, पण मृत्यूनं गाठलं; दोन्ही मित्र स्विमिंग पूलमध्ये मृतावस्थेत! नेमकं काय झालं?
16
itel Rhythm Echo TWS Earbuds: बॅटरी लाईफही हवी, आजुबाजुचा गोंगाट घालविणारा इअरबड हवा, मग...;  हा बजेटमधील इअरबड कसा आहे...?
17
हायवेवरील ट्रकला कारने दिली जोरदार धडक; ४ डॉक्टरांचा जागीच मृत्यू, आई वडिलांचं स्वप्न भंगलं
18
'मागेल तेवढ्या पगाराची नोकरी', स्वतःच्या स्वप्नांसाठी दुसऱ्यांच्या स्वप्नाची राखरांगोळी 
19
एखाद्या ‘सुंदरी’चा फोटो तीन मिनिटांत करू शकतो तुमचे बँक खाते रिकामे, ऑनलाइन व्यवहार करताना सावध रहा
20
High Tide Mumbai: चार दिवस समुद्राला मोठी भरती; साडेचार मीटरपेक्षा अधिक उंच लाटा
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांची नगदी पिकांकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 00:24 IST

जिल्ह्यात धान पिकांचे पारंपरिक उत्पादन मोठ्या घेतले जाते. परंतू वाढत्या उत्पादन खर्चामुळे धान उत्पादक शेतकरी ऊस पिकासह कापूस, सोयाबीन यासारख्या नगदी पिकांकडे वळला आहे.

ठळक मुद्देवनविभागाकडून जनजागृतीचा अभाव : विविध कारणांमुळे पारंपरिक शेतीकडे कल वाढला

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात धान पिकांचे पारंपरिक उत्पादन मोठ्या घेतले जाते. परंतू वाढत्या उत्पादन खर्चामुळे धान उत्पादक शेतकरी ऊस पिकासह कापूस, सोयाबीन यासारख्या नगदी पिकांकडे वळला आहे. जिल्ह्यात वन्यप्राणी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत असल्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा नगदी पिकांकडे पाठ फिरवु लागला आहे. वारंवार वाढणाऱ्या वन्यप्राण्यांच्या घटनांमुळे शासनाकडून कोणतीच ठोस उपाययोजना होताना दिसत नाही. वनविभागाचे वारंवार उंबरठे झिजवूनही शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळत नाही. परिणामी अनेक शेतकरी पुन्हा एकदा पारंपारिक पध्दतीच्या धान पिकाकडे वळत आहे.भंडारा जिल्ह्यात धान उत्पादक शेतकऱ्यांनी नगदी पिकाकडे वळून आपला उत्कर्ष साधावा असा सल्ला प्रशासकीय अधिकारी, कृषी शास्त्रज्ञ कार्यक्रमादरम्यान देत असतात. परंतू वन्यप्राण्यांच्या वाढत्या समस्या,खताचे वाढते भाव यावर कोणत्याच उपाययोजना होत नसल्यामुळे शेतकºयांना नाईलाजास्तव पुन्हा एकदा पारंपारिक धान शेतीचा पर्याय निवडावा लागत आहे.जिल्ह्यातील साकोली, करडी, पवनी, देव्हाडा, मोहाडी येथे अनेक शेतकºयांनी नगदीपिकाचे चांगले उत्पन्न मिळवून देणारे ऊस पिक म्हणून मोठ्या प्रमाणात लागवड सुरु केली होती. परंतू कारखाण्याकडून शेतकऱ्यांची ऊस बिले सहा महिने लोटले तरी न मिळाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोडमडले. तसेच अन्य कोणत्याच सबसिडी स्वरुपात अनुदान नसल्याने शेतकरी ऊस,कपाशी पिकाची टाळाटाळ करीत आहे. तसेच खमारी, जवाहरनगर,मोहदुरा याठिकाणच्या शेतकऱ्यांनी कापुस पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली होती. अपेक्षीत नफाही मिळाला. परंतू कापसाच्या शेतात वाढत्या रानडुकरांच्या संख्येमुळे शेतकऱ्यांवर हल्ले होण्याच्या घटनां मध्ये वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना शेतशिवारात दहशतीच्या छायेखाली वावरावे लागत आहे. जिल्ह्यात २० हजार हेक्टर ऊसपिकाची लागवड केली गेली. जिल्ह्यात असणाऱ्या कारखान्याकडून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे असतांना, प्रोत्साहन तर नाहीच पण शेतकऱ्यांची वेळेत बिले न काढल्यामुळेच शेतकऱ्यांचा नगदी पिकाकडचा कल कमी होत आहे. शेतकºयांचे जीवनमान उंचावण्यासाठी उपाययोजनेची गरज आहे.वन्यप्राण्यांचा वाढता अधिवास धोक्याचाकापूस, ऊस सोयाबीन यासारख्या पिकांमुळे वन्यप्राण्यांचा शेतातील वावर वाढतो. परिणामी हरिण, रानडुकर, निलगाय, माकडांचे कळप हिरवा चारा व पाण्यासाठी सुरक्षीत जागा यामुळे अशा पिकांकडे ंआपला मोर्चा वळवितात. तसेच रात्रीच्या वेळी अस्वल, ससे, रानडुकर तसेच त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या शिकारीसाठी बिबट, लांडगे यांचाही वावर वाढतो. त्यामुळेच जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांवर व शेतमजुरांवर वन्यप्राण्यांच्या हल्ला झाल्याच्या घटना वाढल्या आहेत.तुटपुंजी मदतगेल्या दोन वर्षातील पावसाची सततची अनियमितता असल्यामुळ शेतकºयांच्या उत्पन्नात घट झाली आहे. तसेच भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कपासीसह मिरची, फळबागा, ऊस पिकांच्या लागवड क्षेत्रात घट झाली आहे. शासनाकडून हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना दिवसेंदिवस वाढता उत्पादन खर्चामुळे शेती करणे कठिण होत आहे. शासनाकडून तुटपुंजी मदत दिली जाते.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती