शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

डाव्या कालव्यात पाणी सोडा!

By admin | Updated: February 16, 2017 00:27 IST

विदर्भातील महत्वाकांक्षी गोसेखुर्द इंदिरा सागर प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर असून शासनाने पाणी अडविण्याची भूमिका घेतल्याने .....

पंचभाई यांची मागणी : शेतकरी विकासापासून वंचित, रब्बी पिकाला पाण्याचा फटकाचिचाळ : विदर्भातील महत्वाकांक्षी गोसेखुर्द इंदिरा सागर प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर असून शासनाने पाणी अडविण्याची भूमिका घेतल्याने आणि डाव्या कालव्याचे बांधकाम निकृष्ट झाल्याने ते पूर्ण तोडण्यात आले. पूर्ववत नविन कंत्राटदारामार्फत बांधकाम कासवगतीने सुरु असल्याने या वर्षी शेतकऱ्यांना रब्बी हंगामाला पाण्यासाठी मुकावे लागणार आहे.पूर्व विदर्भातील मागासलेल्या भंडारा, नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यातील १ लक्ष ९० हजार हेक्टर कृषी जमिनीला सिंचनाची सोय असणाऱ्या गोसेखुर्द धरणामुळे पूर्व विदर्भात हरितक्रांती येणार आहे. भंडारा जिल्ह्यातील पवनी लाखांदुर, साकोली, भंडारा तालुक्यातील एकूण २८७ गावांना लाभ होणार असून जिल्ह्यातील ६८ हजार हेक्टर कृषी जमिनीला सिंचन होणार आहे.गोसेखुर्द प्रकल्पाच्या पवनी तालुक्यातील शेतकऱ्यांना सुजलाम-सुफलाम करण्याची क्षमता असलेला मुख्य डाव्या कालव्याचा काम विदर्भ पाटंधारे विकास महामंडळ नागपुर गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प एआयबीपी अंतर्गत मुख्य विमोचन धरणाचे साझा क्र. ८२० मीटरवरुन सुरु असून कालव्याची एकूण लांबी २२.९३ किमी कालवा विसर्ग ४५ २२ घ. मी. सेकंद कालव्याचा तळ रुंदी १४.८८ कालव्याचा पूर्ण प्रवाह उंची २.७५ मी. कालवा मुक्तांतर ०.९५ मी कालवा तळ उतार ११००००, कालवा तळ पातळी २३८.०० मी. एकूण सिंचन क्षेत्र (प्रवाह) ३०४५९ ला लाभ घेता येणार आहे.प्रकल्पाचा मुख्य डावा कालवा, चिचाळ, आकोट, कोंढा, सोमनाळा, सेंद्री, मालची भावड आदी गावातून गेला आहे. सदर परिसरातील काळी कसदार, जमीन चौरास म्हणून ओळख आहे. त्यामुळे येथील शेतकरी रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात गहु, कांदा, हरबरा, मृंग, उळीद, ज्वारी, लाख, लाखोरी, जवस आदी उत्पादन घेतो. मात्र कंत्राटदाराच्या कामातील संथ गतीने रब्बी हंगामाला पाण्याचा मोठा फटका बसला आहे.या वर्षाला वरुण राजाच्या वक्रदृष्टीने खरीप हंगामात पऱ्हे लावणी पासूनच पावसाने हुलकावणी दिल्याने पऱ्हे ते रोवणी दरम्यान शेतकऱ्यांनी तळे, बोळी, विहिरीतील पाण्याद्वारे रोवणी केली. मात्र सर्वदुर पावसाने शेतकरी हतबल झाला. त्यावेळी प्रकल्पाचे पाणी सोडल्याने त्याचा लाभ काही कालव्या शेजारील शेतकऱ्यांना झाला.त्यामुळे कालव्या शेजारील शेतकऱ्यांनी कालव्याचे पाणी मिळेल या आशेने कांदा उत्पादन व गहू उत्पादनावर भर दिला पाणी तर मिळोलच नाही. मात्र उभे रब्बी पीक पाण्याअभावी कोमेजले आहेत. कालवा बांधकाम कंत्राटदार ५ ते ६ वर्षापासून कासवगतीने करीत आहे. यावर्षी शेतकऱ्यांना गहू, हरबरा, उळीद, कांदा आदी पिकांना फटका बसला आहे. शेतकरी दुष्काळाच्या खाईत पडला आहे. संबंधित विभागाने जातीने लक्ष देवून कालव्यात पाणी सोडण्याची मागणी तोमेश्वर पंचभाई यांनी केली आहे. (वार्ताहर)