लाखांदूर तालुक्यात नदीकाठच्या गावांत गाळांचे थर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 05:00 IST2020-09-06T05:00:00+5:302020-09-06T05:00:00+5:30
२८ ऑगष्ट रोजी जिल्ह्यात अतिवृष्टीने गोसी (खु.) धरणाचे पाणी वैनगंगा नदीला मोठ्या प्रमाणात सोडले गेल्याने वैनगंगेच्या पाण्याचा दाब निर्माण होऊन तालुक्यात वैनगंगेसह चुलबंद नदीला देखील मोठा पूर आला होता. या नदीला चक्क तिसऱ्यांदा पूर आल्याने नदीकाठावरील गावांसाह लगतच्या गावातील पीक शेतीसह घरांचे मोठे नुकसान होत पडझड झाले आहे. वैनगंगा नदीकाठावरील जवळपास ६५० घरात पुराचे पाणी शिरल्याने संबंधितांना प्रशासनाने स्थलांतरीत देखील केले होते.

लाखांदूर तालुक्यात नदीकाठच्या गावांत गाळांचे थर
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : तालुक्यातील वैनगंगा व चूलबंद नदीला पूर येऊन पुराचे पाणी नदीकाठावरील अनेक गावातील घरात व शेतीतपीकांत जमा झाले होते. यामुळे या घटनने हजारो हेक्टर पीकांखालील शेती नष्ट होत शेकडो घरांचे नुकसान झाले आहे. मात्र तब्बल दोन-तीन दिवसांनी सदर पुराचे पाणी ओसरत असल्याने पुरबाधित सर्वच गावात दुगंर्धीचे वातावरण निर्माण झाले असून गावात गाळांचे थर साचल्याचे दिसून येत आहेत. २८ ऑगष्ट रोजी जिल्ह्यात अतिवृष्टीने गोसी (खु.) धरणाचे पाणी वैनगंगा नदीला मोठ्या प्रमाणात सोडले गेल्याने वैनगंगेच्या पाण्याचा दाब निर्माण होऊन तालुक्यात वैनगंगेसह चुलबंद नदीला देखील मोठा पूर आला होता. या नदीला चक्क तिसऱ्यांदा पूर आल्याने नदीकाठावरील गावांसाह लगतच्या गावातील पीक शेतीसह घरांचे मोठे नुकसान होत पडझड झाले आहे. वैनगंगा नदीकाठावरील जवळपास ६५० घरात पुराचे पाणी शिरल्याने संबंधितांना प्रशासनाने स्थलांतरीत देखील केले होते. या पुरामुळे शेकडो घरांची पडझड व लागवडी खालील पिक शेती पुर्णत: नष्ट होत रस्तेदेखील खड्डेमय झाले आहेत. पुराने विरली (खु.) येथील गोवर्धन कुथे नामक तरुण शेतकºयाचे कुक्कुट पालन व मत्स्य केंद्र पुराच्या पाण्यात वाहुन गेल्याने सुमारे सहा लक्ष रुपयांचे नुकसान झाले आहे. डांभेविरली येथील एका शेतकºयाची टरबूज शेती पुर्णत: नष्ट होवून लाखोंचे नुकसान झाले आहे. पूर संकटामुळे घरे, शेती व रस्त्यांची मोठी हानी झाली आहे. पूर ओसरतच पूर बाधित गावात प्रचंड दर्गंधी पसरली असून आरोग्याचे संकट निर्माण झाले आहे.
स्वच्छता मोहीम गरजेची
वैनगंगेला आलेल्या पुरामुळे तालुक्यातील अनेक घरामध्ये तसेच गावात ठिकठिकाणी चिखल पसरला आहे. त्यामुळे तालुका प्रशासनाने स्वच्छता मोहीम राबविण्याची गरज आहे. यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या असून कोरोना संकटामुळे नागरिकांना विशेष उपाययोजना करण्यासाठी मार्गदर्शन करण्याची गरज आहे. नागरिकांना मोफत औषधे तसेच दवाखान्याच्या सोयी उपलब्ध करून देण्याची गरज आहे.