शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

तलाव कोरडे, गावागावात पाण्याची टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 05:01 IST

यावर्षी कडक उन्हाळा तापू लागताच लहान स्वरुपाच्या तलावांनी जानेवारी महिन्यात नांगी टाकली. तर मध्यम स्वरुपाच्या तलावात पाण्याचा ठणठणाट आहे. तलावांवर आधारित पाणी पुरवठा योजना अडचणीत सापडल्या आहेत. गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. जनावरांना पिण्याचे पाणी उपबल्ध करण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. कमी खोलीची विहिरी सुद्धा कोरड्या पडल्यात.

ठळक मुद्देउष्णतेत वाढ : पाणीटंचाई आराखडा नावापुरताच

लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : यावर्षी चांगला पाऊस झाला असला तरी पारा ४६ अंशावर चढताच करडी परिसरातील मध्यम तलावांना कोरड पडली आहे. पाण्याचा ठणठणाट निर्माण झाल्याने जनावरे व गरजांसाठी आवश्यक पाण्याबरोबर गावागावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे. मागील तीन वर्षात तत्कालीन शासनाने पाणी टंचाई व भूगर्भातील पाणी साठा वाढविण्यासाठी जलयुक्त शिवार योजना सुरु केली. परंतु तरीही करडी परिसरात योजनेचा फारसा परिणाम अजूनही दिसून येत नाही.मध्यम स्वरुपाच्या तलावात पर्याप्त जलसाठा निर्माण करण्यात ही योजना फारशी यशस्वी ठरताना दिसून आली नाही. योजना फक्त शासकीय यंत्रणापुरतीच योजना मर्यादित ठरल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांत व्यक्त होत आहे. योजनेत लोकसहभाग संपल्याने कंत्राटदारांसाठी योजना पर्वणी ठरल्याचे सांगितले जाते.यावर्षी कडक उन्हाळा तापू लागताच लहान स्वरुपाच्या तलावांनी जानेवारी महिन्यात नांगी टाकली. तर मध्यम स्वरुपाच्या तलावात पाण्याचा ठणठणाट आहे. तलावांवर आधारित पाणी पुरवठा योजना अडचणीत सापडल्या आहेत. गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. जनावरांना पिण्याचे पाणी उपबल्ध करण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. कमी खोलीची विहिरी सुद्धा कोरड्या पडल्यात. तर मध्यम खोलीच्या विहिरी कोरड्या पडण्याच्या मार्गात आहेत. जलयुक्त शिवार योजनेतून खोदकाम झालेले नाले आज उथळ आहेत. खोदलेली माती नाल्यांच्या काठावरच टाकल्याने तसेच माती पसरविण्यात न आल्याने नाल्याची पाणी साठवण क्षमता वाढलेली नाही. तलावातून कंत्राटदारांनी शासकीय यंत्रयांना हाताशी धरून काळेबेरे केल्याने पाहिजे तसा उपसा झालेला नाही. परिणामी यावर्षी चांगला पाऊस झालेला असतानाही नाले व मध्यम स्वरुपाचे तलाव पाण्याविना मे महिन्यातच कोरडे पडले आहेत. तर सिंचनामुळे मोठ्या स्वरुपाचे तलाव जून महिन्यातच चटका बसताच कोरडे पडण्याच्या स्थितीत आहेत. पर्यावरणाच्या बिघडलेल्या संतुलनाचा परिणाम भविष्यात भोगावा लागण्याची शक्यता असल्याने आजच कायमस्वरुपी जलसाठे तयार होण्यासाठी विशेष योजनांची व लोकसहभाग वाढविण्यावर भर देण्याची गरज आहे.पर्यावरण संतुलनासाठी सहकार्याची गरजवाढते तामपान व घटते पर्जन्यमान यामुळे मागील काही वर्षापासून जिल्ह्यात शेतकऱ्यांना दुबार पेरणी शेतकºयांना करावी लागते आहे. शेकडो हेक्टर शेती वेळेवर पाऊस न पडल्यास पडीत राहते. रोवणीपर्यंतची शेतकºयांनी केलेली मेहनत व खर्च खंडीत आणि अत्यल्प पावसामुळे वाया जात आहे. या सर्व बाबींचा विचार करता पाणी संकटावर मात करण्यासाठी पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष लागवडीसाठी सामाजिक संस्था, संघटना, शाळा, महाविद्यालये, प्रतीष्ठीत नागरिक व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे व झाडांना जगविणे सर्वांच्या हिताचे ठरणारे आहे.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प