शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

जुलै महिन्याअखेरही तलाव तहानलेलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 01:03 IST

गत ४८ तासात पाऊस अधामधात बरसला. तसेच नेरला उपसा सिंचनाचेही पाणी सुरु असले तरीही अड्याळ परिसरातील शेतकरी धास्तावलेल्या स्थितीत आहे. मुख्य कारण म्हणजे जुलै महिना संपत आला असला तरी लहान मोठ्या तलावात पाहिजे त्या प्रमाणात पाणी जमा झालेला नाही.

ठळक मुद्देजिल्ह्यात अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा : रोवणीसाठी शेतकऱ्यांची शेतशिवारात धावपळ

विशाल रणदिवे।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : गत ४८ तासात पाऊस अधामधात बरसला. तसेच नेरला उपसा सिंचनाचेही पाणी सुरु असले तरीही अड्याळ परिसरातील शेतकरी धास्तावलेल्या स्थितीत आहे. मुख्य कारण म्हणजे जुलै महिना संपत आला असला तरी लहान मोठ्या तलावात पाहिजे त्या प्रमाणात पाणी जमा झालेला नाही.नेरला उपसा सिंचनामुळे काही प्रमाणात बºयाच शेतकऱ्यांना लाभ झाला तर काहींना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मुख्य म्हणजे रोवणीचा हंगाम जात असल्यामुळे शेतकरी लवकरात लवकर शेतातील रोवणी करायला गतीशील झाला असला तरी दुसरीकडे काही शेतकºयांची पºहे आधीच पावसाअभावी करपले. त्यामुळे दुबार पेरणी करावी लागले. एकंदरीत काही पºहे कसेतरी जगले. मोठेही झाले. पण शेतात पाणीच नाही आणि शेतकºयांच्या शेतात पाणी आहे. त्याला वेळेवर मजूर मिळेना. काही शेतकºयांच्या मते आताची अडचण कशीबशी सुटली. परंतु खरी गरज पाण्याची पुढेही पडणार तेव्हा पाऊस पडला नाही तर मग उभे पीक करपण्याच्या आधी पाणी शेतीला मिळणे आवश्यक आहे.कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ. कधी रोगराई तर कधी नापिकी. शेती नापिकीमुये शेतकºयांचे कुटुंब होत्याचे नव्हते झाले. उध्वस्त झाले पण शेतकºयाने आजही शेती सोडली नाही. सतत दोन दिवसात अड्याळ आणि परिसरात पाऊस पडला असला तरी तलावातील पाणी पाहून प्रत्येक शेतकºयाला मात्र आज विचार करायला भाग पाडले आहे. काही वर्षाआधीपावेतो अड्याळ व परिसरातील बहुतांश शेती ही पावसाच्या पाण्यावर तसेच जवळपास तलावात साचलेल्या पाण्यावर शेती अवलंबून राहाची. मात्र नेरला उपसा सिंचनावर सर्वच शेतकºयांची मोठी आशा दिसून येत असली तरी पाण्याच्या पातळीचे मुख्य कारण समोर येताना दिसते.नेरला उपसा सिंचनाची गरज पुन्हा कोणत्याही क्षणी भासू शकते. ही शक्यताही नाकारता येणार नाही. असावेतीसाठी आतापासूनच खबरदारी घेणे गरजेचे राहील. ज्या शेतकºयांनी रोवणी केली आणि ज्यांची रोवणी बाकी आहे असे दोन्ही प्रकारच्या शेतकºयांमध्ये एकच धास्ती आजही आहे ती म्हणजे फक्त पाणी. काही जाणकारांच्या मते आज गावात आणि परिसरात पाण्याचे मोठमोठे तलाव यावेळी तुडूंब भरून दिसायचे. परंतु आज ती स्थिती नाही. त्यामुळे शेतीलाही पाणी जपून वापरणे ही सुद्धा काळाची गरज बनत चालली आहे.पावसाच्या आगमनानंतरही रोवणी खोळंबलेलीचपालांदूर : हवामान खात्याचा अंदाज खरा ठरत विदर्भात पावसाच्या सरी कोसळत आहेत. मोठ्या पावसाचा अंदाज जरी खोटा ठरला तरीपण सरीवर सरी दोन तीन दिवस कोसळल्यास रोवणीला न्याय मिळू शकते. शनिवारला केवळ रिपरिप होती. रविवारला सकाळपासूनच पावसाचे वातावरण होते. मात्र अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतकºयांचा हिरमोड झाला आहे. पालांदूरचे ज्येष्ठ नेते दामाजी खंडाईत यांच्या पुढाकारात तहसीलदार लाखनी यांना निवेदनातून नेरला लिफ्टचे पाणी सोडण्याचे कळविले होते. त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात आली. पालांदूर परिसरात पहाडी, देवरी, गोंदी येथील नाल्याला पाणी गोसेचे अडल्याने काहींनी रोवणीला आरंभ केला आहे. या नहराच्या पाण्याने भूजल पातळी वाढविण्याकरिता मोठी मदत होणार असून निकामी झालेली विहिर, बोअरवेल्स, फिल्टर पुन्हा नव्या जोमाने कामाला येतील यात शंका नाही. पावसाने सतत ठेवली तर नक्कीच सोमवारपासून रोवणीला गती येणार आहे. पालांदूर परिसरात २५ टक्के रोवणी आटोपली आहे. कोरडवाहूचा शेतकरी आकाशाकडे लक्ष वेधून आहे. मात्र पावसाची नियमितता महत्वाची ठरणार आहे.

टॅग्स :Rainपाऊसwater shortageपाणीकपात