शहरं
Join us  
Trending Stories
1
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
2
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
3
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
4
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
5
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
6
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
7
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
8
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
9
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
10
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
11
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
12
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
13
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
14
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
15
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
16
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
17
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
18
जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
19
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, पायलटचा मृत्यू; दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना
20
भाजपा-शिंदे गटात वाद, चंद्रशेखर बावनकुळे थेट बोलले; म्हणाले, “कारवाई करू, आमचे संस्कार...”
Daily Top 2Weekly Top 5

जुलै महिन्याअखेरही तलाव तहानलेलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 01:03 IST

गत ४८ तासात पाऊस अधामधात बरसला. तसेच नेरला उपसा सिंचनाचेही पाणी सुरु असले तरीही अड्याळ परिसरातील शेतकरी धास्तावलेल्या स्थितीत आहे. मुख्य कारण म्हणजे जुलै महिना संपत आला असला तरी लहान मोठ्या तलावात पाहिजे त्या प्रमाणात पाणी जमा झालेला नाही.

ठळक मुद्देजिल्ह्यात अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा : रोवणीसाठी शेतकऱ्यांची शेतशिवारात धावपळ

विशाल रणदिवे।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : गत ४८ तासात पाऊस अधामधात बरसला. तसेच नेरला उपसा सिंचनाचेही पाणी सुरु असले तरीही अड्याळ परिसरातील शेतकरी धास्तावलेल्या स्थितीत आहे. मुख्य कारण म्हणजे जुलै महिना संपत आला असला तरी लहान मोठ्या तलावात पाहिजे त्या प्रमाणात पाणी जमा झालेला नाही.नेरला उपसा सिंचनामुळे काही प्रमाणात बºयाच शेतकऱ्यांना लाभ झाला तर काहींना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मुख्य म्हणजे रोवणीचा हंगाम जात असल्यामुळे शेतकरी लवकरात लवकर शेतातील रोवणी करायला गतीशील झाला असला तरी दुसरीकडे काही शेतकºयांची पºहे आधीच पावसाअभावी करपले. त्यामुळे दुबार पेरणी करावी लागले. एकंदरीत काही पºहे कसेतरी जगले. मोठेही झाले. पण शेतात पाणीच नाही आणि शेतकºयांच्या शेतात पाणी आहे. त्याला वेळेवर मजूर मिळेना. काही शेतकºयांच्या मते आताची अडचण कशीबशी सुटली. परंतु खरी गरज पाण्याची पुढेही पडणार तेव्हा पाऊस पडला नाही तर मग उभे पीक करपण्याच्या आधी पाणी शेतीला मिळणे आवश्यक आहे.कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ. कधी रोगराई तर कधी नापिकी. शेती नापिकीमुये शेतकºयांचे कुटुंब होत्याचे नव्हते झाले. उध्वस्त झाले पण शेतकºयाने आजही शेती सोडली नाही. सतत दोन दिवसात अड्याळ आणि परिसरात पाऊस पडला असला तरी तलावातील पाणी पाहून प्रत्येक शेतकºयाला मात्र आज विचार करायला भाग पाडले आहे. काही वर्षाआधीपावेतो अड्याळ व परिसरातील बहुतांश शेती ही पावसाच्या पाण्यावर तसेच जवळपास तलावात साचलेल्या पाण्यावर शेती अवलंबून राहाची. मात्र नेरला उपसा सिंचनावर सर्वच शेतकºयांची मोठी आशा दिसून येत असली तरी पाण्याच्या पातळीचे मुख्य कारण समोर येताना दिसते.नेरला उपसा सिंचनाची गरज पुन्हा कोणत्याही क्षणी भासू शकते. ही शक्यताही नाकारता येणार नाही. असावेतीसाठी आतापासूनच खबरदारी घेणे गरजेचे राहील. ज्या शेतकºयांनी रोवणी केली आणि ज्यांची रोवणी बाकी आहे असे दोन्ही प्रकारच्या शेतकºयांमध्ये एकच धास्ती आजही आहे ती म्हणजे फक्त पाणी. काही जाणकारांच्या मते आज गावात आणि परिसरात पाण्याचे मोठमोठे तलाव यावेळी तुडूंब भरून दिसायचे. परंतु आज ती स्थिती नाही. त्यामुळे शेतीलाही पाणी जपून वापरणे ही सुद्धा काळाची गरज बनत चालली आहे.पावसाच्या आगमनानंतरही रोवणी खोळंबलेलीचपालांदूर : हवामान खात्याचा अंदाज खरा ठरत विदर्भात पावसाच्या सरी कोसळत आहेत. मोठ्या पावसाचा अंदाज जरी खोटा ठरला तरीपण सरीवर सरी दोन तीन दिवस कोसळल्यास रोवणीला न्याय मिळू शकते. शनिवारला केवळ रिपरिप होती. रविवारला सकाळपासूनच पावसाचे वातावरण होते. मात्र अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतकºयांचा हिरमोड झाला आहे. पालांदूरचे ज्येष्ठ नेते दामाजी खंडाईत यांच्या पुढाकारात तहसीलदार लाखनी यांना निवेदनातून नेरला लिफ्टचे पाणी सोडण्याचे कळविले होते. त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात आली. पालांदूर परिसरात पहाडी, देवरी, गोंदी येथील नाल्याला पाणी गोसेचे अडल्याने काहींनी रोवणीला आरंभ केला आहे. या नहराच्या पाण्याने भूजल पातळी वाढविण्याकरिता मोठी मदत होणार असून निकामी झालेली विहिर, बोअरवेल्स, फिल्टर पुन्हा नव्या जोमाने कामाला येतील यात शंका नाही. पावसाने सतत ठेवली तर नक्कीच सोमवारपासून रोवणीला गती येणार आहे. पालांदूर परिसरात २५ टक्के रोवणी आटोपली आहे. कोरडवाहूचा शेतकरी आकाशाकडे लक्ष वेधून आहे. मात्र पावसाची नियमितता महत्वाची ठरणार आहे.

टॅग्स :Rainपाऊसwater shortageपाणीकपात