शहरं
Join us  
Trending Stories
1
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
2
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
3
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
4
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
5
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
6
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
7
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
8
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
9
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
10
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
11
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
12
ATM मधून पैसे काढताना तुम्हीही दोनदा Cancel बटन दाबता का? खरंच कामाची आहे का ही ट्रिक
13
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
14
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
15
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
16
'तो खोटं बोलला, हॉटेलमध्ये जाताच त्याने माझी...'; विधवा सासूने जावयावर केला खळबळजनक आरोप
17
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
18
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
19
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
20
Raja Raghuvanshi : कट, खून अन् पुरावे... मेघालय पोलिसांनी तब्बल ७९० पानांमध्ये नोंदवला सोनम रघुवंशी आणि राजचा गुन्हा!

रेतीअभावी बांधकामे प्रभावित, मजुरांवर बेरोजगारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:31 IST

करडी परिसरातील एक-दोन रेतीघाटांच्या लिलाव प्रक्रिया सुरू झाल्या आहेत; परंतु बहुतेक रेती घाट अजूनही प्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या ...

करडी परिसरातील एक-दोन रेतीघाटांच्या लिलाव प्रक्रिया सुरू झाल्या आहेत; परंतु बहुतेक रेती घाट अजूनही प्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या पोलीस प्रशासन व महसूल विभागाच्या सक्रियतेमुळे मोठ्या तस्करीला पायबंद लागला आहे. तरी परिसरात रेतीचा चोरटा व्यापार काही प्रमाणात सुरू असतानासुद्धा रेतीचे दर गगनाला भिडले आहेत. ६०० रुपयांना मिळणारी रेती आता २,००० रुपयांवर पोहोचली आहे. त्यातही ॲडव्हास पेमेंट घेण्याचे प्रमाण अधिक आहे. तरीही भसका रेतीने ग्राहक त्रस्त आहेत.

सन २०२१ वर्षातील फेबुवारी महिना अर्धा उलटून गेलेला आहे. शासकीय स्तरावर त्वरित लिलावाची कार्यवाही सुरू केली तरी साधारणत: दोन महिन्यांचा कालावधी प्रत्यक्ष रेती उपलब्ध होण्यासाठी लागणार आहे; परंतु नोव्हेंबरपासून सामान्य नागरिकांना कुठेही रेती उपलब्ध होताना दिसत नाही. शहरातील व्यापारी, बिल्डर यांच्या कामाच्या ठिकाणी रात्रीच्या अंधारात रेती माफिया भरमसाठ पैसे उकळून रेती विक्री करत असल्याचेही नाकारता येणारे नाही. यामध्ये मोजक्याच मजुरांना रोजगार उपलब्ध होत आहे. त्यामुळे आता रेतीअभावी सामाजिक समस्या निर्माण

होऊ पाहत आहेत.

स्वप्नातील घरे आकारास येण्यापूर्वीच अनेकांना नैराश्याने ग्रासले आहे. आपले घर साकारणार तरी केव्हा, असा प्रश्न सर्वसामान्य विचारू लागले आहेत. मजुरांना रोजगार उपलब्ध होत नसल्याने त्यांच्या कुटुंबाचा भरणपोषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. सामाजिक संस्था, संघटना तसेच लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने लक्ष घालून समस्येला वाचा फोडण्याची व पुढाकार घेऊन तळागाळातील मजुरांना न्याय देणे गरजेचे झाले आहे.

प्रधानमंत्री आवास योजना प्रभावित

प्रत्येक नागरिकाला हक्काचे घर मिळावे, याकरिता केंद्र शासनाने पंतप्रधान आवास योजना अमलात आणली; परंतु अजूनही मंजूर झालेल्या घरकुलांपैकी ५० टक्के घरकुल रेतीअभावी उभे झालेच नाही. सुरू असलेली कामेही प्रभावित झाली आहेत. बरीचशी कामे थंडबस्त्यात आहेत. रेती लिलाव न झाल्यामुळे हक्काचे घर रखडलेले आहे, तर दुसरीकडे बेरोजगारीमुळे मजुरांची उपासमारी होत आहे.

बॉक्स

शासन-प्रशासनाला जाब विचारणार कोण?

घर बांधकामासाठी जवळपास सहा ते एक वर्षाचा कालावधी लागतो. एका घराचे बांधकामासाठी जवळपास कुशल व अकुशल असे १० ते १२ मजूर लागतात. या अंदाजाप्रमाणे गाव व शहरांमध्ये दोनशे घर बांधकामासाठी अंदाजे २ हजार ४०० मजुरांना रोजगार मिळतो. त्याचबरोबर बांधकाम मिस्त्री, रेती व्यवसाय करणारे हमाल, गाड्यावरील मजूर, ड्रायव्हर, रेती चाळणी करणारे मजूर, वीट बांधकाम मजूर अशा प्रकारचे कार्य करणाऱ्या हजारो कुटुंबांच्या मजुरीचा प्रश्न सुटतो; परंतु बांधकाम व्यवसाय रेतीअभावी ठप्प पडल्याने ही सामाजिक समस्या कोण सोडविणार, शासन- प्रशासनाला याचा जाब कोण विचारणार, असा प्रश्नदेखील या निमित्ताने उभा ठाकला आहे.