शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

जाणून घ्या रानभाज्या खाण्याचे फायदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 14:25 IST

Bhandara : तुम्ही ह्या रानभाज्या खाल्ल्या का?

भंडारा : रानभाज्या खाल्ल्याने आरोग्य चांगले राहते. दिवसेंदिवस शेतातून रानभाज्या नामशेष होत असल्या तरी ग्रामीण भागात आजही रानभाज्या मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. रानभाज्या आरोग्यदायी असल्याने दररोजच्या आहारात रानभाज्या महत्त्वाच्या आहेत. वासाठी रानभाज्यांचा रोजच्या आहारात वापर गरजेचा आहे.

रानभाज्या खा, ठणठणीत राहा!तांदुळजा :■ निरोगी आणि आरोग्याला पोषक सर्व घटक मिळत असल्याने पालेभाज्या दैनंदिन आहारात असणे गरजेचे आहे. रानभाज्या खाल्ल्याने प्रतिकारशक्ती वाढते, शरीराला पोषक घटक मिळतात. रानभाज्या खा आणि ठणठणीत राहा, असे बोलले जाते.■ तांदुळजा ही एक गावाकडची लोकप्रिय अशी रानभाजी आहे. शरीराला 'सी' जीवनसत्त्व मिळावे म्हणून तांदुळजाची भाजी खावी, असे सांगितले जाते. जर कोणाला गोवर, कांजण्या आल्या किंवा खूप ताप आला तर शरीरातील उष्णता कमी करावयास तांदुळजा उपयुक्त ठरते.

अंबाडी :■ अंबाडीच्या भाजीत कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, झिंक, जीवनसत्त्व 'अ' 'क' अशा पोषक घटकांसह खनिजांचा उत्तम स्रोत आहे.■ उत्तम प्रमाणात लोह आणि फॉलिक अॅसिडच्या उपलब्धतेमुळे रक्तवर्धन होते. डोळे, केस, हाडांसाठी तसेच रक्तदाब नियंत्रणासाठी ही भाजी उपयुक्त आहे.

माठाची भाजी :■ थोडी चिकट असणारी ही भाजी, श्रावण महिन्यातील सणात नैवेद्य दाखविण्यासाठी केली जाते. काही लोक याच भाजीला माठला ही म्हणतात.

पाथरी :■ ही रानभाजी शेतात सहज कुठेही उपलब्ध होते. खाण्यासाठी थंड असते. पित्ताचा त्रास कमी होऊन आराम मिळतो. पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. आरोग्यासाठी फायदेशीर भाजी आहे.

रानभाज्यांसह इतर पालेभाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पौष्टिक घटक असतात. जीवनसत्त्वांमुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे दैनंदिन आहारात पालेभाज्यांसह रानभाज्या खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. - डॉ विश्वनाथ नागदेवे, आहारतज्ज्ञा, भंडारा

पाऊस वेळेवर, रानभाज्या मिळतील खायलायंदाच्या वर्षी पाऊस उशिरा आल्याने आपल्या शेतात दुर्मीळ असलेल्या व आपल्या नजरेस न पडणाऱ्या पण आरोग्यासाठी चांगल्या असलेल्यारानभाज्या खायला मिळणार आहेत. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सvegetableभाज्याbhandara-acभंडारा