कोथुर्णा-इंदुरखा वितरिकेत केरकचरा
By Admin | Updated: May 19, 2014 23:14 IST2014-05-19T23:14:42+5:302014-05-19T23:14:42+5:30
बावनथडी प्रकल्पाची कोथूर्णा-इंदुरखा प्रमुख वितरिका मांढळ (दे.) शिवारात कचरामय झाल्याने प्रकल्पाचे पानी पुढे जाण्यास अडथळा निर्माण होतो.

कोथुर्णा-इंदुरखा वितरिकेत केरकचरा
तुमसर : बावनथडी प्रकल्पाची कोथूर्णा-इंदुरखा प्रमुख वितरिका मांढळ (दे.) शिवारात कचरामय झाल्याने प्रकल्पाचे पानी पुढे जाण्यास अडथळा निर्माण होतो. लोखंडी चॅनेल गेट येथे लावण्यात आले नाही. मांढळ (दे.) शिवारात वितरिका ओव्हरफलो होऊन शेतात पाणी जाऊन शेकडो हेक्टर शेतातील धानपिकाचे नुकसान होते या समस्येकडे लक्ष देण्यास अधिकार्यांकडे वेळच नाही. मांढळ (दे.) शिवारातून पुढे कोथुर्णा- इंदुरखा या गावाकडे बावनथडी प्रकल्पाची मुख्य वितरीका जाते. मांढळ (दे.) शिवारात टी पॉईंटवर कोथूर्णा-इंदुरखा वितरिका आहे. सध्या ती कचरामय झाली आहे. पाण्याच्या प्रवाहासोबत मोठ्या प्रमाणात कचरा व गाळ वाहत येतो. तो कचरा व गाळ या टी पॉईंटवर जमा झाला आहे. पुढे वितरीकेत पाणी वाहत जाण्याकरिता या कचर्यामुळे अडथळा निर्माण होतो. या अडथळामुळे मांढळ (दे.) शिवारात मुख्य वितरिका ओव्हरफलो होते. त्यामुळे शेकडो हेक्टरमधील धान पिक धोक्यात येते. या ओव्हरफलोमुळे वितरीकाच वाहून जाण्याची भीती शेतकर्यांनीव्यक्त केली आहे. टी पॉईंटवर पुढे वितरिकेची पिचींग करण्यात आली नाही. कचर्याची अडथळा पूर्ण करुन पाणी पिंचीग न झालेल्या वितरीकेतुन पुढे वाहत जाते. अनेक ठिकाणी वितरिका फुटल्या असल्याने पाणी इतरत्र जिकडे दिशा मिळाली तिकडे वाहत जाते. त्यामुळे शेकडो शेतकर्यांचे धान पिकाला येथे धोका निर्माण झाला आहे. बावनथडी प्रकल्प कार्यालयाने या टी पॉईंटवर चॅनेल गेट अजूनपर्यंत लावले नाही. नियमित कचर्यांची निकासी केली जात नाही. स्थानिक शेतकर्यांनी तक्रार केल्यावरही त्याची दखल घेतली जात नाही. असा आरोप मांढळ (दे.) येथील शेतकर्यांनी केला आहे. या परिसरातील शेकडो शेतकर्यांच्या जमिनी बावनथडी प्रकल्पात जाऊन एका दशकापेक्षा जास्त काळ झाला तरी अजूनपर्यंत मोबदला देण्यात आला नाही. या मोबदल्याकरिता येथील शेतकरी प्रकल्प कार्यालयाकडे खेटा मारीत आहेत. शेतकर्यांचा असंतोष पाहता पावसाळ्यापूर्वी येथे आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक शेतकर्यांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)