शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
2
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
3
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
4
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
5
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
6
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान
7
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
8
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
9
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
10
वयाच्या २९व्या वर्षी वेगवान गोलंदाज निवृत्त; वकील बनण्यासाठी क्रिकेटशी तोडलं नातं!
11
Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट
12
मुसळधार पावसाने कोलकात्याला झोडपले, अनेक भागात पाणी साचले, मेट्रो विस्कळीत, ५ जणांचा मृत्यू
13
निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!
14
फक्त किराणाच नाही तर मॉलमध्ये शॉपिंगपासून ते सिनेमापर्यंत या गोष्टींवर भरघोस बचत; पाहा यादी
15
"मी तुमचा मोठा चाहता...", रितेश देशमुखने प्रसाद ओकचं केलं कौतुक; गंमतीत म्हणाला...
16
"बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल
17
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर
18
काय आहे विमानाच्या टायरजवळची 'ती' जीवघेणी जागाा, जिथे बसून १३ वर्षांचा मुलगा अफगाणिस्तानातून भारतात आला
19
GST कमी झाला आणि AC-TV च्या विक्रीत झाली जोरदार वाढ, किराणा दुकानदारांनाही 'अच्छे दिन'
20
Kuttu Atta: नवरात्री उपवासाचं कुट्टूचं पीठ ठरलं विषारी; १५० हून अधिक लोक आजारी, रुग्णालयाबाहेर रांगा!

काटा दहावर तरीही शुकशुकाट !

By admin | Updated: January 5, 2015 22:57 IST

‘गतिमान प्रशासन’ हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व पर्यायाने राज्यात सत्तारूढ झालेल्या युती सरकारचा धोरणात्मक निर्णय आहे. मात्र जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा

कारभार लेटलतीफ कर्मचाऱ्यांचाप्रशांत देसाई - भंडारा‘गतिमान प्रशासन’ हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व पर्यायाने राज्यात सत्तारूढ झालेल्या युती सरकारचा धोरणात्मक निर्णय आहे. मात्र जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालयातील कर्मचारीच या धोरणालाच सुरूंग लावण्याचे काम करीत आहेत. सोमवारी सकाळी दहा ते साडेदहा वाजताच्या वेळेत दोन्ही कार्यालयात ‘स्टिंग आॅपरेशन’ केले असता तेथील कर्मचाऱ्यांनी बायोमेट्रीक यंत्रावर हजेरी लावली खरी, मात्र टेबलवर बसून कर्तव्य पार पाडण्याऐवजी कुणी बाहेर तर कुणी चहाटपरीवर बसून गप्पा करीत असल्याचे आढळून आले. जिल्ह्यात सध्या सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कामाच्या वेळा योग्य पद्धतीने पाळण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. असे असताना जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून या निर्देशांकडे डोळेझाक करण्यात येत आहे. या शासकीय कार्यालयाची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ५.४५ वाजेपर्यंत आहे. या कालावधीत दुपारी २ ते २.३० या काळात कर्मचाऱ्यांना जेवणाचा ब्रेक घेण्याचा नियम आहे. अशा वेळा ठरवून दिलेल्या असतानाही या कार्यालयातील काही प्रामाणिक कर्मचारी वगळता अन्य वेळकाढू कर्मचाऱ्यांनी या वेळापत्रकाला धाब्यावर बसविले आहे. सोमवार हा आठवड्याचा पहिला दिवस असल्यामुळे कर्मचारी सकाळी १० वाजता कर्तव्यावर हजर राहतात की, यासाठी या कार्यालयात फेरफटका मारला असता, कर्मचाऱ्यांचा वेळकाढूपणा समोर आला. यावेळी जिल्हा परिषद मधील सर्वच विभागातील कर्मचाऱ्यांनी इमारतीच्या तळमजल्यावर लावण्यात आलेल्या बायोमेट्रीक यंत्रावर आंगठ्याची नोंद करण्यासाठी एकच घाई केली होती. मात्र, काही वेळेनंतर ते आपआपल्या कर्तव्यावर जाणे अपेक्षित होते. मात्र थंडीमुळे ते उन्हात राहणे पसंत केले. यामुळे त्यांच्या टेबलवर कामासाठी पोचलेल्या नागरिकांनाही ताटकळत उभे राहावे लागले. यातील काही कर्मचारी तर, कामासाठी आलेल्यांना ‘भाऊ, थंडी आहे. जरा उन्हात शेकू द्या. तुम्ही पण उन्हात उभे राहून गरम व्हा, वेळ असेल तर चहा पिऊन तासभरात या’ असा सल्ला देण्यात धन्यता मानत होते. याचवेळी काही कर्मचारी कर्तव्यदक्ष आढळून आले. त्यांनी मात्र बाहेरुन आलेल्या लोकांच्या समस्या जाणून घेत होते.