शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
6
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
7
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
8
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
9
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
10
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
11
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
12
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
13
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
14
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
15
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
16
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
17
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
18
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
19
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
20
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न

काका, आमचा नवोदयचा रिझल्ट केव्हा लागणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 00:49 IST

आम्ही रात्रभर जागून अभ्यास केला. दररोज रिझल्टची वाट पाहतो परंतु रिझल्ट लागत नाही, आता आम्ही दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतला. आम्हचा रिझल्ट केव्हा लागणार असा आर्त सवाल नवोदय विद्यालयाची प्रवेश परिक्षा दिलेल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी गुरुवारी येथे एका पत्रकार परिषदेत केला.

ठळक मुद्देपत्रपरिषदेत विद्यार्थ्यांचा सवाल : देशभरात केवळ भंडाराचा निकाल अडला, पालकांचा उपोषणाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आम्ही रात्रभर जागून अभ्यास केला. दररोज रिझल्टची वाट पाहतो परंतु रिझल्ट लागत नाही, आता आम्ही दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतला. आम्हचा रिझल्ट केव्हा लागणार असा आर्त सवाल नवोदय विद्यालयाची प्रवेश परिक्षा दिलेल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी गुरुवारी येथे एका पत्रकार परिषदेत केला. यावेळी त्यांच्यासोबत पालकही उपस्थित होते. निकाल लवकर लागला नाहीतर उपोषणाला बसण्याचा इशारा या पालकांनी यावेळी दिला.नवोदय विद्यालयाच्या प्रवेशासाठी देशभरात परीक्षा घेण्यात आली. भंडारा जिल्ह्यातील सहा हजार २०० विद्यार्थी या परिक्षेला बसले होते. २१ एप्रिल रोजी झालेल्या परीक्षेतून ८० विद्यार्थ्यांनी नवोदय विद्यालयाची निवड केली जाणार होती. संपूर्ण देशाच्या नवोदय प्रवेश परीक्षेचा निकाल घोषित झाला. परंतू एकमेव भंडारा जिल्ह्यातील परीक्षेचा निकाल मात्र रखडला आहे. आज लागेल, उद्या लागेल असे करीत आज पाच महिने झाले तरीही निकाल लागला नाही. पालकांनी याबाबत जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले, परंतु उपयोग झाला नाही. नवोदय विद्यालयासाठी जागा नसल्याचे कारण पुढे करत हा निकाल रोखून ठेवल्याची माहिती आहे.या सर्व प्रकाराने त्रस्त झालेले विद्यार्थी आपल्या पालकांसह गुरुवारी येथील विश्रामगृहात एकत्र आले. त्यांनी पत्रकारांना आपली व्यथा सांगितली. बेला येथील जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थीनी हंशीका वानखेडे म्हणाली, आम्हाला लवकरात लवकर रिझल्ट हवा आहे, आम्ही रात्र जागून अभ्यास केला. परंतु निकाल का देत नाही, असा सवाल तिने केला. रॉयल पब्लिक स्कूलचा विद्यार्थी सोहम बोरकर म्हणाला, सर्व देशाचा निकाल लागला पंरतु आमचा का लागत नाही, असा प्रश्न त्याने उपस्थित केला. यावेळी प्रतीक्षा बोरकर, गायत्री राखडे, सानीया नंदागवळी, अन्वी कांबळे, संघर्षी गेडाम, संस्कार रामटेके, लावण्य चाचेरे, हिमांशु कुलरकर, चाणक्य मेनपाले, आर्यन सुर्यवंशी, विवेक वाडेकर, सोनाली भोवते आदी विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. निकालाच्या प्रतीक्षेत वर्ष वाया जावू नये म्हणून या विद्यार्थ्यांनी आता सहाव्या वर्गात पैसे भरुन प्रवेश घेतला आहे. त्यामुळे पालक संतप्त झाले आहे. लवकरच निकाल घोषित झाला नाही तर आम्ही उपोषण करु असा इशारा पालकांनी दिला. प्रशासनाविरुध्द यावेळी रोष व्यक्त करण्यात आला. आता प्रशासन कोणती भूमिका घेत याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी