शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

काका, आमचा नवोदयचा रिझल्ट केव्हा लागणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 00:49 IST

आम्ही रात्रभर जागून अभ्यास केला. दररोज रिझल्टची वाट पाहतो परंतु रिझल्ट लागत नाही, आता आम्ही दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतला. आम्हचा रिझल्ट केव्हा लागणार असा आर्त सवाल नवोदय विद्यालयाची प्रवेश परिक्षा दिलेल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी गुरुवारी येथे एका पत्रकार परिषदेत केला.

ठळक मुद्देपत्रपरिषदेत विद्यार्थ्यांचा सवाल : देशभरात केवळ भंडाराचा निकाल अडला, पालकांचा उपोषणाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आम्ही रात्रभर जागून अभ्यास केला. दररोज रिझल्टची वाट पाहतो परंतु रिझल्ट लागत नाही, आता आम्ही दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतला. आम्हचा रिझल्ट केव्हा लागणार असा आर्त सवाल नवोदय विद्यालयाची प्रवेश परिक्षा दिलेल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी गुरुवारी येथे एका पत्रकार परिषदेत केला. यावेळी त्यांच्यासोबत पालकही उपस्थित होते. निकाल लवकर लागला नाहीतर उपोषणाला बसण्याचा इशारा या पालकांनी यावेळी दिला.नवोदय विद्यालयाच्या प्रवेशासाठी देशभरात परीक्षा घेण्यात आली. भंडारा जिल्ह्यातील सहा हजार २०० विद्यार्थी या परिक्षेला बसले होते. २१ एप्रिल रोजी झालेल्या परीक्षेतून ८० विद्यार्थ्यांनी नवोदय विद्यालयाची निवड केली जाणार होती. संपूर्ण देशाच्या नवोदय प्रवेश परीक्षेचा निकाल घोषित झाला. परंतू एकमेव भंडारा जिल्ह्यातील परीक्षेचा निकाल मात्र रखडला आहे. आज लागेल, उद्या लागेल असे करीत आज पाच महिने झाले तरीही निकाल लागला नाही. पालकांनी याबाबत जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले, परंतु उपयोग झाला नाही. नवोदय विद्यालयासाठी जागा नसल्याचे कारण पुढे करत हा निकाल रोखून ठेवल्याची माहिती आहे.या सर्व प्रकाराने त्रस्त झालेले विद्यार्थी आपल्या पालकांसह गुरुवारी येथील विश्रामगृहात एकत्र आले. त्यांनी पत्रकारांना आपली व्यथा सांगितली. बेला येथील जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थीनी हंशीका वानखेडे म्हणाली, आम्हाला लवकरात लवकर रिझल्ट हवा आहे, आम्ही रात्र जागून अभ्यास केला. परंतु निकाल का देत नाही, असा सवाल तिने केला. रॉयल पब्लिक स्कूलचा विद्यार्थी सोहम बोरकर म्हणाला, सर्व देशाचा निकाल लागला पंरतु आमचा का लागत नाही, असा प्रश्न त्याने उपस्थित केला. यावेळी प्रतीक्षा बोरकर, गायत्री राखडे, सानीया नंदागवळी, अन्वी कांबळे, संघर्षी गेडाम, संस्कार रामटेके, लावण्य चाचेरे, हिमांशु कुलरकर, चाणक्य मेनपाले, आर्यन सुर्यवंशी, विवेक वाडेकर, सोनाली भोवते आदी विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. निकालाच्या प्रतीक्षेत वर्ष वाया जावू नये म्हणून या विद्यार्थ्यांनी आता सहाव्या वर्गात पैसे भरुन प्रवेश घेतला आहे. त्यामुळे पालक संतप्त झाले आहे. लवकरच निकाल घोषित झाला नाही तर आम्ही उपोषण करु असा इशारा पालकांनी दिला. प्रशासनाविरुध्द यावेळी रोष व्यक्त करण्यात आला. आता प्रशासन कोणती भूमिका घेत याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी