शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

अवघ्या चार महिन्यातच झाली रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 5:00 AM

मात्र काही कारणास्तवर अनेक शेतकरी, ग्रामस्थ याच रस्त्यावरून प्रवास करतात. सदर दस्त्याचे काम निकृष्ठ झाल्याची ओरड होत असल्याने रस्ता काम करणाºयांची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. परिसरात या रस्त्याच्या निकृष्ठ कामाची चर्चा रंगत आहे. एकीकडे शासन लाखो रूपये खर्च करीत आहे तर दुसरीकडे दर्जेदार कामे होत नसल्याने ग्रामीण भागात नागरिकांना रस्त्याअभावी चांगलीच कसरत करावी लागत आहे.

ठळक मुद्देअड्याळ-सालेवाडा रस्त्याचे प्रकरण : शेतकऱ्यांची होतेय दमछाक

विशाल रणदिवे ।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : पवनी तालुक्यातील अड्याळ ते सालेवाडा मार्गातील नुकतेच डांबरीकरण करण्यात आले होते. या रस्ते कामासाठी लाखो रूपये खर्च केले असताना अवघ्या चार महिन्यातच रस्त्याची दुरावस्था झाली असून शेतकऱ्यांना ऐन हंगामात कसरत करावी लागत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून त्यानंतर काही दिवसांनी रस्त्याची डागडुजी करण्यात आली होती. मात्र काम व्यवस्थित झाले नसल्याचे गावकºयातून ओरड आहे. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे स्वत:चा जीव धोक्यात घालणे, असा गावकऱ्यातून सूर निघत आहे.मात्र काही कारणास्तवर अनेक शेतकरी, ग्रामस्थ याच रस्त्यावरून प्रवास करतात. सदर दस्त्याचे काम निकृष्ठ झाल्याची ओरड होत असल्याने रस्ता काम करणाऱ्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. परिसरात या रस्त्याच्या निकृष्ठ कामाची चर्चा रंगत आहे. एकीकडे शासन लाखो रूपये खर्च करीत आहे तर दुसरीकडे दर्जेदार कामे होत नसल्याने ग्रामीण भागात नागरिकांना रस्त्याअभावी चांगलीच कसरत करावी लागत आहे. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे अड्याळ ते सालेवाडा डांबरीकरण रस्ता.गत सहा महिन्यात अड्याळसह परिसरात बऱ्याच डांबरी रस्त्यांची कामे झाली. मात्र याचा दर्जा चांगला नसल्याची ओरड सुरू आहे. ग्रामस्थांची रस्त्याबाबत नेहमीच तक्रार सुरू असून याबाबत वरिष्ठांकडे अनेकदा तक्रारी करण्यात आले आहे. मात्र संबंधित विभागाचे अधिकारी याकडे डोळेझाक करीत आहे.कारवाई होत नसल्याने यामागचे गुपीत काय, असा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे. लाखो रूपयांचा निधी खर्च होत असताना किमान एक वर्षतरी रस्त्याची गुणवत्ता कायम राहिली पाहिजे. मात्र अवघ्या दोन ते चारच महिन्यात रस्त्यावर खड्डे पडत असल्याने रस्ता काम गुणवत्तापूर्ण झाले आहे काय, असा प्रश्न नागरिकांतून अधिकाºयांना केला जात आहे.काहींच्या स्वार्थासाठी नागरिकांना त्रासशासन ग्रामीण भागातून नागरिकांना रस्त्याची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी लाखो रूपयाचा निधी उपलब्ध करून देते. मात्र यंत्रणेतील काही अधिकारी, कंत्राटदार स्वत:च्या स्वार्थासाठी रस्ते काम दर्जेदार करीत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. रस्त्याची सुरूवात आणि शेवटचे काम बऱ्यापैकी झाले. मात्र मध्यंतरी झालेली कामे निकृष्ठ दर्जाची असल्याचे चित्र स्पष्ट आहे. परिणामी रस्त्याची दूरावस्था झाली असतानाही संबंधित यंत्रणेला लक्ष देण्यासाठी वेळ नाही का, असा प्रश्न ग्रामस्थ करीत आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकpwdसार्वजनिक बांधकाम विभाग