शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा कचेरीसमोर संयुक्त आदिवासी कृती समितीचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 05:00 IST

अनेक वर्षांपासून शासनस्तरावर खरे आदिवासी आपल्या न्याय मागण्यांसंदर्भात लढा देत आहेत. ६ जुलै २०१७ ला सर्वोच्च न्यायालयाने खऱ्या आदिवासींच्या बाजुने निर्णय दिला आहे. तरी सुद्धा महाराष्ट्र शासनाने त्या निर्णयाची अंमलबजावणी केली नाही. उलट गैरआदिवासींना संरक्षण दिले जात आहे. शासकीय नोकऱ्यात घुसखोरी करणाऱ्या गैर आदिवासींवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, रिक्त पदांवर खऱ्या अनुसुचित जमातीच्या उमेदवारांना नियुक्त्या देण्यात याव्या, ....

ठळक मुद्देआंदोलनात शेकडो महिला, पुरुषांचा सहभाग

 लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आदिवासी समाजाच्या विविध समस्या व मागण्यांच्या पुर्ततेसाठी संयुक्त आदिवासी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्ह्यातील शेकडो आदिवासी बांधवांनी सहभाग घेतला. यावेळी आदिवासी समाजातील नेत्यांनी मार्गदर्शन करुन आदिवासी समाजाच्या ज्वलंत समस्यांवर लक्ष वेधले. त्यानंतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सोपविण्यात आले. निवेदनानुसार, अनेक वर्षांपासून शासनस्तरावर खरे आदिवासी आपल्या न्याय मागण्यांसंदर्भात लढा देत आहेत. ६ जुलै २०१७ ला सर्वोच्च न्यायालयाने खऱ्या आदिवासींच्या बाजुने निर्णय दिला आहे. तरी सुद्धा महाराष्ट्र शासनाने त्या निर्णयाची अंमलबजावणी केली नाही. उलट गैरआदिवासींना संरक्षण दिले जात आहे. शासकीय नोकऱ्यात घुसखोरी करणाऱ्या गैर आदिवासींवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, रिक्त पदांवर खऱ्या अनुसुचित जमातीच्या उमेदवारांना नियुक्त्या देण्यात याव्या, अनुसुचित जमातीच्या यादीव्यतिरिक्त संविधानिक नियमाला डावलुन कोणत्याही जातीचा समावेश करु नये, संवर्गातील कर्मचारी अधिकाऱ्यांना तात्काळ पदोन्नती देऊन तसेच रिक्त अनुशेष पुर्णपणे भरावा, गैरआदिवासींना पाठीशी घालण्यासाठी काढलेले आदेश तात्काळ रद्द करावे, आदिवासी मुलामुलींकरिता सुरु केलेली डीबीटी योजना तात्काळ बंद करावी, विद्यापीठ, महाविद्यालयीन प्राध्यापक, पदभरती संदर्भातील नोकरीपासुन वंचित ठेवणारा १३ पाॅइंट रोस्टरचा शासन आदेश रद्द करावा, आदिवासींना व्याघ्र प्रकल्पाच्या नावाखाली दुसऱ्या ठिकाणी विस्थापित करु नये, उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेऊ इच्छीणाऱ्या उमेदवारांना प्रवेश प्रक्रियेपुर्वी जात वैधता प्रमाणपत्र अनियवार्य करण्यात यावे, इंग्रजी माध्यमाचे शासकीय पब्लीक स्कुल माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय तसेच पदवी-पदव्युत्तर महाविद्यालय, सर्व तालुका जिल्हास्तरावर मंजुर करण्यात यावे, विद्यापीठस्तरावर आदिवासी संशोधन केंद्र, भव्य दिव्य आदिवासी संग्रहालय तसेच नृत्य कला सांस्कृतिक भवन मंजुर करावे. आदिवासी विकास विभागाच्या सर्व योजना केवळ आदिवासी संस्था चालक असलेल्या संस्थांना, आदिवासी महिला-पुरुष बचत गटांना मंजुर कराव्या, सर्वाेच्च न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत गोवारी समाजाला कोणतेही लाभ देण्यात येऊ नये, वर्ग नऊ ते बारावीपर्यंत वसतिगृह सुरु करावे, पोलीस विभागातील विशेष भरती मोहीम खऱ्या आदिवासी समाजाकरिता घेण्यात यावी अशा विविध मागण्यांचा समावेश होता. या आंदोलनात ऑल इंडिया आदिवासी एम्प्लाॅईज फेडरेशन, ऑर्गनायझेशन फाॅर राईटस् ऑफ ट्रायबल, नॅशनल आदिवासी पीपल्स फेडरेशन, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, युवा परिषद, गोंडवाना संघर्ष कृती समिती, आदिवासी विद्यार्थी संघ, राणी दुर्गावती आदिवासी महिला मंडळ, आदिवासी हलबा-हलबी समाज कर्मचारी महासंघ आदी संघटनांनी सहभाग घेतला. यावेळी गोवर्धन कुमरे, प्रभा पेंदाम, विनोद वट्टी, मुकेश धुर्वे, हेमराज चौधरी, ज्ञानेश्वर मडावी, अजाबराव चिचामे, गणपत मडावी, डाॅ.मधुकर कुमरे, डाॅ.ताराचंद येळणे, एकनाथ मडावी, धर्मराज मडावी, अशोक उईके, राजकुमार परतेती, प्रभुदास सोयाम, राजेश मरसकोल्हे, प्रीतम गोळंगे, अविनाश नैताम आदी उपस्थित होते. 

टॅग्स :agitationआंदोलन