बँक उघडण्यापूर्वीच लागतात खातेधारकांच्या लांब रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 05:00 IST2020-01-07T05:00:00+5:302020-01-07T05:00:14+5:30
अनेक खातेधारक कामासाठी बँक उघडण्यापुर्वीच बँकेसमोर रांगेत उभे राहतात. अनेकदा कर्मचाºयांना कामासाठी विचारपूस केल्यास हे कर्मचारी कामाची टाळाटाळ करीत दुसऱ्या टेबलकडे बोट दाखवितात. बँक कर्मचाऱ्यांच्या कार्यप्रणालीमुळे नागरिक संतप्त झाले आहेत. अनेकदा एटीएम, चेकबुक, पास बुक प्रिटिंग, खात्यावरील पैसे गायब होणे आदी कामासंदर्भात चौकशी करण्यासाठी गेले असता कुणीही जबाबदारी न घेता कामाची टाळाटाळ करतात. यामुळे वयोवृध्द नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

बँक उघडण्यापूर्वीच लागतात खातेधारकांच्या लांब रांगा
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : सरकारने घेतलेल्या बँकांच्या विलिनिकरणाच्या निर्णयाने राष्ट्रीययकृत बँकातील गर्दी दिवसेंदिवस वाढत असून खातेधारकांनाही नाहक त्रास होत आहे. शहरातील स्टेट बँकेत बँक उघडण्यापुर्वीच खातेधारकांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याचे चित्र गत काही दिवसापासून दिसत आहे. कामकाजासाठी बँकेचे वारंवार उंबरठे झिजवूनही काम होत नसल्याने बँक कर्मचाऱ्यांबद्दल नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. बँकेचे कामकाज वेळेत होत नसल्याने खातेधारक गत काही दिवसापासून त्रस्त झाले आहेत.
पासबुक प्रिंटिंगसह पैसे भरण्यासाठी, काढण्यासाठी बँकेत ग्राहकांची दररोज गर्दी दिसून येते. मात्र बँक प्रशासनाकडून मात्र खातेधारकांची होणारी गैरसोय लक्षात घेवून नियोजन होत नाही. अनेक वयोवृध्द नागरिकांना रांगेत तासनतास रांगेत उभे राहावे लागते. त्यामुळे त्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. छोट्या मोठ्या कामासाठी बँक कर्मचारी ताटकळत ठेवत असल्याने या बँक कर्मचाºयांवर अंकुश कोण ठेवणार अशा सवाल वयोवृद्ध नागरिकांमधून होत आहे.
अनेक खातेधारक कामासाठी बँक उघडण्यापुर्वीच बँकेसमोर रांगेत उभे राहतात. अनेकदा कर्मचाºयांना कामासाठी विचारपूस केल्यास हे कर्मचारी कामाची टाळाटाळ करीत दुसऱ्या टेबलकडे बोट दाखवितात. बँक कर्मचाऱ्यांच्या कार्यप्रणालीमुळे नागरिक संतप्त झाले आहेत. अनेकदा एटीएम, चेकबुक, पास बुक प्रिटिंग, खात्यावरील पैसे गायब होणे आदी कामासंदर्भात चौकशी करण्यासाठी गेले असता कुणीही जबाबदारी न घेता कामाची टाळाटाळ करतात. यामुळे वयोवृध्द नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. अनेक बँकामध्ये शेतकऱ्यांना मिळालेली पीक विम्याची रक्कमही कर्जखात्यात वळती केल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाची देखील बँका उल्लंघन करीत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिक, विद्यार्थी, वयोवृध्द नागरिक बँकेच्या कामकाजाला त्रासले आहेत.
बँक कर्मचाऱ्यांना खातेधारक वारंवार एटीएम तसेच विविध कामाची विचारपूस करु लागताच वारंवार विचारणा केल्याने कर्मचारी दमदाटी करीत असल्याचे प्रकारही काही ठिकाणी दिसून येत आहेत. यासाठी राष्ट्रीययकृत बँकाच्या शहरातील शाखा वाढविण्याची मागणी होत आहे.
प्रिंटीग मशीन नादुरुस्त
बँकेतील गर्दी कमी करुन खातेधारकांच्या सोयीसाठी अनेक बँकामध्ये पासबुक प्रिंटिंग मशीन,तसेच कॅश डिपॉजिट मशीन ठेवल्या आहेत. यातून खातेधारक स्वत: प्रिंटिंगसह,पैसे मशीनमधून भरु शकतात. मात्र स्टेट बँकेतील प्रिंटिंग मशीन नादुरुस्त असून याकडे बँक व्यवस्थापनाचे दुर्लक्ष होत आहे. तर राजीव गांधी चौकातील बँक शाखेतील कॅश डिपॉजिटचे मशीनदेखील गत काही दिवसापासून बंद आहे त्यामुळे खातेधारकांना रांगेत उभे राहून नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शहरात असणाºया एटीएमची संख्याही वाढविण्याची गरज आहे.