शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
2
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
4
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
5
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
6
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
7
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
8
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
9
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
10
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
11
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
12
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
13
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
14
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
15
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
16
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
17
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
18
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
19
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!

साकोली उपविभागातील ५६५ मामा तलावांचा प्रश्न अद्यापही अधांतरित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:38 IST

पूर्वी या तलावांची मालकी परिसरातील मालगुजारांकडे होती. मात्र १९५० संपत्ती हक्क कायद्यानुसार मामा तलाव शासनाच्या ताब्यात गेले. बर्वे ...

पूर्वी या तलावांची मालकी परिसरातील मालगुजारांकडे होती. मात्र १९५० संपत्ती हक्क कायद्यानुसार मामा तलाव शासनाच्या ताब्यात गेले. बर्वे आयोगाच्या शिफारशीनुसार दुरुस्ती व पाणी वाटपावर पाणीकर करायचे ठरविले. याला त्या वेळी जनतेने विरोध केला. मात्र शासनाने या गंभीर बाबींची दखल घेतली नाही. तेव्हापासून या तलावांची घरघर सुरू झाली. शासनाने ही तलावे ताब्यात घेतली. मात्र देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले गेले. खोलीकरणाकडे शासनाने गंभीरपणे लक्ष दिले तर तलावांचे आणि परिसरातील नागरिकांचे भाग्य उजळू शकते. अन्यथा तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्यातील मालगुजारी नकाशावर राहील याची भविष्यवाणी करायची कुणालाच गरज नाही.

साकोली अंतर्गत साकोली तालुक्यात २४८, लाखांदूर तालुक्यात १९०, आणि लाखनी तालुका १२७ तलाव आहेत. यापैकी या वर्षी गाळ काढून तलाव खोलीकरण करण्यात आलेल्या तलावांची संख्या २५६ आहे. परिणामी शासनाच्या योजनेनुसार उर्वरित तलावांचे गाळ काढण्याच्या कामाला गती केव्हा येणार आहे, असा प्रश्न आहे. शिवनीबांध, कुंभली, गुडरी येथील लघु प्रकल्पाशिवाय जुन्या तलावांची संख्या मोठी आहे. एकोडी, चांदोरी,आमगाव, पिंडकेपार, पाथरी, सावरबंद, खंडाळा, उमरी, लवारी, सितेपार, सानगडी या गावासह तालुक्यात तलावांची संख्या प्रचंड आहे. परंतु कालव्यांची प्रचंड कामे, वाढते अतिक्रमण, गाळाचा उपसा न होणे यामुळे तलाव बिनकामाचे ठरले असून, तलावांची प्रचंड संख्या नावापुरतीच आहे. जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाकडे आलेले मालगुजारी तलाव रोजगार हमी योजनेच्या कामापुरते मर्यादित राहिले. पावसाळ्यात तुडुंब भरलेला तलाव दोन महिन्यांत रिकामा होतो. एके काळी हजारो एकर सिंचनाची समता असलेले तलाव कुचकामी ठरत आहे.

बाक्स

विभागाच्या समन्वयातून शक्य

बहुतांश ग्रामीण भागातील अर्थकारण या तलावांवर अवलंबून आहे. २०१६ ते २०२० या काळात भंडारा जिल्ह्याचे २५० कोटी रुपये खर्च करून त्याला खोलीकरण केल्याची अधिकृत माहिती आहे. मात्र त्यानंतर नियोजनबद्ध तलाव खोलीकरण कामात व्यत्यय आल्याची माहिती आहे. तलाव खोलीकरणासाठी कृषी, वन, महसूल आणि वित्त आयोगाने समन्वय राखून काम केल्यास तलाव खोलीकरणाचा प्रश्न मार्गी लागतो. अनेक तलाव वन विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने तलावांचे काम वन विभाग अडवितो. साकोली तालुक्यातील वडेगाव खांबा येथील तलावांचे काम वन विभागाने तीस वर्षांपासून थांबविले. अद्यापही कालव्यांची कामे अपुरी आहेत. जर तलावांचे खोलीकरण झाल्यास तालुका सुजलाम सुफलाम होऊ शकतो.