शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

सिंचनाचे क्षेत्र १८ टक्क्यांवरून ४० टक्क्यांवर नेणार  - नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2018 23:02 IST

राज्यातील शेतकर्‍याची अवस्था चांगली नाही. शेतमालाला किंमत मिळत नाही, तरुणांच्या हाताला रोजगार नाही. महाराष्ट्राने शेतकर्‍यांना कर्जमाफी दिली. परंतु हा प्रश्‍न सुटणार नाही. शेतकर्‍यांची स्थिती चांगली व्हावी म्हणून केंद्र शासन विचार करीत आहे. शेतीला पूरक व्यवसाय सुरु झाले तर ही स्थिती चांगली होऊ शकते.

भंडारा - राज्यातील शेतकर्‍याची अवस्था चांगली नाही. शेतमालाला किंमत मिळत नाही, तरुणांच्या हाताला रोजगार नाही. महाराष्ट्राने शेतकर्‍यांना कर्जमाफी दिली. परंतु हा प्रश्‍न सुटणार नाही. शेतकर्‍यांची स्थिती चांगली व्हावी म्हणून केंद्र शासन विचार करीत आहे. शेतीला पूरक व्यवसाय सुरु झाले तर ही स्थिती चांगली होऊ शकते. सिंचनाच्या व्यवस्था झाल्या तर सिंचन वाढणार आहे, शेतमालाचा उत्पादन खर्च कमी झाला तर शेतकर्‍याची स्थिती सुधारणार आहे. यासाठी राज्याचे सिंचनाचे क्षेत्र १८ टक्क्यांवरून ४० टक्क्यांवर नेल्याशिवाय राहणार नाही, असा विश्‍वास केंद्रीय रस्ते वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यानी  व्यक्त केला.भंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीनिमित्त भाजपा उमेदवार हेमंत पटले यांच्या प्रचारार्थ तुमसर येथेआयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. या प्रचारसभेला भंडाराचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उमेदवार हेमंत पटले, आ. विजय रहांगडाले, आ. संजय पुराम, माजी आ. केशवराव मानकर, नगरअध्यक्ष प्रदीप पडोळे, आ.चरण वाघमारे, आ. कृष्णा खोपडे, उपस्थित होते.याप्रसंगी ना.गडकरी म्हणाले, ५ लाख कोटी रुपये राज्याला विकास कामांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. यापैकी ४ लाख कोटींचे रस्ते आणि १ लाख कोटी रुपये सिंचनाच्या प्रकल्पासाठी देण्यात आले आहे. सिंचनाचे २६ जुने प्रकल्प पूर्ण करण्यासाठी २० हजार कोटी रुपये दिले, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यासाठी २० हजार कोटी दिले. गोसीखुर्दसाठी ८ हजार कोटी दिले. येत्या २ वर्षात हा प्रकल्प पूर्ण करायचा आहे. राज्यातील अपूर्ण सिंचनाचे प्रकल्प पूर्ण करून सिंचनाचे क्षेत्र १८ टक्क्यांवरून ४० टक्क्यांवर नेणार असल्याचेही गडकरी म्हणाले.धानाच्या तणसापासून इथेनॉल निर्माण होऊ शकते. १ टन तणसापासून २८० लिटर इथेनॉलची निर्मिती होते. देव्हाडा येथे इथेनॉल निर्मितीचा प्रकल्प लवकरच सुरु करण्यात येणार असून या परिसरातील ५०० तरुणांना हा प्रकल्प रोजगार देणार आहे. नितीन गडकरी यांनी केंद्र शासनाने सुरु केलेल्या सर्व योजनांचा आढावा यावेळी घेतला. भाजपा हाच पक्ष विकास करू शकतो. हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. हा मायलेकांचा पक्ष नाही, असे सांगत गडकरी म्हणाले भाजपात कार्यकर्ता मोठा होतो. या निवडणुकीची खरे तर गरज नव्हती. पण ज्याचे मन एका घरात रमत नाही, तो सतत दुसर्‍या घराचा शोध घेत असतो. हेमंत पटले हे जनतेचे उमेदवार आहे. परिस्थिती बदलायची असेल, देशाचा विकास करायचा असेल तर भाजपाचे हेमंत पटले यांना निवडून देण्याचे आवाहनही गडकरींनी केले. या जाहीरसभेसाठी हजारोंच्या संख्येत नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :Nitin Gadakriनितिन गडकरीMaharashtraमहाराष्ट्रnewsबातम्या