शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

सिंचनाचे क्षेत्र १८ टक्क्यांवरून ४० टक्क्यांवर नेणार  - नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2018 23:02 IST

राज्यातील शेतकर्‍याची अवस्था चांगली नाही. शेतमालाला किंमत मिळत नाही, तरुणांच्या हाताला रोजगार नाही. महाराष्ट्राने शेतकर्‍यांना कर्जमाफी दिली. परंतु हा प्रश्‍न सुटणार नाही. शेतकर्‍यांची स्थिती चांगली व्हावी म्हणून केंद्र शासन विचार करीत आहे. शेतीला पूरक व्यवसाय सुरु झाले तर ही स्थिती चांगली होऊ शकते.

भंडारा - राज्यातील शेतकर्‍याची अवस्था चांगली नाही. शेतमालाला किंमत मिळत नाही, तरुणांच्या हाताला रोजगार नाही. महाराष्ट्राने शेतकर्‍यांना कर्जमाफी दिली. परंतु हा प्रश्‍न सुटणार नाही. शेतकर्‍यांची स्थिती चांगली व्हावी म्हणून केंद्र शासन विचार करीत आहे. शेतीला पूरक व्यवसाय सुरु झाले तर ही स्थिती चांगली होऊ शकते. सिंचनाच्या व्यवस्था झाल्या तर सिंचन वाढणार आहे, शेतमालाचा उत्पादन खर्च कमी झाला तर शेतकर्‍याची स्थिती सुधारणार आहे. यासाठी राज्याचे सिंचनाचे क्षेत्र १८ टक्क्यांवरून ४० टक्क्यांवर नेल्याशिवाय राहणार नाही, असा विश्‍वास केंद्रीय रस्ते वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यानी  व्यक्त केला.भंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीनिमित्त भाजपा उमेदवार हेमंत पटले यांच्या प्रचारार्थ तुमसर येथेआयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. या प्रचारसभेला भंडाराचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उमेदवार हेमंत पटले, आ. विजय रहांगडाले, आ. संजय पुराम, माजी आ. केशवराव मानकर, नगरअध्यक्ष प्रदीप पडोळे, आ.चरण वाघमारे, आ. कृष्णा खोपडे, उपस्थित होते.याप्रसंगी ना.गडकरी म्हणाले, ५ लाख कोटी रुपये राज्याला विकास कामांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. यापैकी ४ लाख कोटींचे रस्ते आणि १ लाख कोटी रुपये सिंचनाच्या प्रकल्पासाठी देण्यात आले आहे. सिंचनाचे २६ जुने प्रकल्प पूर्ण करण्यासाठी २० हजार कोटी रुपये दिले, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यासाठी २० हजार कोटी दिले. गोसीखुर्दसाठी ८ हजार कोटी दिले. येत्या २ वर्षात हा प्रकल्प पूर्ण करायचा आहे. राज्यातील अपूर्ण सिंचनाचे प्रकल्प पूर्ण करून सिंचनाचे क्षेत्र १८ टक्क्यांवरून ४० टक्क्यांवर नेणार असल्याचेही गडकरी म्हणाले.धानाच्या तणसापासून इथेनॉल निर्माण होऊ शकते. १ टन तणसापासून २८० लिटर इथेनॉलची निर्मिती होते. देव्हाडा येथे इथेनॉल निर्मितीचा प्रकल्प लवकरच सुरु करण्यात येणार असून या परिसरातील ५०० तरुणांना हा प्रकल्प रोजगार देणार आहे. नितीन गडकरी यांनी केंद्र शासनाने सुरु केलेल्या सर्व योजनांचा आढावा यावेळी घेतला. भाजपा हाच पक्ष विकास करू शकतो. हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. हा मायलेकांचा पक्ष नाही, असे सांगत गडकरी म्हणाले भाजपात कार्यकर्ता मोठा होतो. या निवडणुकीची खरे तर गरज नव्हती. पण ज्याचे मन एका घरात रमत नाही, तो सतत दुसर्‍या घराचा शोध घेत असतो. हेमंत पटले हे जनतेचे उमेदवार आहे. परिस्थिती बदलायची असेल, देशाचा विकास करायचा असेल तर भाजपाचे हेमंत पटले यांना निवडून देण्याचे आवाहनही गडकरींनी केले. या जाहीरसभेसाठी हजारोंच्या संख्येत नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :Nitin Gadakriनितिन गडकरीMaharashtraमहाराष्ट्रnewsबातम्या