‘त्या’ बांधकामाची चौकशी थंडबस्त्यात
By Admin | Updated: June 10, 2016 00:54 IST2016-06-10T00:54:35+5:302016-06-10T00:54:35+5:30
बावनथडी प्रकल्पातील मुख्य कालव्यावरील बावनथडी धरण व आलेसूर-चिखली रस्त्यावरच्या पुलाचे बांधकाम निकृष्ट साहित्याचा वापर होत असल्याची...

‘त्या’ बांधकामाची चौकशी थंडबस्त्यात
अहवालाची प्रतीक्षा : प्रकरण बावनथडी प्रकल्पातील कामाचे
विलास बन्सोड उसर्रा
बावनथडी प्रकल्पातील मुख्य कालव्यावरील बावनथडी धरण व आलेसूर-चिखली रस्त्यावरच्या पुलाचे बांधकाम निकृष्ट साहित्याचा वापर होत असल्याची 'लोकमत'मध्ये वृत्त प्रकाशित होताच बावनथडी प्रकल्पाचे उपअभियंत्यांनी गंभीर दखल घेवून चौकशी सुरू केली. बांधकामात वापरात येणारे सर्व साहित्याचे टेस्टींगसाठी गुणनियंत्रक उपविभाग भंडारा आंबाडी याकडे पाठविला. मात्र अद्यापही त्याचा अहवाल प्राप्त न झाल्याने चौकशी थंडबस्त्यात आहे.
वन्यप्राण्यांना ये-जा करण्यासाठी मुख्य कालव्यावर पुल बांधकाम करण्यात येत आहे. सदर पुलाचे बांधकाम गोंदिया येथील सिंघानिया नामक कंत्राटदाराला देण्यात आले. सदर कंत्राटदार हा प्रकल्पातील अधिकारी, कर्मचारी यांच्या संगनमताने निकृष्ठ साहित्याचा वापर करून पुलाचे बांधकाम सुरू आहे.
कमी दर्जाच्या लोखंडाचा उपयोग करीत आहे. सिमेंट अल्पप्रमाणात घालत असून बांधकामावर पाणी टाकत नसल्याने कामाचा दर्जा पुर्णत: निकृष्ठ झाला आहे, अशी शेतकऱ्यांची ओरड होती. विशेष म्हणजे नाल्यातील वाळूचा अवैधपणे चोरटी वाळुचा उपयोग सदर बांधकाम केला जात आहे. सदर बांधकाम बावनथडी धरणाच्या मुख्य कालव्यावर अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आलेसूर व चिखली भागात सुरू आहे.
या जंगलात कुणीही ये-जा करत नसल्याने याचाच कंत्राटदाराने गैरफायदा घेत निकृष्ट बांधकाम करत आहे. यासाठी बावनथडी प्रकल्पातील कनिष्ठ अभियंता यांच्या संगनमताने सदर काम निकृष्ट होत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. सदर बांधकामावर बावनथडी प्रकल्पातील कोणीही कर्मचारी उपस्थित राहत नसल्याचीही माहिती आहे. त्यामुळे निकृष्ट बांधकाम करण्यासाठी कंत्राटदाराला पाठबळ मिळत आहे.
सदर प्रकरणाची उपअभियंता बावणथडी प्रकल्प तुमसर यांनी चौकशी सुरू केली असली तरीही गुणनियंत्रकाकडून चाचणी अहवाल प्राप्त झाल्याशिवाय सदर चौकशी थंडबस्त्यातच आहे. पण वरिष्ठ अधिकारी कनिष्ठ कर्मचाऱ्यांची पाठराखण करीत असल्याचे चित्र दिसत आहे.