मोबाईलवर इंटरनेट, कॅफेवर संक्र ांत
By Admin | Updated: January 3, 2015 22:57 IST2015-01-03T22:57:50+5:302015-01-03T22:57:50+5:30
मागील अनेक वर्षांपासून इंटरनेट सुविधा केवळ सायबर कॅफेमध्येच होती. ग्रामीण भागात त्याचा गंधही नव्हता. इंटरनेट असणारे मोबाईल हे महागडे असायचे. त्यामुळे सायबर कॅफेत तरुणांची गर्दी असायची.

मोबाईलवर इंटरनेट, कॅफेवर संक्र ांत
भंडारा : मागील अनेक वर्षांपासून इंटरनेट सुविधा केवळ सायबर कॅफेमध्येच होती. ग्रामीण भागात त्याचा गंधही नव्हता. इंटरनेट असणारे मोबाईल हे महागडे असायचे. त्यामुळे सायबर कॅफेत तरुणांची गर्दी असायची. परंतु मागील दोन वर्षांपासून तरुणांच्या हातात असलेल्या स्मार्टफोनमुळे सायबर कॅफेवर संक्र ांत आली आहे.
सध्याचे युग तंत्रज्ञानाचे आहे. मोबाईलक्रांतीने भारले गेले आहे. आजचे तंत्रज्ञान उद्या जुने होत आहे. टॅबबरोबर बाजारात दररोज येणारे नवीन तंत्रज्ञान सामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या किंमतीत मिळत आहे. विकसीत तंत्रज्ञानाच्या वस्तू वापरण्याची वृत्ती, सहज व वेगाने उपलब्ध होणाऱ्या इंटरनेटमुळे जग वेगवान झाले आहे. जगभरात कोणतीही गोष्ट घडली की, काही क्षणातच ती आपल्यापर्यंत पोहोचते. गॅस सिलिंडरचा नंबर लावण्यापासून बिल भरणे, स्पर्धा परीक्षांचा अर्ज भरणे, सोशलमीडिया वापरण्यापर्यंत सर्वच कामे हातातील मोबाईलच्या माध्यमातून होत आहेत.
साधारणपणे १० ते १२ वर्षांपूर्वी सायबर कॅफे या प्रकाराला सुरुवात झाली. इंटरनेटवरून कुठलिही माहिती घ्यावयाची असल्यास इंटरनेट कॅफेतच जावे लागत होते. तेही शहरातच असल्याने ग्रामीण भागातील युवकांची तारांबळ उडायची. फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटची भुरळ पडल्याने इंटरनेट कॅफेतच युवकांचा ठिय्या असायचा. सोबतच इंटरनेटवरील गेमही खेळण्याची ‘क्रेझ’ वाढली. त्यामुळे इंटरनेट कॅफे मालकांचा व्यवसाय तेजीत होता. परंतु मागील दोन वर्षात स्मार्टफोन अत्यल्प किंमतीत मिळायला लागल्यामुळे आणि त्यामध्ये इंटरनेट सहज वापरता येत असल्यामुळे तरुणांच्या खिशात इंटरनेट सामावले गेले. यामुळे कॅफेकडे जाणारी पावलांची आता मोबाईलच्या स्क्रीनवर बोटे फिरू लागली आहेत.
त्यातच व्हॉट्सअॅॅप, हाईक, वुईचॅट यासारखी मोबाईलवरची संवाद साधने आल्यामुळे स्मार्ट फोनचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. परिणामी इंटरनेट कॅफेची संख्या दिवसागणिक कमी होत चालली आहे. केवळ शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी ग्रामीण भागात कॅफेचा उपयोग होत असून यामुळे कॅफेचा व्यवसाय धोक्यात आल्याचे दिसून येत आहे. (शहर प्रतिनिधी )