शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

स्वच्छंद मैदानी खेळांऐवजी बालकांच्या हाती आला स्मार्टफोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 06:00 IST

मोबाईलचे वेड एवढे वाढले आहे की, मुले आपले पालक घरी येण्याची तासन्तास प्रतीक्षा करीत असतात. वडील अथवा आई घरी आल्याच्या आनंदापेक्षा मोबाईल आपल्या हातात आला याचाच अधिक आनंद मुलांच्या चेहऱ्यावर दिसून येतो. अनेक पालकांनी आपल्या मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात यश आल्याचे दिसत नाही.

ठळक मुद्देबालपण हरविले : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईलने कोमेजतेय बालपण, मुलांना घराबाहेर जाऊ देण्यास पालकांचाही नकार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तीन दशकापूर्वीचा काळ आठवा. गावातील मैदान मुलांनी फुलून गेलेले असायचे. कबड्डी, हुतूतू, विटीदांडू असे खेळ रंगलेले असायचे. स्वच्छंद मैदानी खेळात बालपण रमून जायचे. मात्र अलिकडे आधुनिक तंत्रज्ञानात क्रांती झाली. प्रत्येकाच्या घरी स्मार्टफोन आला. नकळत चिमुकल्यांनी मोबाईलचा ताबा घेतला आणि अख्खे बालपणच हरवून गेले. मुलांना मोबाईलचे एवढे वेड लागले की, आता त्यांच्यापुढे पालकांनीही हात टेकले आहे.‘रम्य ते बालपण’ असे म्हटले जाते. बालपणीच्या आठवणीत रमायला प्रत्येकालाच आवडते. तीन दशकापूर्वी विद्यार्थी आणि मैदानाचे नाते अतूट होते. शाळा सुटली की, मैदान गाठायचे. मनसोक्त खेळायचे आणि सायंकाळीच घरी परतायचे, असा दिनक्रम असायचा. गावातील असो की, शहरातील मैदान बालकांनी गजबजून गेलेले असायचे.आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सर्वत्र होत आहे. संवादाचे माध्यम असलेला मोबाईल स्मार्ट झाला. चैनीची वस्तू असलेला मोबाईल प्रत्येकाची गरज झाला आहे. त्यामुळेच गरीब असो वा श्रीमंत प्रत्येकाच्या हातात आता फोन दिसत आहे. या फोनने जीवन सुखकर होत असले तरी त्याच्या दुष्परिणामांचाही तेवढाच सामना करावा लागत आहे. सर्वप्रथम शालेय विद्यार्थी मोबाईलच्या जाळ्यात अडकले. तासन्तास मोबाईलमध्ये अडकलेले विद्यार्थी कुठेही दिसून येतील. विद्यार्थीच काय शाळेत न जाणारे तीन चार वर्षाचे चिमुकलेही आता मोबाईलसाठी रडताना घरात दिसून येतात. मला जेवढे मोबाईलमधले कळत नाही त्यापेक्षा अधिक आमच्या मुलाला कळते असे अभिमानाने सांगायचे, परंतु आता मुलं अभ्यासापेक्षा मोबाईलमध्येच जास्त वेळ घालवत असल्याने पालकांच्या हृदयाचे ठोके वाढू लागले आहेत.मोबाईलचे वेड एवढे वाढले आहे की, मुले आपले पालक घरी येण्याची तासन्तास प्रतीक्षा करीत असतात. वडील अथवा आई घरी आल्याच्या आनंदापेक्षा मोबाईल आपल्या हातात आला याचाच अधिक आनंद मुलांच्या चेहऱ्यावर दिसून येतो. अनेक पालकांनी आपल्या मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात यश आल्याचे दिसत नाही. उलट अनेक पालक आपल्या मुलांना मैदानावर खेळायला जाण्यास मज्जाव करीत असल्याचे दिसत आहे.आधुनिक पिढीही टेक्नोसॅव्ही झाली आहे. कोणतीही गोष्ट झटपट करण्याकडे त्यांचा कल असतो. मात्र हे तंत्रज्ञान आता विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरू लागले आहे. अनेकांना डोळ्याच्या आजारासह विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. अभ्यासात मुले माघारात असल्याच्याही तक्रारीत वाढ झाल्याचे दिसत आहे. मोबाईलने संपूर्ण बालपणच हिरावून घेतल्याचे सध्यातरी घराघरात चित्र आहे. 

टॅग्स :Studentविद्यार्थीMobileमोबाइल