शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
3
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
4
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
5
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
6
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
7
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
8
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
9
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
10
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
11
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
12
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
13
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
14
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
15
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
16
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
17
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
18
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
19
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात

स्वच्छंद मैदानी खेळांऐवजी बालकांच्या हाती आला स्मार्टफोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 06:00 IST

मोबाईलचे वेड एवढे वाढले आहे की, मुले आपले पालक घरी येण्याची तासन्तास प्रतीक्षा करीत असतात. वडील अथवा आई घरी आल्याच्या आनंदापेक्षा मोबाईल आपल्या हातात आला याचाच अधिक आनंद मुलांच्या चेहऱ्यावर दिसून येतो. अनेक पालकांनी आपल्या मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात यश आल्याचे दिसत नाही.

ठळक मुद्देबालपण हरविले : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईलने कोमेजतेय बालपण, मुलांना घराबाहेर जाऊ देण्यास पालकांचाही नकार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तीन दशकापूर्वीचा काळ आठवा. गावातील मैदान मुलांनी फुलून गेलेले असायचे. कबड्डी, हुतूतू, विटीदांडू असे खेळ रंगलेले असायचे. स्वच्छंद मैदानी खेळात बालपण रमून जायचे. मात्र अलिकडे आधुनिक तंत्रज्ञानात क्रांती झाली. प्रत्येकाच्या घरी स्मार्टफोन आला. नकळत चिमुकल्यांनी मोबाईलचा ताबा घेतला आणि अख्खे बालपणच हरवून गेले. मुलांना मोबाईलचे एवढे वेड लागले की, आता त्यांच्यापुढे पालकांनीही हात टेकले आहे.‘रम्य ते बालपण’ असे म्हटले जाते. बालपणीच्या आठवणीत रमायला प्रत्येकालाच आवडते. तीन दशकापूर्वी विद्यार्थी आणि मैदानाचे नाते अतूट होते. शाळा सुटली की, मैदान गाठायचे. मनसोक्त खेळायचे आणि सायंकाळीच घरी परतायचे, असा दिनक्रम असायचा. गावातील असो की, शहरातील मैदान बालकांनी गजबजून गेलेले असायचे.आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सर्वत्र होत आहे. संवादाचे माध्यम असलेला मोबाईल स्मार्ट झाला. चैनीची वस्तू असलेला मोबाईल प्रत्येकाची गरज झाला आहे. त्यामुळेच गरीब असो वा श्रीमंत प्रत्येकाच्या हातात आता फोन दिसत आहे. या फोनने जीवन सुखकर होत असले तरी त्याच्या दुष्परिणामांचाही तेवढाच सामना करावा लागत आहे. सर्वप्रथम शालेय विद्यार्थी मोबाईलच्या जाळ्यात अडकले. तासन्तास मोबाईलमध्ये अडकलेले विद्यार्थी कुठेही दिसून येतील. विद्यार्थीच काय शाळेत न जाणारे तीन चार वर्षाचे चिमुकलेही आता मोबाईलसाठी रडताना घरात दिसून येतात. मला जेवढे मोबाईलमधले कळत नाही त्यापेक्षा अधिक आमच्या मुलाला कळते असे अभिमानाने सांगायचे, परंतु आता मुलं अभ्यासापेक्षा मोबाईलमध्येच जास्त वेळ घालवत असल्याने पालकांच्या हृदयाचे ठोके वाढू लागले आहेत.मोबाईलचे वेड एवढे वाढले आहे की, मुले आपले पालक घरी येण्याची तासन्तास प्रतीक्षा करीत असतात. वडील अथवा आई घरी आल्याच्या आनंदापेक्षा मोबाईल आपल्या हातात आला याचाच अधिक आनंद मुलांच्या चेहऱ्यावर दिसून येतो. अनेक पालकांनी आपल्या मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात यश आल्याचे दिसत नाही. उलट अनेक पालक आपल्या मुलांना मैदानावर खेळायला जाण्यास मज्जाव करीत असल्याचे दिसत आहे.आधुनिक पिढीही टेक्नोसॅव्ही झाली आहे. कोणतीही गोष्ट झटपट करण्याकडे त्यांचा कल असतो. मात्र हे तंत्रज्ञान आता विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरू लागले आहे. अनेकांना डोळ्याच्या आजारासह विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. अभ्यासात मुले माघारात असल्याच्याही तक्रारीत वाढ झाल्याचे दिसत आहे. मोबाईलने संपूर्ण बालपणच हिरावून घेतल्याचे सध्यातरी घराघरात चित्र आहे. 

टॅग्स :Studentविद्यार्थीMobileमोबाइल