शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

उन्हाळी धानासह भाजीपाला पिकांवर किडींचा प्रादूर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 05:00 IST

तालुक्यातील अनेक गावांमध्ये उन्हाळी रोवणीची कामे आटोपली आहेत. तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने अनेक शेतकºयांचे भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. गत काही दिवसांपासून वातावरण बदलत असल्याने भाजीपाला पिकांवर संक्रात आली आहे. उन्हाळी धानावर करपा, कडाकरपा रोगासह खोड पोकरणाºया अळीने शेतकरी चिंतेत आहे. खोडकिड्याचा प्रादुर्भाव देखील काही ठिकाणी दिसून येत आहे.

ठळक मुद्देकडाकरपा रोगाने शेतकरी चिंतेत : भाजीपाला उत्पादक संकटात

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : अवकाळी पावसासह वातावरणातील सातत्याने होणाऱ्या बदलामुळे उन्हाळी हंगामातील धान पिकावर रोग किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी धान पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे.तालुक्यातील अनेक गावांमध्ये उन्हाळी रोवणीची कामे आटोपली आहेत. तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने अनेक शेतकºयांचे भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. गत काही दिवसांपासून वातावरण बदलत असल्याने भाजीपाला पिकांवर संक्रात आली आहे. उन्हाळी धानावर करपा, कडाकरपा रोगासह खोड पोकरणाºया अळीने शेतकरी चिंतेत आहे. खोडकिड्याचा प्रादुर्भाव देखील काही ठिकाणी दिसून येत आहे.तालुक्यात सुमारे आठ हजार हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी धान पिकाची रोवणी झाली आहे. यावर्षीच्या दमदार पावसामुळे तालुक्यात भाजीपाला पिकाचे क्षेत्र देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. वारंवार फवारणी करुन देखील किड नियंत्रणात येत नसल्याने शेतकºयाच्या खर्चात वाढ झाली आहे. शासनाने कृषी विभागामार्फत शेतकºयांना मोफत औषधांचा पुरवठा करण्याची गरज आहे. शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याने शेतकºयांना पीक कर्ज भरण्यासाठी देखील पैसे नसल्याने शासनाच्या मदतीची गरज आहे. गत आठ दिवसांपासून कोरोना संकटाने शेतकºयांचा भाजीपाला बाजारपेठेत विक्री होत नसल्याने भाजीपाला उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहे. त्यामुळे दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकºयांना तात्काळ शासनाने मदत करावी, अशी तालुक्यातील शेतकºयांनी तालुका कृषी अधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी