शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

स्वतंत्र विदर्भाचे आंदोलन तेवत राहील

By admin | Updated: April 13, 2016 00:46 IST

स्वतंत्र विदर्भाची मागणी रास्त आहे. या मागणीकरिता सरकार पाठ दाखवित आहे. राज्यातील भाजप सरकार विदर्भ देईल की नाही ही आता शंका उत्पन्न होत आहे.

भंडारा येथे सभा : श्रीहरी अणे यांचे प्रतिपादनभंडारा : स्वतंत्र विदर्भाची मागणी रास्त आहे. या मागणीकरिता सरकार पाठ दाखवित आहे. राज्यातील भाजप सरकार विदर्भ देईल की नाही ही आता शंका उत्पन्न होत आहे. या सरकारकडून अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. विदर्भ वेगळा झाल्याशिवाय विकास शक्य नाही त्यामुळे विदर्भाचा हक्कासाठी हे आंदोलन तेवत राहणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन महाअधिवक्ता श्रीहरी अणे यांनी व्यक्त केले. बहिरंगेश्वर मंदिराच्या प्रांगणात सोमवारला विदर्भाचा मुद्द्यावर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर माजी आमदार मधुकर कुकडे, आनंदराव वंजारी, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, सुभाष कारेमोरे, भरत खंडाईत अ‍ॅड. समर्थ, अ‍ॅड. निरज खांदेवाले, संजय एकापुरे, प्रभाकर सपाटे, महेंद्र निंबार्ते हे उपस्थित होते.अ‍ॅड. अणे यांनी १९८४ साली दांडेकर समितीच्या अहवालानुसार विदर्भात १२ कोटींचा बॅकलॉक होता. विदर्भात पैशा पश्चिम महाराष्ट्रात पळविला गेला. सन २००० मध्ये ईटीकोर बॅकलॉक समितीने आपला अहवाल सादर केला. त्यावेळी ६६०० कोटींचा बॅकलॉक होता. हा सर्व निधी पश्चिम महाराष्ट्रात खर्च करण्यात आला. राज्य शासनाने विदर्भातील जनतेची दिशाभूल केली. सन १९६० साली विदर्भ महाराष्ट्राशी जोडण्यात आला. त्यावेळी काही करार करण्यात आले. त्यामध्ये कलम ३७१/२ मध्ये नऊ करार करण्यात आले. सन १९६० विदर्भातील लोकसंख्या २२ टक्के होती. विदर्भाच्या विकासासाठी २२ टक्के निधी खर्च केला जाईल. पण एकही वर्ष २२ टक्के निधी राज्य शासनाने दिला नाही. नोकरीमध्ये सुध्दा २२ टक्के दिल्या जातील पण असे कधीच झाले नाही.केळकर समितीच्या अहवालानुसार मागील तीन वर्षात एकट्या पुणे विभागाचा विचार केला तर राज्य सरकारमध्ये ५०.२ टक्के नोकऱ्या पुणे विभागातील लोकांना देण्यात आले आहे. विदर्भातील नागपुर व अमरावती असे दोन विभाग मिळून राज्य सरकारमध्ये २.५टक्के नोकऱ्या मिळाल्या आहेत. एवढी मोठी तफावत दिसून येत असून सुध्दा सरकारने विदर्भात वेगळा करण्याच्या केवळ भुलथापा दिल्या आहेत.विदर्भातील विणकर बेकार आहेत. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असतांना वेगळा विदर्भ झाला पाहिजे म्हणून ११७ आमदारांनी राजीनामे दिले होते. दरम्यान वेगळ्या विदर्भाला विरोध करणाऱ्या शिवसेनेचा त्यांनी खरपूस समाचार घेतला. जोपर्यंत वेगळा विदर्भ होत नाही. तोपर्यंत आंदोलन सुरुच राहील व वेगळा विदर्भ घेतल्या शिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे प्रतिपादन अणे यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे संचालन महेंद्र निंबार्ते यांनी केले. (शहर प्रतिनिधी)