शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
2
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
3
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
4
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
5
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
6
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
7
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
8
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
9
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
10
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
11
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
12
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
13
काळजी घ्या! मार्केटमध्ये नवीन स्कॅम आला, व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नपत्रिका पाठवून बँक खाते रिकामे करतात
14
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
15
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
16
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न
17
पोस्ट ऑफिसचा मोठा निर्णय, अमेरिकेत जाणाऱ्या पार्सलवर बंदी! फक्त 'या' गोष्टींना सूट मिळणार
18
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
19
मैत्रिणीसोबत थांबला होता फ्लॅटमध्ये, तरुणाने अचानक ३२व्या मजल्यावरून मारली उडी
20
IB Recruitment: गुप्तचर विभागात ज्युनियर ऑफिसर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता

स्वतंत्र विदर्भाचे आंदोलन तेवत राहील

By admin | Updated: April 13, 2016 00:46 IST

स्वतंत्र विदर्भाची मागणी रास्त आहे. या मागणीकरिता सरकार पाठ दाखवित आहे. राज्यातील भाजप सरकार विदर्भ देईल की नाही ही आता शंका उत्पन्न होत आहे.

भंडारा येथे सभा : श्रीहरी अणे यांचे प्रतिपादनभंडारा : स्वतंत्र विदर्भाची मागणी रास्त आहे. या मागणीकरिता सरकार पाठ दाखवित आहे. राज्यातील भाजप सरकार विदर्भ देईल की नाही ही आता शंका उत्पन्न होत आहे. या सरकारकडून अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. विदर्भ वेगळा झाल्याशिवाय विकास शक्य नाही त्यामुळे विदर्भाचा हक्कासाठी हे आंदोलन तेवत राहणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन महाअधिवक्ता श्रीहरी अणे यांनी व्यक्त केले. बहिरंगेश्वर मंदिराच्या प्रांगणात सोमवारला विदर्भाचा मुद्द्यावर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर माजी आमदार मधुकर कुकडे, आनंदराव वंजारी, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, सुभाष कारेमोरे, भरत खंडाईत अ‍ॅड. समर्थ, अ‍ॅड. निरज खांदेवाले, संजय एकापुरे, प्रभाकर सपाटे, महेंद्र निंबार्ते हे उपस्थित होते.अ‍ॅड. अणे यांनी १९८४ साली दांडेकर समितीच्या अहवालानुसार विदर्भात १२ कोटींचा बॅकलॉक होता. विदर्भात पैशा पश्चिम महाराष्ट्रात पळविला गेला. सन २००० मध्ये ईटीकोर बॅकलॉक समितीने आपला अहवाल सादर केला. त्यावेळी ६६०० कोटींचा बॅकलॉक होता. हा सर्व निधी पश्चिम महाराष्ट्रात खर्च करण्यात आला. राज्य शासनाने विदर्भातील जनतेची दिशाभूल केली. सन १९६० साली विदर्भ महाराष्ट्राशी जोडण्यात आला. त्यावेळी काही करार करण्यात आले. त्यामध्ये कलम ३७१/२ मध्ये नऊ करार करण्यात आले. सन १९६० विदर्भातील लोकसंख्या २२ टक्के होती. विदर्भाच्या विकासासाठी २२ टक्के निधी खर्च केला जाईल. पण एकही वर्ष २२ टक्के निधी राज्य शासनाने दिला नाही. नोकरीमध्ये सुध्दा २२ टक्के दिल्या जातील पण असे कधीच झाले नाही.केळकर समितीच्या अहवालानुसार मागील तीन वर्षात एकट्या पुणे विभागाचा विचार केला तर राज्य सरकारमध्ये ५०.२ टक्के नोकऱ्या पुणे विभागातील लोकांना देण्यात आले आहे. विदर्भातील नागपुर व अमरावती असे दोन विभाग मिळून राज्य सरकारमध्ये २.५टक्के नोकऱ्या मिळाल्या आहेत. एवढी मोठी तफावत दिसून येत असून सुध्दा सरकारने विदर्भात वेगळा करण्याच्या केवळ भुलथापा दिल्या आहेत.विदर्भातील विणकर बेकार आहेत. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असतांना वेगळा विदर्भ झाला पाहिजे म्हणून ११७ आमदारांनी राजीनामे दिले होते. दरम्यान वेगळ्या विदर्भाला विरोध करणाऱ्या शिवसेनेचा त्यांनी खरपूस समाचार घेतला. जोपर्यंत वेगळा विदर्भ होत नाही. तोपर्यंत आंदोलन सुरुच राहील व वेगळा विदर्भ घेतल्या शिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे प्रतिपादन अणे यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे संचालन महेंद्र निंबार्ते यांनी केले. (शहर प्रतिनिधी)