शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

सावित्रीबार्इंचे विचार आत्मसात करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 10:10 PM

मोठ्या पदावरील भगिनी वैज्ञानिक दृष्टीकोन जागृत न करता अंधश्रद्धेला बळी पडत असल्याचे दृश्य भारतीय समाजात दिसत आहे.

ठळक मुद्देराहुल डोंगरे यांचे प्रतिपादन: बोरी येथे समाजप्रबोधन कार्यक्रम

आॅनलाईन लोकमततुमसर : मोठ्या पदावरील भगिनी वैज्ञानिक दृष्टीकोन जागृत न करता अंधश्रद्धेला बळी पडत असल्याचे दृश्य भारतीय समाजात दिसत आहे. हे आपल्या समाजाचे दु:ख आहे. तेव्हा अज्ञान न स्वीकारता विज्ञान स्वीकारावे. भारतीय स्त्रियांचा श्वास सावित्रीबाई ज्योतिबा फुले आहेत. मृतवत झालेल्या भारतीय स्त्रियाला नवसंजीवनी दिली. भारतीय स्त्रियांना सन्मान दिला. सावित्रीबाई फुले यांचे विचार प्रत्येकानी आत्मसात करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन भंडारा जिल्हाध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे राहुल डोंगरे यांनी प्रतिपादन केले.महात्मा ज्योतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक समिती बोरीच्या वतीने आयोजित समाजप्रबोधन कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. सचिव बेरूरकर होते. प्रमुख अतिथी म्हणून पं.स.सभापती कविता बनकर, माजी सभापती कुसुम कांबळे, सरपंच अविनाश उपरीकर, उपसरपंच अरविंद भेदे, माजी सरपंच नामदेव कांबळे, माजी सरपंच भाऊराव उपरीकर, सुगंधा राहूल डोंगरे, माजी सरपंच सुरेंद्र राऊत, ग्रा.पं. सदस्या अनिता कांबळे, लता कांबळे, रेशमा बोरकर, निशा धावडे, तंटामुक्ती अध्यक्ष रोशनलाल कांबळे, ललिता उपरीकर, सेवक उपरीकर, हसेंद्र कांबळे आदी उपस्थित होते.राहूल डोंगरे म्हणाले, भारतात फुले दाम्पत्य जन्मास आले नसते तर शिक्षणाची गंगा समाजातील खालच्या वर्गापर्यंत पोहचली नसती आणि भारतीय समाजातील स्त्रीयांचे विश्व चूल आणि मूल एवढेच सीमित असते. पण आमच्या समाजातील स्त्रियांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुल्यांच्या सामाजिक व शैक्षणिक चळवळीतील योगदानाची माहिती नाही. मोठ्या पदावर गेलेल्या व पगार घेणाºया भगिनी सुद्धा वैज्ञानिक दृष्टीकोन जागृत न करता अंधश्रद्धेला बळी पडत असल्याचे दृश्य भारतीय समाजात दिसत आहे. देशाला आज सावित्रीबाई फुले यांच्या विचाराची गरज निर्माण झाली आहे.प्रास्ताविक सरपंच अविनाश उपरीकर यांनी केले. गावाचा सर्वांगिण विकास हेच माझे ध्येय आहे, असे आवर्जून सांगितले. प्रा. सचिन वेरूळकर यांनी स्पर्धेच्या जगात टिकाव धरण्यासाठी आत्मविश्वास व चिकाटी हे गुण आत्मसात करा, असा संदेश देवून ध्येयाकडे वाटचाल करण्याचा सल्ला दिला. १० वी व १२ वीत प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.हभप हिराजी पंचबुधे महाराज व हभप विक्की चन्ने महाराज धापेवाडा यांनी किर्तनातून समाजप्रबोधन केले. संचालन व आभार प्रदर्शन उत्तम नगरधने यांनी केले. कार्यक्रमासाठी महात्मा ज्योतिबा फुले स्मारक समिती, देवस्थान पंचकमेटी, ग्रा.पं. कमेटी जि.प. पूर्व माध्य शाळा, महात्मा ज्योतिबा फुले क्रिडामंडळ, पुरूष बचत गट, महिला बचत गट बोरी वासियांनी अथक परिश्रम घेतले.