शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

पवनीच्या ऐतिहासिक वास्तूंकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 01:06 IST

भंडारा जिल्ह्यातील पवनी नगर प्राचिन व ऐतिहासिक नगर म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र येथे असलेल्या ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्यात प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. भंडारा जिल्ह्यातील सर्वात जुनी नगरपालिका येथे आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : भंडारा जिल्ह्यातील पवनी नगर प्राचिन व ऐतिहासिक नगर म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र येथे असलेल्या ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्यात प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.भंडारा जिल्ह्यातील सर्वात जुनी नगरपालिका येथे आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून म्हणजे सन १८६७ पासून येथे नगरपालिका असून त्यावेळी नगराची लोकसंख्या ५० हजारांवर होती. लोकसंख्या कमी होणारे एकमेव गाव असावे. महाभारतात पयोष्णी व वेणा असा उल्लेख असलेल्या प्रसिद्ध वैनगंगा नदीचे तिरावर हे गाव वसलेले आहे. सम्राट अशोकाचे कालखंडापासून गाव अस्तित्वात असल्याचे पुरावे उत्खननात सापडले आहेत. पवनीवर मौर्य, शुंग, सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्टÑकुट व यादव या राजवंशानी राज्य केल्याचे पुरावेसुद्धा उत्खननात सापडले. इ.स. १३१८ मध्ये यादवांचे राज्य लयास गेल्यावर देवगडच्या गवळी राजाची सत्ता येथे प्रस्तावित झाली. त्यांचे राजवटीत येथे भुईकोट किल्ला बांधला तो हल्ली अस्तित्वात नाही.यादव वंशीय राजाकडून चांद्याच्या गोंड राजानी हा प्रदेश जिंकला व नगराचे संरक्षणासाठी १५ व्या शतकात परकोट (किल्ला) बांधला असावा तो सध्या अस्तित्वात आहे. पवनीच्या उत्तरेस वैनगंगा नदी व उर्वरीत तीन दिशांना यु आकाराची मातीची भिंत (टेकडी) व पश्चिमेकडे एक भव्य प्रवेशद्वार व टेकडीवर डोंगरी किल्ला (परकोट) अस्तित्वात आहे. पुरातत्व विभागाने संरक्षीत करून त्याची निगा राखली आहे.गोंड राजाची सत्ता असताना वैभव संपन्न गाव म्हणून रघुजी राजे भोसले यांनी स्वारी करून हा प्रदेश १७३९ ला ताब्यात घेतला. त्यानंतर १८१८ मध्ये तीनदा पेंदाज्यांनी आक्रमण केले. पवनीकरांची दागदागीने व संपत्ती लुटली. तीसऱ्या आक्रमणाचे वेळी पवनीकरांनी एकजुटीने पेंढाज्यांना पिटाळून लावले. त्यामुळे १७३९ ते १८१८ पर्यंत पवनी भोसले राजवटीत होते. सन १८१८ मध्ये पवनीचा प्रदेश इंग्रजांनी ताब्यात घेतला व त्यांचे कारकिर्दीत १८६७ ला नगरपालिका स्थापन केली. पवनी नगरात विणकर (कोष्टी) समाज फार मोठ्या प्रमाणात होता येथे जरी काठाची लुगडी व कापड बनविण्याचे हातमाग मोठ्या प्रमाणात होते. जरी काठाचे उत्तम कापड येथून बाहेर निर्यात होत असे. १८६५ मध्ये नागपूर येथे आयोजित प्रदर्शनीत पवनी येथे निर्मित कापडांना प्रथम व द्वितीय पुरस्कार मिळाल्याची नोंद आहे.यावरून विणकर समाजाचे कुशल कारागिर येथे होते. कोसा साडी व कापडाची निर्मिती सुद्धा येथील हातमागावर कोष्टी समाज करीत होता. कोष्टी समाजाप्रमाणे बारई समाज पवनी येथे मोठ्या संख्येने होता.जिल्ह्यातील मोठे पानमळे पवनी येथे होते. त्यावेळी सामूहिक शेतीच्या पद्धतीने बारई समाज बिड्याच्या पानांचे मोठे उत्पादन येथे घेत होता व त्याची निर्यात करून चांग़ला व्यवसाय करीत होता. येथील ढिवर समाज सुद्धा व्यवसायात त्यावेळी पुढारलेला होता. मासेमारी सोबतच सर्व मोठ्या तलावात सिंगाळा उत्पादीत करण्यात अग्रेसर होता. येथील सिंगाडा चविष्ठ म्हणून अन्य जिल्ह्यात निर्यात केल्या जात होता. सन १९०५ मध्ये पवनी येथे पूर्व माध्यमिक शाळा, शासकीय मुलींची शाळा व उर्दू शाळा अस्तित्वात होती.