शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

पवनीच्या ऐतिहासिक वास्तूंकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 01:06 IST

भंडारा जिल्ह्यातील पवनी नगर प्राचिन व ऐतिहासिक नगर म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र येथे असलेल्या ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्यात प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. भंडारा जिल्ह्यातील सर्वात जुनी नगरपालिका येथे आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : भंडारा जिल्ह्यातील पवनी नगर प्राचिन व ऐतिहासिक नगर म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र येथे असलेल्या ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्यात प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.भंडारा जिल्ह्यातील सर्वात जुनी नगरपालिका येथे आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून म्हणजे सन १८६७ पासून येथे नगरपालिका असून त्यावेळी नगराची लोकसंख्या ५० हजारांवर होती. लोकसंख्या कमी होणारे एकमेव गाव असावे. महाभारतात पयोष्णी व वेणा असा उल्लेख असलेल्या प्रसिद्ध वैनगंगा नदीचे तिरावर हे गाव वसलेले आहे. सम्राट अशोकाचे कालखंडापासून गाव अस्तित्वात असल्याचे पुरावे उत्खननात सापडले आहेत. पवनीवर मौर्य, शुंग, सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्टÑकुट व यादव या राजवंशानी राज्य केल्याचे पुरावेसुद्धा उत्खननात सापडले. इ.स. १३१८ मध्ये यादवांचे राज्य लयास गेल्यावर देवगडच्या गवळी राजाची सत्ता येथे प्रस्तावित झाली. त्यांचे राजवटीत येथे भुईकोट किल्ला बांधला तो हल्ली अस्तित्वात नाही.यादव वंशीय राजाकडून चांद्याच्या गोंड राजानी हा प्रदेश जिंकला व नगराचे संरक्षणासाठी १५ व्या शतकात परकोट (किल्ला) बांधला असावा तो सध्या अस्तित्वात आहे. पवनीच्या उत्तरेस वैनगंगा नदी व उर्वरीत तीन दिशांना यु आकाराची मातीची भिंत (टेकडी) व पश्चिमेकडे एक भव्य प्रवेशद्वार व टेकडीवर डोंगरी किल्ला (परकोट) अस्तित्वात आहे. पुरातत्व विभागाने संरक्षीत करून त्याची निगा राखली आहे.गोंड राजाची सत्ता असताना वैभव संपन्न गाव म्हणून रघुजी राजे भोसले यांनी स्वारी करून हा प्रदेश १७३९ ला ताब्यात घेतला. त्यानंतर १८१८ मध्ये तीनदा पेंदाज्यांनी आक्रमण केले. पवनीकरांची दागदागीने व संपत्ती लुटली. तीसऱ्या आक्रमणाचे वेळी पवनीकरांनी एकजुटीने पेंढाज्यांना पिटाळून लावले. त्यामुळे १७३९ ते १८१८ पर्यंत पवनी भोसले राजवटीत होते. सन १८१८ मध्ये पवनीचा प्रदेश इंग्रजांनी ताब्यात घेतला व त्यांचे कारकिर्दीत १८६७ ला नगरपालिका स्थापन केली. पवनी नगरात विणकर (कोष्टी) समाज फार मोठ्या प्रमाणात होता येथे जरी काठाची लुगडी व कापड बनविण्याचे हातमाग मोठ्या प्रमाणात होते. जरी काठाचे उत्तम कापड येथून बाहेर निर्यात होत असे. १८६५ मध्ये नागपूर येथे आयोजित प्रदर्शनीत पवनी येथे निर्मित कापडांना प्रथम व द्वितीय पुरस्कार मिळाल्याची नोंद आहे.यावरून विणकर समाजाचे कुशल कारागिर येथे होते. कोसा साडी व कापडाची निर्मिती सुद्धा येथील हातमागावर कोष्टी समाज करीत होता. कोष्टी समाजाप्रमाणे बारई समाज पवनी येथे मोठ्या संख्येने होता.जिल्ह्यातील मोठे पानमळे पवनी येथे होते. त्यावेळी सामूहिक शेतीच्या पद्धतीने बारई समाज बिड्याच्या पानांचे मोठे उत्पादन येथे घेत होता व त्याची निर्यात करून चांग़ला व्यवसाय करीत होता. येथील ढिवर समाज सुद्धा व्यवसायात त्यावेळी पुढारलेला होता. मासेमारी सोबतच सर्व मोठ्या तलावात सिंगाळा उत्पादीत करण्यात अग्रेसर होता. येथील सिंगाडा चविष्ठ म्हणून अन्य जिल्ह्यात निर्यात केल्या जात होता. सन १९०५ मध्ये पवनी येथे पूर्व माध्यमिक शाळा, शासकीय मुलींची शाळा व उर्दू शाळा अस्तित्वात होती.