शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

पवनीच्या ऐतिहासिक वास्तूंकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 01:06 IST

भंडारा जिल्ह्यातील पवनी नगर प्राचिन व ऐतिहासिक नगर म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र येथे असलेल्या ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्यात प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. भंडारा जिल्ह्यातील सर्वात जुनी नगरपालिका येथे आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : भंडारा जिल्ह्यातील पवनी नगर प्राचिन व ऐतिहासिक नगर म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र येथे असलेल्या ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्यात प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.भंडारा जिल्ह्यातील सर्वात जुनी नगरपालिका येथे आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून म्हणजे सन १८६७ पासून येथे नगरपालिका असून त्यावेळी नगराची लोकसंख्या ५० हजारांवर होती. लोकसंख्या कमी होणारे एकमेव गाव असावे. महाभारतात पयोष्णी व वेणा असा उल्लेख असलेल्या प्रसिद्ध वैनगंगा नदीचे तिरावर हे गाव वसलेले आहे. सम्राट अशोकाचे कालखंडापासून गाव अस्तित्वात असल्याचे पुरावे उत्खननात सापडले आहेत. पवनीवर मौर्य, शुंग, सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्टÑकुट व यादव या राजवंशानी राज्य केल्याचे पुरावेसुद्धा उत्खननात सापडले. इ.स. १३१८ मध्ये यादवांचे राज्य लयास गेल्यावर देवगडच्या गवळी राजाची सत्ता येथे प्रस्तावित झाली. त्यांचे राजवटीत येथे भुईकोट किल्ला बांधला तो हल्ली अस्तित्वात नाही.यादव वंशीय राजाकडून चांद्याच्या गोंड राजानी हा प्रदेश जिंकला व नगराचे संरक्षणासाठी १५ व्या शतकात परकोट (किल्ला) बांधला असावा तो सध्या अस्तित्वात आहे. पवनीच्या उत्तरेस वैनगंगा नदी व उर्वरीत तीन दिशांना यु आकाराची मातीची भिंत (टेकडी) व पश्चिमेकडे एक भव्य प्रवेशद्वार व टेकडीवर डोंगरी किल्ला (परकोट) अस्तित्वात आहे. पुरातत्व विभागाने संरक्षीत करून त्याची निगा राखली आहे.गोंड राजाची सत्ता असताना वैभव संपन्न गाव म्हणून रघुजी राजे भोसले यांनी स्वारी करून हा प्रदेश १७३९ ला ताब्यात घेतला. त्यानंतर १८१८ मध्ये तीनदा पेंदाज्यांनी आक्रमण केले. पवनीकरांची दागदागीने व संपत्ती लुटली. तीसऱ्या आक्रमणाचे वेळी पवनीकरांनी एकजुटीने पेंढाज्यांना पिटाळून लावले. त्यामुळे १७३९ ते १८१८ पर्यंत पवनी भोसले राजवटीत होते. सन १८१८ मध्ये पवनीचा प्रदेश इंग्रजांनी ताब्यात घेतला व त्यांचे कारकिर्दीत १८६७ ला नगरपालिका स्थापन केली. पवनी नगरात विणकर (कोष्टी) समाज फार मोठ्या प्रमाणात होता येथे जरी काठाची लुगडी व कापड बनविण्याचे हातमाग मोठ्या प्रमाणात होते. जरी काठाचे उत्तम कापड येथून बाहेर निर्यात होत असे. १८६५ मध्ये नागपूर येथे आयोजित प्रदर्शनीत पवनी येथे निर्मित कापडांना प्रथम व द्वितीय पुरस्कार मिळाल्याची नोंद आहे.यावरून विणकर समाजाचे कुशल कारागिर येथे होते. कोसा साडी व कापडाची निर्मिती सुद्धा येथील हातमागावर कोष्टी समाज करीत होता. कोष्टी समाजाप्रमाणे बारई समाज पवनी येथे मोठ्या संख्येने होता.जिल्ह्यातील मोठे पानमळे पवनी येथे होते. त्यावेळी सामूहिक शेतीच्या पद्धतीने बारई समाज बिड्याच्या पानांचे मोठे उत्पादन येथे घेत होता व त्याची निर्यात करून चांग़ला व्यवसाय करीत होता. येथील ढिवर समाज सुद्धा व्यवसायात त्यावेळी पुढारलेला होता. मासेमारी सोबतच सर्व मोठ्या तलावात सिंगाळा उत्पादीत करण्यात अग्रेसर होता. येथील सिंगाडा चविष्ठ म्हणून अन्य जिल्ह्यात निर्यात केल्या जात होता. सन १९०५ मध्ये पवनी येथे पूर्व माध्यमिक शाळा, शासकीय मुलींची शाळा व उर्दू शाळा अस्तित्वात होती.