शहरं
Join us  
Trending Stories
1
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
2
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
3
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
4
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
5
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
6
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
7
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
8
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
9
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
10
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
11
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!
12
चिनी विद्यार्थिनीला युक्रेनियन तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवल्याची शिक्षा, विद्यापीठानं उचललं टोकाचं पाऊल
13
नॅशनल पार्कमधील ‘वनराणी’चे रुपडे पालटले; व्हिस्टाडोमसह नव्या अवतारात सेवेत, कधी सुरू होणार?
14
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
15
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
16
वृद्धाला हातपाय बांधून कारमध्ये कोंडले, मग कुटुंब ताजमहाल पाहण्यात रंगले, सुरक्षा रक्षकाने पाहिल्याने अनर्थ टळला   
17
"आमचं शांततापूर्ण जीवन..."; गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने फोन चार्ज झाल्यावर पहिलं काय केलं?
18
केस एवढे गळतात की टक्कल पडण्याचीच वाटते भीती; 'हा' घरगुती उपाय ठरेल रामबाण
19
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
20
2025 Keeway RR300: थेट बीएमडब्लूशी स्पर्धा करणार मोटो वॉल्टची नवी बाईक? दोन लाखांहून कमी किंमतीत लॉन्च!

प्रामाणिक कार्य केल्यास गाव विकास शक्य

By admin | Updated: May 21, 2016 00:35 IST

जनतेने आपल्याला गावाच्या विकासाचे काम करण्यासाठी निवडून दिले आहे. ज्या पदावर आपण विराजमान होतो.

माहिती अभियान कार्यशाळा : सहायक आयुक्त यांचे प्रतिपादनभंडारा : जनतेने आपल्याला गावाच्या विकासाचे काम करण्यासाठी निवडून दिले आहे. ज्या पदावर आपण विराजमान होतो. त्या पदाचे अधिकार, कर्तव्ये, नियम समजून घेतले पाहिजेत. आपण प्रामाणिकपणे काम केले तर, सरपंच आणि सचिव मिळून गावाला विकासाच्या वाटेवर नेऊ शकतात, असे प्रतिपादन सहाय्यक आयुक्त देवसूदन धारगावे यांनी केले.पवनी पंचायत समितीच्या सभागृहात सरपंच, सचिव आणि पंचायत समिती व जिल्हा परिषद लोकप्रतिनिधींसाठी एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. १२५ व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभाग, जिल्हा माहिती कार्यालय आणि गट विकास अधिकारी पवनी यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी पंचायत समिती सभापती अर्चना वैद्य, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, प्रा. अनिल काणेकर, अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे डी.के. रंगारी, पंचायत समिती सदस्य तोमेश्वर, तुळशीदास कोल्हे, जिल्हा परिषद सदस्य मनोरथा जांभुळे, गट विकास अधिकारी बी.वाय. निमसरकार उपस्थित होते.धारगावे म्हणाले, अजुनही आपल्या समाजात जातीच्या भिंती आहेत. त्यामुळे एक समाज दुसऱ्या समाजाला कमी लेखतो. भारतरत्न डॉ. बाबासाहेबांनी ही जातीव्यवस्था नष्ट करण्याचे प्रयत्न केले. शासनही आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी योजना राबवित आहे. त्याची माहिती धारगावे यांनी दिली.सभापती अर्चना वैद्य यांनी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कार्याची माहिती उपस्थितांना करुन दिली. बाबासाहेबांनी शिका आणि संघटित होण्याचा मंत्र दिला. त्यांनी दलितांनी शिक्षण घेतलेच पाहिजे, असा आग्रह धरला. त्यांच्या प्रेरणेने आज समाज मोठया प्रमाणात शिक्षणाच्या प्रवाहात आला आहे. मनीषा सावळे म्हणाल्या, सरपंच आणि ग्रामसेवकांनी योजनांची माहिती जनतेला दिली पाहिजे. त्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेली पुस्तिका सर्व उपस्थितांना देण्यात आली. तसेच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, बाळासाहेब ठाकरे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांसाठी आॅटो परवाना देणारी योजना, कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, यु.पी.एस.सी.साठी शिष्यवृत्ती अशा अनेक नवीन योजनांची माहिती दिली. यावेळी प्रा. अनिल काणेकर यांनी भारताचे संविधानातील विविध कलमांची माहिती आणि त्यामागचा इतिहास समजावून सांगितला. तसेच डी.के. रंगारी यांनी विविध प्रयोगांच्या माध्यमातून जादुटोणाविरोधी कायदयातील १२ कलमांची माहिती दिली. तसेच या कलमांच्या अंतर्गत होणारी शिक्षा व दंड याची जाणीव सरपंच ग्रामसेवकांना यावेळी करुन दिली.कार्यशाळेचे संचालन विस्तार अधिकारी एस.बी. साळवे यांनी केले तर आभार गटविकास अधिकारी बी.वाय. निमसरकार यांनी व्यक्त केले. या कार्यशाळेला पवनी तालुक्यातील १८५ ग्रामसेवक, सरपंचांची उपस्थिती होती. (नगर प्रतिनिधी)