शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

‘आयसीटी’ उत्तिर्णांसाठी ‘एमएससीआयटी’ची गरज नाही

By admin | Updated: March 9, 2016 01:36 IST

इयत्ता नववी ते बारावी स्तरावरील आयसीटी अभ्यासक्रम उत्तीर्ण विद्यार्थ्यांना एमएससीआयटी अभ्यासक्रम उत्तीर्ण करण्याची गरज नाही.

विद्यार्थ्यांना दिलासा : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा आदेशदेवानंद नंदेश्वर भंडाराइयत्ता नववी ते बारावी स्तरावरील आयसीटी अभ्यासक्रम उत्तीर्ण विद्यार्थ्यांना एमएससीआयटी अभ्यासक्रम उत्तीर्ण करण्याची गरज नाही. त्यांना या अभ्यासक्रमाचे सर्व फायदे मिळणार आहेत. असा आदेश महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नुकताच पारीत केला आहे. राज्यातील सर्व माध्यमिक शाळांमध्ये कार्यानुभव विषयांतर्गत माहिती तंत्रज्ञान हा विषय इयत्ता नववी व दहावीच्या स्तरावर अभ्यासण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच इयत्ता अकरावी व बारावी या स्तरावर माहिती तंत्रज्ञान हा विषय कला, विज्ञान व वाणिज्य या शाखांना अभ्यासकता येतो. द्विलक्षी अभ्यासक्रमाअंतर्गत संगणक शास्त्र व उच्च माध्यमिक अभ्यासक्रमात कॉम्प्युटर टेक्निक व मल्टीमीडिया अँड इंटरनेट टेक्नॉलॉजी हे विषय अभ्यासण्याची सुविधा उपलब्ध आहे. याचा राज्यातील असंख्य विद्यार्थी फायदा घेत आहेत. हे सर्व अभ्यासक्रम दोन वर्ष कालावधीचे आहेत. या कालावधीत विद्यार्थ्यांना थेअरीसह प्रात्यक्षिकांचे सर्व ज्ञान प्राप्त होते. शासकीय सेवेतील अधिकारी, कर्मचारी यांना एमएससीआयटी हा अभ्यासक्रम उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्यांना देखील हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांना व्यवसायाच्या विविध संधी उपलब्ध होत असतात. इयत्ता नववी व दहावीसाठी माहिती तंत्रज्ञान विषय अभ्यासणाऱ्या विद्यार्थ्यांना व अकरावी तसेच बारावीसाठी माहिती तंत्रज्ञान संगणक शास्त्र, कॉम्प्युटर टेक्निक, मल्डीमीडिया अँड इंटरनेट टेक्नॉलॉजी हे विषय अभ्यासून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना एमएससीआयटी प्रमाणपत्र अभ्यासक्रम पुन्हा उत्तीर्ण करण्याची आवश्यकता राहणार नाही. सदर अभ्यासक्रम महामंडळाच्या अभ्यासक्रमाशी समकक्ष समजण्यास शासनाने मान्यता दिली आहे.