शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

‘आयसीटी’ उत्तिर्णांसाठी ‘एमएससीआयटी’ची गरज नाही

By admin | Updated: March 9, 2016 01:36 IST

इयत्ता नववी ते बारावी स्तरावरील आयसीटी अभ्यासक्रम उत्तीर्ण विद्यार्थ्यांना एमएससीआयटी अभ्यासक्रम उत्तीर्ण करण्याची गरज नाही.

विद्यार्थ्यांना दिलासा : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा आदेशदेवानंद नंदेश्वर भंडाराइयत्ता नववी ते बारावी स्तरावरील आयसीटी अभ्यासक्रम उत्तीर्ण विद्यार्थ्यांना एमएससीआयटी अभ्यासक्रम उत्तीर्ण करण्याची गरज नाही. त्यांना या अभ्यासक्रमाचे सर्व फायदे मिळणार आहेत. असा आदेश महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नुकताच पारीत केला आहे. राज्यातील सर्व माध्यमिक शाळांमध्ये कार्यानुभव विषयांतर्गत माहिती तंत्रज्ञान हा विषय इयत्ता नववी व दहावीच्या स्तरावर अभ्यासण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच इयत्ता अकरावी व बारावी या स्तरावर माहिती तंत्रज्ञान हा विषय कला, विज्ञान व वाणिज्य या शाखांना अभ्यासकता येतो. द्विलक्षी अभ्यासक्रमाअंतर्गत संगणक शास्त्र व उच्च माध्यमिक अभ्यासक्रमात कॉम्प्युटर टेक्निक व मल्टीमीडिया अँड इंटरनेट टेक्नॉलॉजी हे विषय अभ्यासण्याची सुविधा उपलब्ध आहे. याचा राज्यातील असंख्य विद्यार्थी फायदा घेत आहेत. हे सर्व अभ्यासक्रम दोन वर्ष कालावधीचे आहेत. या कालावधीत विद्यार्थ्यांना थेअरीसह प्रात्यक्षिकांचे सर्व ज्ञान प्राप्त होते. शासकीय सेवेतील अधिकारी, कर्मचारी यांना एमएससीआयटी हा अभ्यासक्रम उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्यांना देखील हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांना व्यवसायाच्या विविध संधी उपलब्ध होत असतात. इयत्ता नववी व दहावीसाठी माहिती तंत्रज्ञान विषय अभ्यासणाऱ्या विद्यार्थ्यांना व अकरावी तसेच बारावीसाठी माहिती तंत्रज्ञान संगणक शास्त्र, कॉम्प्युटर टेक्निक, मल्डीमीडिया अँड इंटरनेट टेक्नॉलॉजी हे विषय अभ्यासून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना एमएससीआयटी प्रमाणपत्र अभ्यासक्रम पुन्हा उत्तीर्ण करण्याची आवश्यकता राहणार नाही. सदर अभ्यासक्रम महामंडळाच्या अभ्यासक्रमाशी समकक्ष समजण्यास शासनाने मान्यता दिली आहे.