गारपीटग्रस्त मदतीपासून वंचित
By Admin | Updated: May 17, 2014 23:29 IST2014-05-17T23:29:29+5:302014-05-17T23:29:29+5:30
२३ फेब्रुवारीला आलेल्या अस्मानी संकटाने पालांदूर परिसर हादरुन गेला. केवळ ४५ मिनिटात होत्याचे नव्हते झाले.

गारपीटग्रस्त मदतीपासून वंचित
पालांदूर : २३ फेब्रुवारीला आलेल्या अस्मानी संकटाने पालांदूर परिसर हादरुन गेला. केवळ ४५ मिनिटात होत्याचे नव्हते झाले. शेतपिक, घराचे अतोनात नुकसान झाले. पंचनामे आटोपले, शासन स्तरावरुन निधीही आला. तरीही कित्येक शेतकर्यांना आजही मोबदला मिळाला नाही. खराशी, खुनारी, लोहारा, पळसगाव, घोडेझरी परिसरात शेतीची, घरांची अतोनात नुकसान झाले. शेतकरी देशोधडीला लागला. वजनदार नेत्यांनी हजेरी लावत नुकसानभरपाई मिळणारच असा दावा करीत तहसीलदार लाखनी यांना निधी पाठवला. यातील काही शेतकर्यांना निधी थेट खात्यात मिळाला तर बर्याच शेतकर्यांना खाते उघडूनही नुकसान भरपाई आताही मिळालीच नाही. अनेक शेतकरी वारंवार बँकेचे उंबरठे झिजवून थकला. शाखा व्यवस्थापकही निरुत्तर झाले. हतबल शेतकरी खरीपाच्या तयारीत लागण्यापूर्वी निराश झाला. माजी पंचायत समिती सदस्य वसंत शेळके यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की तहसीलदार लाखनी यांचा कारभार कासवगतीने चालू आहे. चुकाच चुका असल्याने बँकेत आलेले रुपये परत गेले. यामुळे शेतकर्यांना मानसिक धक्का सहन करावा लागत आहे. तालुक्याला नेतृत्व कमजोर पडत असल्याने प्रशासनावर धाक उरला नाही. कर्मचारीगण आपल्याच तोर्यात असल्याने शेतकरी नादार होत आहे. शेतकर्यांची दयनीय अवस्था चिंताजनक असून चालू पिककर्ज थकित झाला आहे. यामुळे नव्याने पिककर्ज मिळण्याकरीता मार्ग बंद झाला आहे. शासन स्तरावर योजना आखल्या जातात. पण राबविताना प्रशासन डोळेझाकपणा करीत असल्याने योजना कागदावरच राहतात. यामुळे विकास हा केवळ देखावा आहे. गारपीेटग्रस्तांच्या असह्य वेदना समजून घेणारा व त्यांना सर्वतोपरी शासनाकडून मदत मिळवून देणारा देवदूत लाखनी तालुक्याला मिळेल का असा प्रश्न वसंत शेळके यांनी केला आहे. एकंदरीत त्वरित गारपीटग्रस्तांना मदत मिळण्याकरीता प्रशासनस्तरावर प्रामाणिक प्रयत्नांची गरज असून तशी मागणी वसंत शेळके यांनी केली आहे. खराशी : खराशी : जुन-जुलै २०१३ या कालावधीत पावसाच्या तडाख्याने परिसरात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती. यानंतर राज्य शासनाने मदतीची घोषणा केली आणि ती मदत स्थानिक प्रशासनाच्या खात्यावर जमा झाली मात्र अजुनही अतिवृष्टी ग्रस्त शेतकर्यांच्या खात्यावर जमा न झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. (वार्ताहर)