पारा ४८ अंशावर जनजीवन प्रभावित

By Admin | Updated: June 8, 2014 23:42 IST2014-06-08T23:42:24+5:302014-06-08T23:42:24+5:30

पाच दिवसांपासून उष्णतेची आगपाखड सुरु आहे. सुर्याची सर्वाधिक धग आजही जिल्हावासियांना सहन करावी लागली, रविवारी पुन्हा पारा पाच अंशानी वाढला असून ४८ अंश सेल्सिअस ही यावर्षीच्या

Humans affect life on 48 degrees | पारा ४८ अंशावर जनजीवन प्रभावित

पारा ४८ अंशावर जनजीवन प्रभावित

अघोषित संचारबंदी : मागील १२ वर्षात सर्वाधिक तापमानाची नोंद
भंडारा : पाच दिवसांपासून उष्णतेची आगपाखड सुरु आहे. सुर्याची सर्वाधिक धग आजही जिल्हावासियांना सहन करावी लागली, रविवारी पुन्हा पारा पाच अंशानी वाढला असून  ४८ अंश सेल्सिअस ही यावर्षीच्या तापमानाची सर्वोच्च नोंद करण्यात आली.
शुक्रवार रोजी पारा ४७ अंश, शनिवारला ४७.५ तर आज रविवारला  ४८ अंशावर धडकला. मागील १२ वर्षाची रेकार्डब्रेक तापमानाची नोंद करण्यात आली आहे. उन्हाची सर्वाधिक झळ  आज जाणवली. जिल्ह्यात दिवसभर अघोषित संचारबंदीचे रुप पहावयास मिळाले. उष्णतेत कमालिने वाढ झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
सुर्य आग ओकु लागला आहे. उष्ण वारे वाहत असल्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे.  शहरातील अंतर्गत रस्ते असो की राष्ट्रीय महामार्ग निर्मनुष्य झाल्याचे दिसून आले.  उष्णतेची आगपाखड सुरु असल्याने उष्माघाताची शक्यता अधिक बळावली आहे.
रविवारी कमाल तापमनाची नोंद करण्यात आली असली तरी किमानाची नोंद आजही नोंद करण्यात आली नाही. उष्णतेत कमालिने वाढ झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. सुर्य आग ओकु लागला आहे. उष्ण वारे वाहत असल्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. शहरातील वर्दळ सायंकाळपर्यंत मंदावली आहे. शहरातील अंतर्गत रस्ते असोत की राष्ट्रीय महामार्ग असो, सर्व ठिकाणचे रस्ते निर्मनुष्य झाल्याचे चित्र मागील आठ दिवसात दिसून आले आहे. 
(नगर प्रतिनिधी)
 

Web Title: Humans affect life on 48 degrees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.