शहरं
Join us  
Trending Stories
1
जे शिंदेंना मिळालं नाही ते नितीश कुमारांना मिळणार; बिहारमध्ये पुन्हा CM पद, फॉर्म्युला ठरला
2
Accident: राज्यात नऊ महिन्यांत ११ हजार ५३२ मृत्यू; मुंबईत सर्वाधिक अपघात, 'हे' ठिकाण अत्यंत धोकादायक!
3
ट्रम्प यांचा यु-टर्न! अमेरिकेच्या 'या' निर्णयानं भारताला होणार २६ हजार कोटींचा फायदा, 'यांना' मिळणार मोठा लाभ
4
सौदीचे प्रिन्स ७ वर्षानंतर अमेरिका दौऱ्यावर, ट्रम्प यांचा आनंद गगनात मावेना, कारणही आहे खास
5
Chandrayaan 4: भारत चंद्रावर जाणार; तेथील नमुने पृथ्वीवर आणणार, चांद्रयान-४ मोहिमेला सरकारची मंजुरी
6
पत्नीच्या नावे पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये उघडा खातं; दर महिन्याला ₹९२५० चं मिळेल व्याज
7
Mumbai: मिरा-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर भीषण अपघात; ६० फुटांवरून पडून सुपरवायझरचा मृत्यू!
8
GenZ च्या आंदोलनामुळे हादरलेल्या नेपाळमध्ये अखेर निवडणुकांची घोषणा, मार्च महिन्यात मतदान
9
"आईला कदाचित फाशीची शिक्षा देतील, पण लक्षात ठेवा..."; शेख हसीना यांच्या मुलाचा गंभीर इशारा
10
Lalu Yadav: राजदच्या पराभवानंतर लालू यांच्या घरात फूट; मुलींनी सोडले घर, तेजस्वी यादव यांच्यावर आरोप
11
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
12
पालघर साधू हत्याकांडात ज्यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यांनाच भाजपाने दिला पक्षात प्रवेश
13
पाकिस्तानात जाफर एक्सप्रेस पुन्हा टार्गेटवर; बॉम्बस्फोटाने रेल्वे ट्रॅक उद्ध्वस्त, अनर्थ टळला
14
शेख हसीना यांच्या खटल्याच्या निकालाआधी बांगलादेशात हिंसाचार, पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार
15
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी धनलाभाच्या दृष्टीने शुभ दिवस, प्रवास संभवतात
16
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
17
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
18
विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !
19
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
20
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याला भरली हुडहुडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 22:54 IST

ढगाळ वातावरणानंतर जिल्ह्यात रिमझीम पाऊस बरसल्याने प्रचंड गारवा निर्माण झाला. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे हुडहुडी भरणारी थंडी निर्माण झाली असून ठिकठिकाणी शेकोट्या पेटवून उब मिळविण्याचा प्रयत्न सुरु आहे. शहरासह ग्रामीण भागातील जनजीवन या थंडीच्या कडाक्याने गारठले आहे.

ठळक मुद्देरिमझीम पाऊस : गारवा वाढल्याने ठिकठिकाणी पेटल्या शेकोट्या

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ढगाळ वातावरणानंतर जिल्ह्यात रिमझीम पाऊस बरसल्याने प्रचंड गारवा निर्माण झाला. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे हुडहुडी भरणारी थंडी निर्माण झाली असून ठिकठिकाणी शेकोट्या पेटवून उब मिळविण्याचा प्रयत्न सुरु आहे. शहरासह ग्रामीण भागातील जनजीवन या थंडीच्या कडाक्याने गारठले आहे.शनिवारपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले. रविवारी पावसाळी वातावरण तयार होऊन दुपारी १२ वाजताच्या सुमारास पावसाच्या सरीला सुरुवात झाली. सायंकाळपर्यंत रिमझीम पाऊस बरसत होता. त्यातच बोचरा वारा वाहत होता. तापमान कमालीचे खाली घसरल्याने प्रचंड थंडी निर्माण झाली होती. घराबाहेर निघणारा प्रत्येक जण उबदार कपडे घालूनच बाहेर पडत होता. शहरातील विविध भागात भर दुपारी शेकोट्या पेटल्याचे दृष्य होते. ग्रामीण भागातही शेकोट्या पेटल्या होत्या. या अकाली पावसाचा फटका सर्वांनाच बसत आहे. थंडीचा सर्वाधिक त्रास वृद्धांना होत असून सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवू लागला आहे.हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवत पाऊस बरसला. या पावसाने भाजीपाला आणि रबी पिकांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. रबी पीके पिवळी पडू लागली आहेत. पालांदूर परिसरात रबीतील उडीद, मुग, लाखोरी आदी पिकांना या अवकाळी पावसाचा लाभ होणार असला तरी बागायतदार शेतकऱ्यांची मात्र डोकेदुखी ठरत आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या वादळाने विदर्भात हलक्या पावसाने हजेरी लावली. मंगळवारपर्यंत असेच वातावरण राहण्याचा अंदाज आहे.पावसाळी वातावरणात आधारभूत केंद्रावर धान उघड्यावरपावसाळी वातावरणात आधारभूत केंद्रावर धान उघड्यावर असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली. गत आठवड्यात अवकाळी पावसाचा फटका बसल्यानंतरही बाजार समितीने कोणत्याही सुविधा पुरविल्या नाही. जिल्ह्यातील ६७ पैकी बहुतांश केंद्रांवर सध्या धान उघड्यावर असून शेतकरी आपला धान झाकण्याची धडपड करीत आहेत. भंडारा जिल्ह्यात आधारभूत धान खरेदीला सुरुवात झाली. जिल्ह्यातील ६७ केंद्रांवर धानाची खरेदी सुरु आहे. त्यात भंडारा तीन, मोहाडी नऊ, तुमसर १५, लाखनी ११, साकोली १२, लाखांदूर १२ आणि पवनी तालुक्यातील पाच केंद्रांचा समावेश आहे. या केंद्रांवर शेतकºयांना मूलभूत सुविधा पुरविण्याची सर्व जबाबदारी बाजार समित्यांची आहे. त्याबाबत पणन महासंघाने त्यांना पत्रही पाठविले. परंतु जिल्ह्यातील कोणत्याही बाजार समितीत शेतकऱ्यांना सुविधा मिळत नाही. विक्रीच्या प्रतिक्षेत असलेले धान ठिकठिकाणी उघड्यावर आहेत. गत दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होऊन सोमवारी जिल्ह्यात हलका पाऊस झाला. यामुळे आधारभूत केंद्रात उघड्यावर असलेले धान पुन्हा ओले होण्याची भीती निर्माण झाली आहे. गत आठवड्याचा अनुभव बघता शेतकरी आपला धान झाकण्यासाठी धडपड करीत आहेत. मात्र बाजार समिती या शेतकऱ्यांना कोणतीही सुविधा देत नाही. गतवर्षीच्या तुलनेत यंदा धानाची दुप्पट खरेदी झाली असून आधारभूत केंद्रावर धान साठविण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. गोदामही अपुरे पडत आहेत. परिणामी धान खरेदीची गती मंदावली आहे. अनेक शेतकरी १५ ते २० दिवस धान विक्रीच्या प्रतिक्षेत या ठिकाणी दिसून येतात.