शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
7
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
8
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
9
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
10
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
11
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
12
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
13
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
14
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
15
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
16
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
17
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
18
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
19
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
20
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल

जिल्ह्याला भरली हुडहुडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 22:54 IST

ढगाळ वातावरणानंतर जिल्ह्यात रिमझीम पाऊस बरसल्याने प्रचंड गारवा निर्माण झाला. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे हुडहुडी भरणारी थंडी निर्माण झाली असून ठिकठिकाणी शेकोट्या पेटवून उब मिळविण्याचा प्रयत्न सुरु आहे. शहरासह ग्रामीण भागातील जनजीवन या थंडीच्या कडाक्याने गारठले आहे.

ठळक मुद्देरिमझीम पाऊस : गारवा वाढल्याने ठिकठिकाणी पेटल्या शेकोट्या

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ढगाळ वातावरणानंतर जिल्ह्यात रिमझीम पाऊस बरसल्याने प्रचंड गारवा निर्माण झाला. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे हुडहुडी भरणारी थंडी निर्माण झाली असून ठिकठिकाणी शेकोट्या पेटवून उब मिळविण्याचा प्रयत्न सुरु आहे. शहरासह ग्रामीण भागातील जनजीवन या थंडीच्या कडाक्याने गारठले आहे.शनिवारपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले. रविवारी पावसाळी वातावरण तयार होऊन दुपारी १२ वाजताच्या सुमारास पावसाच्या सरीला सुरुवात झाली. सायंकाळपर्यंत रिमझीम पाऊस बरसत होता. त्यातच बोचरा वारा वाहत होता. तापमान कमालीचे खाली घसरल्याने प्रचंड थंडी निर्माण झाली होती. घराबाहेर निघणारा प्रत्येक जण उबदार कपडे घालूनच बाहेर पडत होता. शहरातील विविध भागात भर दुपारी शेकोट्या पेटल्याचे दृष्य होते. ग्रामीण भागातही शेकोट्या पेटल्या होत्या. या अकाली पावसाचा फटका सर्वांनाच बसत आहे. थंडीचा सर्वाधिक त्रास वृद्धांना होत असून सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवू लागला आहे.हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवत पाऊस बरसला. या पावसाने भाजीपाला आणि रबी पिकांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. रबी पीके पिवळी पडू लागली आहेत. पालांदूर परिसरात रबीतील उडीद, मुग, लाखोरी आदी पिकांना या अवकाळी पावसाचा लाभ होणार असला तरी बागायतदार शेतकऱ्यांची मात्र डोकेदुखी ठरत आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या वादळाने विदर्भात हलक्या पावसाने हजेरी लावली. मंगळवारपर्यंत असेच वातावरण राहण्याचा अंदाज आहे.पावसाळी वातावरणात आधारभूत केंद्रावर धान उघड्यावरपावसाळी वातावरणात आधारभूत केंद्रावर धान उघड्यावर असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली. गत आठवड्यात अवकाळी पावसाचा फटका बसल्यानंतरही बाजार समितीने कोणत्याही सुविधा पुरविल्या नाही. जिल्ह्यातील ६७ पैकी बहुतांश केंद्रांवर सध्या धान उघड्यावर असून शेतकरी आपला धान झाकण्याची धडपड करीत आहेत. भंडारा जिल्ह्यात आधारभूत धान खरेदीला सुरुवात झाली. जिल्ह्यातील ६७ केंद्रांवर धानाची खरेदी सुरु आहे. त्यात भंडारा तीन, मोहाडी नऊ, तुमसर १५, लाखनी ११, साकोली १२, लाखांदूर १२ आणि पवनी तालुक्यातील पाच केंद्रांचा समावेश आहे. या केंद्रांवर शेतकºयांना मूलभूत सुविधा पुरविण्याची सर्व जबाबदारी बाजार समित्यांची आहे. त्याबाबत पणन महासंघाने त्यांना पत्रही पाठविले. परंतु जिल्ह्यातील कोणत्याही बाजार समितीत शेतकऱ्यांना सुविधा मिळत नाही. विक्रीच्या प्रतिक्षेत असलेले धान ठिकठिकाणी उघड्यावर आहेत. गत दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होऊन सोमवारी जिल्ह्यात हलका पाऊस झाला. यामुळे आधारभूत केंद्रात उघड्यावर असलेले धान पुन्हा ओले होण्याची भीती निर्माण झाली आहे. गत आठवड्याचा अनुभव बघता शेतकरी आपला धान झाकण्यासाठी धडपड करीत आहेत. मात्र बाजार समिती या शेतकऱ्यांना कोणतीही सुविधा देत नाही. गतवर्षीच्या तुलनेत यंदा धानाची दुप्पट खरेदी झाली असून आधारभूत केंद्रावर धान साठविण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. गोदामही अपुरे पडत आहेत. परिणामी धान खरेदीची गती मंदावली आहे. अनेक शेतकरी १५ ते २० दिवस धान विक्रीच्या प्रतिक्षेत या ठिकाणी दिसून येतात.