शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

नागनदीचे प्रदूषण रोखण्यासाठी किती आंदोलने करावी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 01:22 IST

जिल्ह्याची प्राणहिता समजली जाणाऱ्या वैनगंगा नदीतील पाणी नागनदीच्या घाण पाण्यामुळे अशुद्ध झाले आहे. त्यामुळे मानवी जीवनासह पशुप्राणी व जलचर प्राण्यांसाठीही वैनगंगेचे दूषित पाणी धोकादायक झाले आहे. आता नागनदीचे प्रदूषित पाणी रोखण्यासाठी अजून किती आंदोलने होणार, .......

ठळक मुद्देपत्रपरिषद : धरणातील पाण्यात विषारी द्रव्याचे घटक वाढले, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : जिल्ह्याची प्राणहिता समजली जाणाऱ्या वैनगंगा नदीतील पाणी नागनदीच्या घाण पाण्यामुळे अशुद्ध झाले आहे. त्यामुळे मानवी जीवनासह पशुप्राणी व जलचर प्राण्यांसाठीही वैनगंगेचे दूषित पाणी धोकादायक झाले आहे. आता नागनदीचे प्रदूषित पाणी रोखण्यासाठी अजून किती आंदोलने होणार, त्यासाठी शासन प्रशासनाने याची त्वरित दखल घेवून नागनदीचे पाणी दुसरीकडे वळवावे, अशी मागणी भंडारा जिल्ह्यातील सभ्य नागरिकांकडून केली जात आहे. आता दि. १९ जून २०१९ पासून अर्ध दफन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा युवाशक्ती संघटनेच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आला आहे.भंडारा जिल्ह्यातील संजीवनी असलेली वैनगंगा नदीचे पाणी दुषित होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावांना दुषित पाणी पेणे भाग पडत आहे. त्यासाठी २००९ पासून शासनाचे लक्ष वेधन्यासाठी येथील युवाशक्ती संघटनेच्या वतीने विविध मोर्चे व आंदोलने करण्यात आले परंतू संबंधित लोकप्रतिनिधी व प्रशासन आश्वासनाची खैरात शिवाय काही उपाययोजना न झाल्यामुळे अजून किती आंदोलन करावे लागेल असे प्रश्न उपस्थित होत आहे. पवनी तालुक्यात हजारो हेक्टर शेतीला वरदान ठरणारा गोसे खुर्द प्रकल्प बांधण्यात आले आहे. ह्या प्रकल्पात २००९ पासून पाणी साठविणे सुरू आहे. धरणामध्ये नागपूर शहरातील मलमुत्र युक्त सांडपाणी कोणतीही प्रक्रीया न करता कन्हान नदी मार्गे वैनगंगा नदीच्या पात्रात सोडण्यात येत आहे. ते दुषित पाणी धरणात येवून जमा होते. दररोज सुमारे ४२० दशलक्ष लिटर प्रतिदीन प्रदुषित पाण्याचा साठा धरणात येतो. धरणातील पाण्यात विषारी द्रव्याचे घटक प्रमाण वाढले असून पाण्यामधील आॅक्सीजनचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे. त्यामुळे मासे उत्पादनावर सुद्धा मोठा परिणाम झाला आहे. धरणातील संपूर्ण पाणी काळ्या रंगाचा झालेला असून दुर्गंध युक्त आहे. आता तेच पाणी तालुक्यातील जनतेला पेणे भाग पडत आहे. त्यामुळे गॅस्ट्रो, कावीळ आदी अनेक रोगांचा प्रभाव अनेक वषार्पासून होत आहे. मानव, शेती, वृक्ष, प्राणी व पर्यावरणावर याचा विपरित परिणाम होत आहे. परंतू या सर्व बाबीकडे प्रशासन दुर्लक्ष करत असून जीवनमाना सोबत खेळत असल्याने १९७४ च्या जलकायदा नुसार संबंधित विभागावर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. शासनविरोधी धोरणामुळे वैनगंगा नदीच्या पाण्यात सोडणारे नागनदीवर जलसुद्धीकरण यंत्र बसवून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी पून्हा युवाशक्ती संघटनेने पुढाकार पुकारले असून दि.१९ जून ला दुपारी ३ वाजता पासून अर्धदफन आंदोलन पूकारण्यात आले असून या आंदोलनात शेकडाच्या संख्येत उपस्थित राहण्याचे आवाहन पत्रकार परिषदेत देवराज बावनकर, दिपक बावनकर, प्रशांत मोहरकर, गोपाल काटेखाये, प्रकाश पचारे, रमेश शिवरकर आदींनी केली आहे.इकॉर्नियामुळे वैनगंगा दूषितभंडारा : शहरातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी इकॉर्निया फोफावली आहे. वाºयाच्या झुळकीसोबत इकॉर्निया पसरत असल्याने पाणी दूषित होत आहे.भंडारा शहराची वैनगंगा जीवनदायी म्हणून ओळखली जाते. याच नदीवर पाणीपुरवठा योजना आहे. मात्र गत काही दिवसांपासून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात इकॉर्निया फोफावत आहे. या वनस्पतीमुळे नियमित जलतरणासाठी जाणाऱ्या तरुणांनाही त्रास सहन करावा लागत आहे. नदीतील मासे बऱ्याच प्रमाणात मृत्यूमुखी पडल्याचेही दिसून येत आहे. तसेच इकॉर्निया सोबत केरकचराही येत असल्याने पाणी दूषित होत आहे.