शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
2
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
3
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
4
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट
5
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार ट्विटर अकाऊंट बंद
6
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
7
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
8
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
9
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
10
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
11
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
12
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
13
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
14
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
15
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
16
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
17
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
18
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
19
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
20
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट

उकाड्याने जनजीवन प्रभावित

By admin | Updated: April 30, 2015 00:38 IST

एप्रिल महिना संपत आला असताना उन्हाचा तडाखाही वाढला आहे. शहराचे तापमान ४२.५ अंशावर पोहचले आहे.

रस्त्यावर शुकशुकाट : पारा ४२.५ अंशावरभंडारा : एप्रिल महिना संपत आला असताना उन्हाचा तडाखाही वाढला आहे. शहराचे तापमान ४२.५ अंशावर पोहचले आहे. दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट जाणवत आहे. आजारी रूग्ण, कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांसह चिमुकल्यांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. मे महिन्यामध्ये तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.सूर्याचे उत्तरायण सुरू झाल्यापासून तापमानात वाढ होत जाते. फेब्रुवारीनंतर खऱ्या अर्थाने उन्हाचे चटके बसण्यास सुरूवात होते. मात्र २०१३ पासून हवामानात अनपेक्षित बदल होऊन जानेवारी ते एप्रिलपर्यंत वादळी वारा, अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे. त्यामुळे तापमानात खंड पडून दमट वातावरण जास्त राहिले आहे. राज्यात गारपीट व पाऊस पडत असल्यामुळे तापमानाने उच्चांक गाठला नव्हता. मात्र, वैशाख महिना सुरू होताच तापमानाने ४२ अंश सेल्सियसचा पल्ला गाठला आहे. तो अद्याप स्थिर आहे. या वर्षीचा सर्वाधिक उष्ण सप्ताह म्हणून त्याची नागपूर वेधशाळेने नोंद घेतली आहे. उन्हाचा चटका कायम असल्यामुळे त्याचा फटका बसत आहे. परंतु, आता तापमान वाढले तरच मान्सुन वेळेवर येईल, असे हवामानतज्ज्ञांचे म्हणणे आहे. दरम्यान, उन्हामुळे बच्चे कंपनी चांगली त्रस्त असून त्यांना खेळण्यासाठी सकाळ व संध्याकाळ हीच वेळ मिळत आहे. (शहर प्रतिनिधी) का वाढतेय तापमान?सूर्याकडून जास्तीत जास्त किरणे पृथ्वीकडे शोषली जातात. पृथ्वीकडून उत्सर्जित केले जाणारे काही किरण वातावरणातून बाहेर पडतात, तर काही वातावरणातच अडकून राहत असल्याने तापमान वाढते. तसेच वाहनांची वाढती संख्या, ऊर्जानिर्मिती, बांधकामासाठी सिमेंट स्टीलचा वाढता वापर हे कारण आहे. उष्णतेच्या लाटेत बाहेर पडताना डोक्याला पांढरा रूमाल बांधावा अथवा टोपी घालावी. डोळ्यांच्या बचावासाठी गॉगल, ग्लोव्हज वापरावेत. प्रवासात पाण्याची बॉटल बाळगावी. अतिथंड पेय सेवन करून नयेत. फळांचे भरपूर सेवन करावे. उन्हातून बाहेरून आल्यावर कुलरमध्ये बसू नये. रात्री कमी जेवण करावे.