शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
4
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
5
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
6
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
9
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
10
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
11
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
12
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
13
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
14
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
19
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
20
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला

उकाड्याने जनजीवन प्रभावित

By admin | Updated: April 30, 2015 00:38 IST

एप्रिल महिना संपत आला असताना उन्हाचा तडाखाही वाढला आहे. शहराचे तापमान ४२.५ अंशावर पोहचले आहे.

रस्त्यावर शुकशुकाट : पारा ४२.५ अंशावरभंडारा : एप्रिल महिना संपत आला असताना उन्हाचा तडाखाही वाढला आहे. शहराचे तापमान ४२.५ अंशावर पोहचले आहे. दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट जाणवत आहे. आजारी रूग्ण, कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांसह चिमुकल्यांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. मे महिन्यामध्ये तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.सूर्याचे उत्तरायण सुरू झाल्यापासून तापमानात वाढ होत जाते. फेब्रुवारीनंतर खऱ्या अर्थाने उन्हाचे चटके बसण्यास सुरूवात होते. मात्र २०१३ पासून हवामानात अनपेक्षित बदल होऊन जानेवारी ते एप्रिलपर्यंत वादळी वारा, अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे. त्यामुळे तापमानात खंड पडून दमट वातावरण जास्त राहिले आहे. राज्यात गारपीट व पाऊस पडत असल्यामुळे तापमानाने उच्चांक गाठला नव्हता. मात्र, वैशाख महिना सुरू होताच तापमानाने ४२ अंश सेल्सियसचा पल्ला गाठला आहे. तो अद्याप स्थिर आहे. या वर्षीचा सर्वाधिक उष्ण सप्ताह म्हणून त्याची नागपूर वेधशाळेने नोंद घेतली आहे. उन्हाचा चटका कायम असल्यामुळे त्याचा फटका बसत आहे. परंतु, आता तापमान वाढले तरच मान्सुन वेळेवर येईल, असे हवामानतज्ज्ञांचे म्हणणे आहे. दरम्यान, उन्हामुळे बच्चे कंपनी चांगली त्रस्त असून त्यांना खेळण्यासाठी सकाळ व संध्याकाळ हीच वेळ मिळत आहे. (शहर प्रतिनिधी) का वाढतेय तापमान?सूर्याकडून जास्तीत जास्त किरणे पृथ्वीकडे शोषली जातात. पृथ्वीकडून उत्सर्जित केले जाणारे काही किरण वातावरणातून बाहेर पडतात, तर काही वातावरणातच अडकून राहत असल्याने तापमान वाढते. तसेच वाहनांची वाढती संख्या, ऊर्जानिर्मिती, बांधकामासाठी सिमेंट स्टीलचा वाढता वापर हे कारण आहे. उष्णतेच्या लाटेत बाहेर पडताना डोक्याला पांढरा रूमाल बांधावा अथवा टोपी घालावी. डोळ्यांच्या बचावासाठी गॉगल, ग्लोव्हज वापरावेत. प्रवासात पाण्याची बॉटल बाळगावी. अतिथंड पेय सेवन करून नयेत. फळांचे भरपूर सेवन करावे. उन्हातून बाहेरून आल्यावर कुलरमध्ये बसू नये. रात्री कमी जेवण करावे.