शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

जिल्ह्यात हाय अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2019 06:00 IST

भंडारा जिल्ह्यात गत आठ दिवसांपासून संततधार पाऊस सुरु आहे. तसेच मध्यप्रदेशाच्या सीमावर्ती भागातही मुसळधार पाऊस होत आहे. परिणामी संजय सरोवर, धापेवाडा आणि पुजारीटोला धरणाचे दरवाजे उघडून वैनगंगा नदीत पाण्याचा विसर्ग केला जात आहे. गत आठ दिवसांपासून वैनगंगा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सततच्या पावसाने संजय सरोवर, धापेवाडा आणि पुजारीटोला धरणाचे पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीतीरावरील गावात पुराचा धोका निर्माण झाला असून पूरपरिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शासकीय यंत्रणेला हाय अलर्ट देण्यात आला आहे. पूर परिस्थितीसंदर्भात जिल्हाधिकारी डॉ.नरेश गिते यांनी घेतलेल्या बैठकीत उपाययोजनांसंदर्भात स्पष्ट निर्देश देण्यात आले असून गोसे धरणाची पाणी पातळी २४५ मीटरपर्यंत स्थिर ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.भंडारा जिल्ह्यात गत आठ दिवसांपासून संततधार पाऊस सुरु आहे. तसेच मध्यप्रदेशाच्या सीमावर्ती भागातही मुसळधार पाऊस होत आहे. परिणामी संजय सरोवर, धापेवाडा आणि पुजारीटोला धरणाचे दरवाजे उघडून वैनगंगा नदीत पाण्याचा विसर्ग केला जात आहे. गत आठ दिवसांपासून वैनगंगा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. मंगळवारी तर कारधा येथील लहान पुलावर तब्बल दोन मीटर पाणी होते. दरम्यान मंगळवारी दिवसभर पावसाने उसंत घेतली. त्यामुळे पाणीपातळी खालावली असून वैनगंगेचा लहान पुल बुधवारी खुला झाला. मात्र या पुलावर मोठ्या प्रमाणात झुडपे, मोठाली वृक्ष अडकली आहेत. यासोबतच ग्रामसेवक कॉलनीत बुधवारीही पुराचे पाणी कायम होते. अशा परिस्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी शासकीय यंत्रणा हाय अलर्टवर ठेवण्यात आली आहे. या बाबत जिल्हाधिकारी डॉ.नरेश गिते यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जगताप, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, माजी पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, निवासी उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, उपविभागीय अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, रिना जनबंधू, तहसीलदार अक्षय पोयाम, गजानन कोकर्डे, धनंजय देशमुख, कार्यकारी अभियंता मानवटकर, भंडाराचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास उपस्थित होते. पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना व नागरिकांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी शासकीय विभागांना अलर्ट राहण्याचे निर्देश देण्यात आले.गोसे प्रकल्पाची पाणी पातळी २४५ मीटरवर स्थिर ठेवण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत. ४५ लाईफ जॅकेट असून तातडीच्या वेळी मागणी केल्यास ते उपलब्ध करून दिले जातील. दोन बोट पूरपरिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सज्ज आहेत. पाणी पातळीत वाढ होत असताना वैनगंगा नदीच्या आजूबाजूला असलेल्या गावांचा वीज पुरवठ्याबाबत सतर्कता बाळगण्याची सूचना देण्यात आली.पाणीपुरवठ्याची पर्यायी व्यवस्था करावैनगंगेला आलेल्या पुरामुळे भंडारा शहराला पाणी पुरवठा करणारी यंत्रणा पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी तातडीने व्यवस्था करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. भंडारा शहरातील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी पाण्याची पातळी एक ते दोन मीटरने खाली जाणे आवश्यक आहे. कारधा पुलावरील पाण्याची पातळी कमी होण्याची शक्यता आहे. दरम्यान कारधा येथील सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहेत.गोसे प्रकल्पाचे ३३ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले असून ३६८८ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. कारधा येथे वैनगंगा नदी धोक्याच्या पातळीवर वाहत आहे. बुधवारी दिवसभर भंडारा शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला.

टॅग्स :RainपाऊसfloodपूरGosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्प