शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

जिल्ह्यात हाय अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2019 06:00 IST

भंडारा जिल्ह्यात गत आठ दिवसांपासून संततधार पाऊस सुरु आहे. तसेच मध्यप्रदेशाच्या सीमावर्ती भागातही मुसळधार पाऊस होत आहे. परिणामी संजय सरोवर, धापेवाडा आणि पुजारीटोला धरणाचे दरवाजे उघडून वैनगंगा नदीत पाण्याचा विसर्ग केला जात आहे. गत आठ दिवसांपासून वैनगंगा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सततच्या पावसाने संजय सरोवर, धापेवाडा आणि पुजारीटोला धरणाचे पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीतीरावरील गावात पुराचा धोका निर्माण झाला असून पूरपरिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शासकीय यंत्रणेला हाय अलर्ट देण्यात आला आहे. पूर परिस्थितीसंदर्भात जिल्हाधिकारी डॉ.नरेश गिते यांनी घेतलेल्या बैठकीत उपाययोजनांसंदर्भात स्पष्ट निर्देश देण्यात आले असून गोसे धरणाची पाणी पातळी २४५ मीटरपर्यंत स्थिर ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.भंडारा जिल्ह्यात गत आठ दिवसांपासून संततधार पाऊस सुरु आहे. तसेच मध्यप्रदेशाच्या सीमावर्ती भागातही मुसळधार पाऊस होत आहे. परिणामी संजय सरोवर, धापेवाडा आणि पुजारीटोला धरणाचे दरवाजे उघडून वैनगंगा नदीत पाण्याचा विसर्ग केला जात आहे. गत आठ दिवसांपासून वैनगंगा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. मंगळवारी तर कारधा येथील लहान पुलावर तब्बल दोन मीटर पाणी होते. दरम्यान मंगळवारी दिवसभर पावसाने उसंत घेतली. त्यामुळे पाणीपातळी खालावली असून वैनगंगेचा लहान पुल बुधवारी खुला झाला. मात्र या पुलावर मोठ्या प्रमाणात झुडपे, मोठाली वृक्ष अडकली आहेत. यासोबतच ग्रामसेवक कॉलनीत बुधवारीही पुराचे पाणी कायम होते. अशा परिस्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी शासकीय यंत्रणा हाय अलर्टवर ठेवण्यात आली आहे. या बाबत जिल्हाधिकारी डॉ.नरेश गिते यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जगताप, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, माजी पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, निवासी उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, उपविभागीय अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, रिना जनबंधू, तहसीलदार अक्षय पोयाम, गजानन कोकर्डे, धनंजय देशमुख, कार्यकारी अभियंता मानवटकर, भंडाराचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास उपस्थित होते. पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना व नागरिकांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी शासकीय विभागांना अलर्ट राहण्याचे निर्देश देण्यात आले.गोसे प्रकल्पाची पाणी पातळी २४५ मीटरवर स्थिर ठेवण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत. ४५ लाईफ जॅकेट असून तातडीच्या वेळी मागणी केल्यास ते उपलब्ध करून दिले जातील. दोन बोट पूरपरिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सज्ज आहेत. पाणी पातळीत वाढ होत असताना वैनगंगा नदीच्या आजूबाजूला असलेल्या गावांचा वीज पुरवठ्याबाबत सतर्कता बाळगण्याची सूचना देण्यात आली.पाणीपुरवठ्याची पर्यायी व्यवस्था करावैनगंगेला आलेल्या पुरामुळे भंडारा शहराला पाणी पुरवठा करणारी यंत्रणा पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी तातडीने व्यवस्था करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. भंडारा शहरातील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी पाण्याची पातळी एक ते दोन मीटरने खाली जाणे आवश्यक आहे. कारधा पुलावरील पाण्याची पातळी कमी होण्याची शक्यता आहे. दरम्यान कारधा येथील सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहेत.गोसे प्रकल्पाचे ३३ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले असून ३६८८ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. कारधा येथे वैनगंगा नदी धोक्याच्या पातळीवर वाहत आहे. बुधवारी दिवसभर भंडारा शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला.

टॅग्स :RainपाऊसfloodपूरGosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्प