शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

दमदार पावसाने उन्हाळी धानाच्या कडपा पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 05:01 IST

पवनी तालुक्यात प्रत्येक वर्षी उन्हाळी धान पीक घेतल्या जाते. अनेक गावची शेतजमीन काळी, कसदार असून धान पीक घेण्यासाठी उपयुक्त असल्याने दीर्घ काळापासून येथील शेतकरी जमीन कसण्यात मागे नाहीत. तालुक्यातील उन्हाळी धान पिकांच्या क्षेत्राला चौरासपट्टा म्हणून संबोधले जात असून पुरेशी सिंचनाची सोय असल्याने उन्हाळी भात पीक मोठा प्रमाणात घेतल्या जाते.

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी: दमदार पावसाच्या हजेरीने चौरास पट्टातील उन्हाळी धान पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यात काही प्रमाणात मळणी करताना तर काही कापणी होताना शेकडो क्विंटल धानाच्या कडपा पाण्यात सापडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.पवनी तालुक्यात प्रत्येक वर्षी उन्हाळी धान पीक घेतल्या जाते. अनेक गावची शेतजमीन काळी, कसदार असून धान पीक घेण्यासाठी उपयुक्त असल्याने दीर्घ काळापासून येथील शेतकरी जमीन कसण्यात मागे नाहीत. तालुक्यातील उन्हाळी धान पिकांच्या क्षेत्राला चौरासपट्टा म्हणून संबोधले जात असून पुरेशी सिंचनाची सोय असल्याने उन्हाळी भात पीक मोठा प्रमाणात घेतल्या जाते.दरवर्षीच ऐन पीक हाती येत असताना निसर्गाची अवकृपा होऊन शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागतो. झालेल्या उत्पादनामुळे शेतकºयांना पिकासाठी केलेला व्यवहार कसा सोडवायचा, हा चिंतनीय प्रश्न असल्यामुळे समस्यांचा डोंगर कोसळण्याचे चित्र निर्माण होत आहे.आधीच कर्जाच्या खाईत असलेल्या शेतकºयांना शासनाच्या कर्जमाफी योजनेने दिलासा मिळाला असला तरी शेतातून मिळणाºया उत्पन्नाने अपेक्षित रोजनिशी लागणारा कौटुंबिक अत्यावश्यक खर्च सांभाळण्याची स्थिती नसतांना उन्हाळी पिकांचे होणारे नुकसान यात भर पाडणारी आहे. दरम्यान, तालुक्यातील शेतशिवारात झालेल्या दमदार पावसाने धान पिकांची भयानक नुकसान झाले आहे. काहींची पिके शेतात कापणीसाठी उभी आहेत काहींची कापणी होऊन शेतात कडपा ओलेचिंब अवस्थेत पडल्या आहेत. काहींचे धान मळणी करताना पावसात सापडले आहेत. एरवी देशाचा पोषणकर्ता असणाºया शेतकºयांचे हाल निसर्गाच्या झालेल्या अवकृपेमुळे बेहाल होतांना कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण, बँका व खासगी कजार्तून मुक्तता आदी प्रश्न आवासून उभे आहेत.तालुक्यातील उन्हाळी पीक क्षेत्राच्या गावाचे भ्रमण केले असता अनेक गावात शेतकरी मळणी केल्यानंतर पाण्यात भिजलेले धान अंगणात वाळवितांना दिसले, तर काहींनी प्रस्तुत प्रतिनिधीला शेतावर नेऊन होत असलेल्या नुकसानीची माहिती दिली. याप्रसंगी संबंधित नुकसानग्रस्त शेतकºयांनी शासनाकडून शेतीचे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून आवश्यक मदत करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर कार्यरंभ करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :Socialसामाजिक