शहरं
Join us  
Trending Stories
1
SA Won WTC Final 2025 : एडन मार्करमचे धमाकेदार शतक!! द. आफ्रिकेने रचला इतिहास; कांगारुंना हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी
2
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
3
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
4
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
5
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
6
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 
7
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
8
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
9
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
10
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
11
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
12
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
13
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
14
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा
15
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेनं ग्राहकांना दिलं गिफ्ट, कमी केले कर्जाचे व्याजदर; पटापट पाहा लेटेस्ट दर
16
संकष्ट चतुर्थी 2025: असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
17
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
18
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
19
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद

जिल्ह्यात मुसळधार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 05:01 IST

मुसळधार पावसाने शेतकरी सुखावला असून रोवणीच्या कामाला धडाक्यात प्रारंभ होणार आहे. गत पंधरवाड्यापासून बळीराजा पाऊस केव्हा बरसणार याच्या प्रतीक्षेत होता. काही तालुक्यांमध्ये पेरणीची कामे ९० टक्क्यांपेक्षा जास्त झाली असतानाही पावसाचा थांगपत्ता नव्हता. काही ठिकाणी पाण्याअभावी पऱ्हे करपत असल्याचीही बाब उजेडात आली होती. दरम्यान रविवारी बरसलेल्या पावसाने या पऱ्ह्यांना जीवनदान मिळाले आहे.

ठळक मुद्देरोवणीच्या कामाला सुरुवात : धान खरेदी केंद्रावरील पोती ओली

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : चातकासारखी पावसाची वाट पाहत असलेला बळीराजा रविवारी सुखावला. दुपारी ३ वाजतानंतर जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पावसाने हजेरी लावली. भंडारा शहरासह लाखनी, पालांदूर, साकोली, वरठी, मोहाडी, तुमसर, नाकाडोंगरी, पवनारा, आसगाव, पवनी व लाखांदूरातही पाऊस बरसला. मुसळधार पावसाने शेतकरी सुखावला असून रोवणीच्या कामाला धडाक्यात प्रारंभ होणार आहे.गत पंधरवाड्यापासून बळीराजा पाऊस केव्हा बरसणार याच्या प्रतीक्षेत होता. काही तालुक्यांमध्ये पेरणीची कामे ९० टक्क्यांपेक्षा जास्त झाली असतानाही पावसाचा थांगपत्ता नव्हता. काही ठिकाणी पाण्याअभावी पऱ्हे करपत असल्याचीही बाब उजेडात आली होती. दरम्यान रविवारी बरसलेल्या पावसाने या पऱ्ह्यांना जीवनदान मिळाले आहे. मशागतीनंतर पाऊस आवश्यक असून आता चिखलणीच्या कामाला सुरुवात होणार आहे. याचवेळी पऱ्ह्यांचे गठ्ठे बांधून रोवणीच्या कामालाही प्रारंभ होणार आहे.वरठी येथील वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार गावातील सखल भागात पाणी शिरल्याने अनेक घरामध्ये पाणी साचले होते. घरातील साहित्यही ओले झाले. परंतु रविवारी आलेल्या पावसाने बळीराजा सुखावला आहे.तुमसर तालुक्यात मेघ गर्जनेसह दमदार पाऊस बरसला. वातावरणात गारवा निर्माण झाला असून पºह्यांना जीवनदान मिळाले आहे. जवळपास एक तास पावसाने हजेरी लावली. सखल भागात पाणी साचले होते. पुन्हा एकदा दमदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.बळीराजा सुखावलारविवारी जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. पेरणीनंतर पावसाअभावी पऱ्हे करपत होती. आजच्या पावसाने करपलेल्या पºह्यांना जीवनदान मिळाले. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजा सुखावला गेला. करडी परिसरात खरीप हंगामांतर्गत पाच हजार ४६४ हेक्टर क्षेत्रात धानाची लागवड करण्यात आली आहे. धान पिकाची पेरणी पुर्ण झाली असून तूर व तिळ पिकाची लागवडही बांध्यावर करण्यात आली आहे. दरम्यान गत आठवड्याभरात पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी रोवणीला प्रारंभ केला होता. परंतु पावसावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांच्या रोवण्या रखडल्या होत्या. कोरडवाहू शेतीचे पऱ्हे रोवणी योग्य झाले असल्याने आजच्या पावसाचा या पºह्यांना फायदा झाला असून नवसंजीवनी मिळाली आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती