शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
3
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
4
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
5
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
6
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
7
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
8
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
9
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
10
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
11
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
12
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
13
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
14
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
15
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
16
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
17
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
18
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
19
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
20
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 

रसायनयुक्त पाण्यामुळे आरोग्य धोक्यात

By admin | Updated: January 11, 2015 22:44 IST

औषध भुकटी तयार करणाऱ्या कारखान्यातील अतिरिक्त रसायनयुक्त पाणी कारखान्याबाहेर नाल्याशेजारी साठवणूक केली जाते. रसायनयुक्त पाण्यात सल्फ्यूरिक आम् लाचा समावेश आहे.

व्यवस्थापनाचे दुर्लक्ष : नाल्याशेजारीच रसायनयुक्त पाण्याचा हौद, पाण्याचा निचरा नाल्याततुमसर : औषध भुकटी तयार करणाऱ्या कारखान्यातील अतिरिक्त रसायनयुक्त पाणी कारखान्याबाहेर नाल्याशेजारी साठवणूक केली जाते. रसायनयुक्त पाण्यात सल्फ्यूरिक आम् लाचा समावेश आहे. त्याला निष्प्रभ करण्याकरिता कारंजे लावले आहेत. या पाण्याचा निचरा लागून असलेल्या नाल्यात होतो. या पाण्यामुळे मानवासहीत पशूंचे आरोग्य धोक्यात आले आहे.तुमसर गोंदिया राज्य महामार्गाशेजारी देव्हाडी (तुमसर रोड) शिवारात क्लेरियन ड्रग नावाची औषधी भुकटी तयार करणारी कंपनी मागील २० वर्षापूर्वी सुरु झाली होती. कंपनीच्या आवाराशेजारी या कंपनीने रसायनयुक्त पाणी (सल्फ्युरिक आम्ल) निष्प्रभ करण्याकरिता मोठा हौद तयार केला आहे. हा हौद काळ्या प्लॉस्टीक आवरणाचा आहे. या हौदाला लागूनच नाला वाहतो. या नाल्यात रसायनयुक्त पाण्याचा निचरा सातत्याने होतो. नाल्यात पाणी असल्याने येथे पाळीव जनावरे पाणी पिण्याकरिता नेहमी येतात. परिसरात शेती आहे. अनेक शेतकरी या नाल्यातील पाणी सिंचनाकरीता वापरतात. परिणामी या रसायनयुक्त पाण्याचा पशुसोबतच मानवी आरोग्यला धोका निर्माण झाला आहे.रसायनयुक्त पाण्याचा हौदाला आवारभिंत अथवा सुरक्षा कठडे कारखाना प्रशासनाने लावलेले नाहीत. काटेरी कुंपणाचे लोखंडी खांब येथे तेवढे शिल्लक आहेत. काटेरी कुंपण काही वर्षाने तुटले त्यानंतर कारखाना व्यवस्थापनाने पुन्हा तयार केले नाही. या रसानयुक्त पाण्याच्या संपर्कात आल्यावर अथवा या महामार्गाने प्रवास केला तेव्हा उग्र वास येतो. वायूगळती तर झाली नाही ना असा भास येथे होतो. औषध भुकटी अथवा औषध तयार करणाऱ्या कारखान्याला पर्यावरण, वायू प्रदूषण तथा जलप्रदूषण मंडळाची रितसर परवानगी घ्यावी लागते. या मंडळाचे येथे नेहमी पथक येतात. ‘ना हरकत’ प्रमाणपत्र देऊन जातात. परंतु सुरक्षेच्या दृष्टीकोणातून रसायनयुक्त पाण्याच्या हौदाकडे त्यांचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. उग्र वास का? व किती येते? हा येथे संशोधनाचा विषय आहे. नाकाला तीव्र झिंग येथे येते हे विशेष. ग्रामपंचायत देव्हाडीचे सुद्धा येथे दुर्लक्ष दिसून येते. कोट्यवधी रूपयांचा नफा कमविणाऱ्या कारखाना प्रशासनाने नागरिकांच्या तथा पशुंच्या आरोग्याचे रक्षण करण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)